शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना खडसावले

By admin | Updated: April 25, 2016 00:10 IST

महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत.

गोवंश हत्या, वाहतूक प्रकरण : गंभीर आरोपअमरावती : महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत. यात पोलिसांचेही साटे-लोटे असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला होता. याप्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हे बेकायदेशीर कृत्य थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयी विचारणा केली होती. शिष्टमंडळात मुस्लिम समाजातील कुरेशी समाजाच्या स्लॉटरिंग परमिट होल्डर्स अँड बिफ मर्चंट सोसायटीचे अध्यक्ष अन्सार अहमद कुरेशीदेखील उपस्थित होते. शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरात सुमारे १५ जण गोमांसाचा व्यवसाय करतात. यासाठी गोवंशाची कत्तल केली जाते. त्यांच्या पाठीशी एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाचा वरदहस्त आहे. सुमारे दोन ट्रक गोमांस दिवसाकाठी शहरातून पाठविले जाते. विशेष म्हणजे पूर्वी गोमांसाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी राज्य सरकारने कायदा केल्यानंतर गोवंश हत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील कोणी गोवंश हत्या केली तर त्याला सोसायटीच्यावतीने ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठरवण्यात आली आहे. परिणामी नागपुरी गेट आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये गोवंशहत्या बंद आहे. पण, पोलिसांचे साटेलोटे असल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद कॉलनीत आजही हा व्यवसाय सुरूच आहे. गोमांसाची वाहतूक बंद करा, अशी मागणी बीफ मर्चंट सोसायटीने वारंवार करूनही अमरावती पोलिसांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. पोलिसांचे तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांचे खिसे गरम करतो, अशी बतावणी गोमांसाचा व्यापार करणारे खुलेआम करतात, असा आरोपही शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्तांकडे केला होता.पुढील आठवड्यात शहरातील हा गोवंश हत्येचा व्यवसाय पूर्णपणे न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या एका पोलीस निरीक्षकांच्या नावे सतत तक्रारी केल्या जात आहेत. राज्य सरकार गोवंश रक्षणाच्या विषयावर गंभीर असताना अमरावतीमध्ये गोमांसाचा व्यवसाय होत असेल तर पोलीस प्रशासन त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे. या संदर्भात कडक पावले उचलण्याचे निर्देश रणजित पाटील यांनी दिले आहेत.शुक्रवारी पोलीस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात स्लॉटरिंग परमीट होल्डर्स अ‍ॅन्ड बिफ मर्चंट सोसायटीचे अध्यक्ष अन्सार अहमद कुरेशी, पदाधिकारी जायद हुसैन कुरेशी, जाकीर हुसैन कुरेशी यांच्यासह विहिंपचे विजय शर्मा, भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस चेतन गावंडे, प्रभाकर थेटे, अभय बपोरीकर, भारत चिखलकर, प्रसाद जोशी, राजू कुरील, बादल कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवराय कुळकर्णी यांनी पोलिसांना या विषयावर सचेत केल्यावर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. काल पोलिसांनी गस्त वाढविताच आझादनगरात हा धंदा करणाऱ्यांनी सारवासारवीचे प्रयत्न चालवले आहे. शहरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेली ही गोमांस वाहतूक तातडीने न थांबविल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी याप्रकरणाला गांभिर्याने घेतल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)