शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘मिनी मंत्रालया’तच डेंग्यू अळ्यांचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

डासांची उत्पत्तिस्थाने, कुठे कूलरमध्ये पाणी, कुठे ड्रेनेज तुंबले अमरावती : डेंग्यू व अन्य आजारांना कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्तिस्थाने म्हणजे ...

डासांची उत्पत्तिस्थाने, कुठे कूलरमध्ये पाणी, कुठे ड्रेनेज तुंबले

अमरावती : डेंग्यू व अन्य आजारांना कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्तिस्थाने म्हणजे साचून राहिलेले पाणी. त्यामुळे पाणी साचू देऊ नका, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करण्यात येते. मात्र, स्वत:च्या दिव्याखालचा अंधार प्रशासकीय यंत्रणेला दिसत नाही, अशी स्थिती लोकमतने गुरुवारी ‘मिनी मंत्रालया’त केलेल्या निरीक्षणात दिसून आली. यात काही कार्यालयांमध्येच डासांची पैदास केली जात असल्याचे दिसून आले.

कूलरच्या टपात पाणी साचू देऊ नका. कचरा वेळोवेळी साफ करा. अडगळीचे सामान पडू देऊ नका. यात पाणी साठवून डेंग्यूचा आजार होण्याचा धोका असतो, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले. यासाठी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकताच आढावा घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. मात्र, खुद्द जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यालयात कूलरच्या टाक्यात पाणी साचून असल्याचे चित्र दिसून आले, तर बांधकाम विभागाच्या बाजूला सांडपाणी वाहून नेणारी नाल्या तुडुंब भरल्याचे दिसले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या बाजूलाच कचऱ्याचे ढीगही तसेच पडून आहेत. ज्या ठिकाणाहून प्रशासनाचा कारभार चालतो, त्याची प्रचिती जिल्हा परिषद कार्यालयात दिसून आली.

बॉक्स

गावखेड्यात घरोघरी तपासणी, मग इकडे का नाही?

डेंग्यूचा डास सकाळी व सायंकाळच्या सुमारास चावत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. एडिस इजिप्टाय या डासापासून डेंग्यू आणि चिकुणगुनिया ही होऊ शकतो. हा डास हा स्वच्छ पाण्यात होतो. आतापर्यंत कूलरच्या पाण्यात या डासाची उत्पत्ती अधिक प्रमाणात झाली असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या निष्कर्षात पुढे आले आहे. शहरासह जिल्ह्यात काही दिवसापासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे संबंधित गावात सर्वेक्षणाच काम घरोघरी सुरू केले आहे. असे असताना गावात सर्वेक्षण मात्र कार्यालयात कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक्स

नागरिकांना दिसणारी अस्वच्छता प्रशासनाला का दिसत नाही?

जिल्हा परिषद कार्यालयात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये पाणी तुंबले. आजूबाजूला कचरा पडला. या दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद कार्यालयातील कुलर मध्ये पाणी साचले आहे. याचबरोबर अडगळीच्या साहित्यात पाणी साचून डेंग्यूचे मच्छर वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या विभागात लगत कुलर लागले आहेत. त्या कूलरमधील पाणीही गेल्या किती दिवसांत बदललेले नाही. पावसात कूलर काढण्याची गरज असताना ती तसेच पडून आहेत. नागरिकांना दिसणारी ही अस्वच्छता अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.