शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कृषीमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा

By admin | Updated: July 27, 2016 23:57 IST

विभागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी दाखविलेल्या प्रचंड अनास्थेमुळे संतप्त होऊन ....

यशोमती ठाकूर आक्रमक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत दाखविली अनास्था अमरावती : विभागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी दाखविलेल्या प्रचंड अनास्थेमुळे संतप्त होऊन आ. यशोमती ठाकून यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पावसाळी अधिवेशनात आ. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती विभागात पेरणीच्या वेळी बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचा मुद्दा मांडला. मात्र, याबाबत उत्तर देताना कृषीमंत्री उदासिन होते. त्यांनी केवळ याबाबत माहिती मागविण्यात येईल, असे त्रोटक उत्तर दिले. यामुळे आ. यशोमती आक्रमक झाल्यात. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा इतका गंभीर विषय मांडला जात असताना कृषीमंत्री अशी टोलवाटोलवीची उत्तरे कशी काय देऊ शकतात? असा संतप्त सवाल यशोमतींनी केला. आजवर शेतकरी हितासाठी आंदोलने करणारे आणि आपणच शेतकऱ्यांचे खरे तारणहार असल्याचे चित्र निर्माण करणारे सदाशिव खोत आता कृषीमंत्री पदी आरूढ आहेत. परंतु तरीही त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कणव नाही. ‘अच्छे दिन’चा गाजावाजा करणाऱ्या या बेजबाबदार मंत्र्यांना शेतकरी मरणासन्न अवस्थेत असताना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे खोत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आ. यशोमतींनी केली. जिल्ह्यात पेरणीच्या वेळी नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. पेरणी आटोपल्यानंतर शासनाने सोयाबीन ऐवजी कपाशी बियाण्यांचे मोफत वाटप सुरू केले. परंतु पेरणी आटोपल्यानंतर या बियाण्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. जिल्ह्यात कोरी बियाणे कंपनीकडून ५० हजार पाकिट वाटपाचे उद्दिष्ट्य असताना चार तालुक्यांतील केवळ १८१८ शेतकऱ्यांनी पाकिटांची उचल केली. त्यामुळे हा सर्व प्रकार खासगी बियाणे कंपनीच्या हितासाठी असल्याची घणाघाती टीका देखील आ. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली. आधीच शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारे दिलासा देण्याचे प्रयत्न होेत नाहीत. शासन केवळ घोषणाबाजी करीत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात आक्रमकपणे मांडला. शेतकऱ्यांनी कपाशी बियाण्यांकडे पाठ फिरविली. सोयाबीन बियाण्यांना पसंती दिल्याने पडून असलेले कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. कृषी विभाग शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा आरोेपही आ. यशोमतींनी सभागृहात केला. (प्रतिनिधी)