शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

मिनीमंत्रालय : ६५

By admin | Updated: February 22, 2017 00:05 IST

जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार ७८७ केंद्रावर सरासरी ६५ टक्के मतदान झाले.

उशिरापर्यंत रांगा : चांदूरबाजार तालुका सर्वाधिक ६८.०३ अमरावती : जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार ७८७ केंद्रावर सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सायंकाळी उशीरापर्यंत १०१ मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. सर्वाधिक ६८.०३ टक्के मतदान चांदूरबाजार तालुक्यात तर सर्वात कमी ६० टक्के मतदान भातकुली तालुक्यात झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. यंदा जिल्हा परिषदेसाठी ४१७ व पंचायत समितीसाठी ५३३ असे एकूण ९५० उमेदवार रिंगणात होते. युती व आघाडीत ताटातूट झाल्यावर सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली. यामुळे एकेका मतांसाठी संघर्ष होऊन मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात अंतिम टक्केवारीनुसार ६५ टक्केच मतदान झाले. प्रचारासाठी सहा दिवस एवढा अल्प अवधी व ग्रामीण भागात तूर व हरभरा सोंगणीचा सुरू असलेला हंगाम आदी कारणांमुळे मतदानाचा टक्का माघारला. तथापि युवा मतदारांनी यावेळी उत्साहाने मतदान केले. मंगळवारी मतदानाच्या पहिल्या दोन तासात केवळ ६.३३ टक्के मतदान झाले. यामध्ये ६३ हजार २१४ पुरूष व २४ हजार ७७३ महिला असे एकूण ८७ हजार ९८७ मतदान झाले. १०१ मतदार केंद्रावर उशिरापर्यंत रांगाजिल्ह्यात एक हजार ७८७ मतदान केंद्र आहे. यापैकी एक हजार ६८६ मतदान केंद्रावर अंतिम अवधीपर्यंत म्हणजेच सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान आटोपले. मात्र १०१ मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. या ठिकाणी सायंकाळी ७ पर्यंत मतदान करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.कठोरा (जामठी) येथे बोगस मतदाननांदगाव पेठनजीकच्या असलेल्या कठोरा (जामठी) येथील मतदान केंद्रावर एका महिला मतदाराच्या नावे आधीच मतदान करण्यात आल्याचा प्रकार घडला. याविषयीची तक्रार घेण्यास केंद्राध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जवंजाळ यांनी केला. त्या महिला मतदारास नंतर प्रदत्त मतपत्रिका देण्यात आली.अशी आहे तालुकानिहाय टक्केवारीजिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. यामध्ये चांदूररेल्वे ६५.१४, चांदूरबाजार ६८.०३, मोर्शी ६५, वरुड ६७.६५, तिवसा ६२.९८, अमरावती ६२, अचलपूर ६७.०५, धारणी ६५, अंजनगाव सुर्जी ६७.२५, दर्यापूर ६४.७१, भातकुली ६०, चांदूररेल्वे ६२.३५, धामणगाव ६३.७१ व नांदगाव तालुक्यात ६५.३३ टक्के मतदान झाले.उमेदवारांच्या गावात मतांचा टक्का वाढलागण-गटातील उमेदवारांच्या गावात मतदानाचा उत्साह दिसून आला. सकाळपासूनच मतदानाची टक्केवारी अधिक होती. तिवसा तालुक्यात वरखेड, तळेगाव ठाकूर, वऱ्हा व कुऱ्हा गावातील उमेदवार रिंगणात होते. या गावांमध्ये ७२ ते ७५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची माहिती निवडणूक सूत्रांनी दिली. युवा मतदार; दिव्यांगांचा उत्स्फूर्त सहभागप्रथमच मतदान करणाऱ्या युवा मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता. महाविद्यालयात झालेल्या ‘स्विप’ उपक्रमांतर्गत जनजागृतीमुळेही मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. दिव्यांगांसाठी मतदानकेंद्रात प्राधान्याने मतदानाची सोय करण्यात आली होती. अपवाद वगळता स्थानिक कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदानास सहकार्य केले.