शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना खडसावले

By admin | Updated: April 25, 2016 00:10 IST

महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत.

गोवंश हत्या, वाहतूक प्रकरण : गंभीर आरोपअमरावती : महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत. यात पोलिसांचेही साटे-लोटे असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला होता. याप्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हे बेकायदेशीर कृत्य थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयी विचारणा केली होती. शिष्टमंडळात मुस्लिम समाजातील कुरेशी समाजाच्या स्लॉटरिंग परमिट होल्डर्स अँड बिफ मर्चंट सोसायटीचे अध्यक्ष अन्सार अहमद कुरेशीदेखील उपस्थित होते. शहरात गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरात सुमारे १५ जण गोमांसाचा व्यवसाय करतात. यासाठी गोवंशाची कत्तल केली जाते. त्यांच्या पाठीशी एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाचा वरदहस्त आहे. सुमारे दोन ट्रक गोमांस दिवसाकाठी शहरातून पाठविले जाते. विशेष म्हणजे पूर्वी गोमांसाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी राज्य सरकारने कायदा केल्यानंतर गोवंश हत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील कोणी गोवंश हत्या केली तर त्याला सोसायटीच्यावतीने ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठरवण्यात आली आहे. परिणामी नागपुरी गेट आणि खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये गोवंशहत्या बंद आहे. पण, पोलिसांचे साटेलोटे असल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद कॉलनीत आजही हा व्यवसाय सुरूच आहे. गोमांसाची वाहतूक बंद करा, अशी मागणी बीफ मर्चंट सोसायटीने वारंवार करूनही अमरावती पोलिसांनी त्याकडे डोळेझाक केली आहे. पोलिसांचे तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांचे खिसे गरम करतो, अशी बतावणी गोमांसाचा व्यापार करणारे खुलेआम करतात, असा आरोपही शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्तांकडे केला होता.पुढील आठवड्यात शहरातील हा गोवंश हत्येचा व्यवसाय पूर्णपणे न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या एका पोलीस निरीक्षकांच्या नावे सतत तक्रारी केल्या जात आहेत. राज्य सरकार गोवंश रक्षणाच्या विषयावर गंभीर असताना अमरावतीमध्ये गोमांसाचा व्यवसाय होत असेल तर पोलीस प्रशासन त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे. या संदर्भात कडक पावले उचलण्याचे निर्देश रणजित पाटील यांनी दिले आहेत.शुक्रवारी पोलीस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात स्लॉटरिंग परमीट होल्डर्स अ‍ॅन्ड बिफ मर्चंट सोसायटीचे अध्यक्ष अन्सार अहमद कुरेशी, पदाधिकारी जायद हुसैन कुरेशी, जाकीर हुसैन कुरेशी यांच्यासह विहिंपचे विजय शर्मा, भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस चेतन गावंडे, प्रभाकर थेटे, अभय बपोरीकर, भारत चिखलकर, प्रसाद जोशी, राजू कुरील, बादल कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवराय कुळकर्णी यांनी पोलिसांना या विषयावर सचेत केल्यावर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. काल पोलिसांनी गस्त वाढविताच आझादनगरात हा धंदा करणाऱ्यांनी सारवासारवीचे प्रयत्न चालवले आहे. शहरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेली ही गोमांस वाहतूक तातडीने न थांबविल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी याप्रकरणाला गांभिर्याने घेतल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)