शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कोट्यवधीचे संत्रापीक बुडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:50 IST

आंबिया बहर : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड इंदल चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड ...

आंबिया बहर : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाडइंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड कोसळल्याने यावर्षी आंबिया बहराची उत्पादित होणाऱ्या संत्राफळांची कोट्यवधींची उलाढाल प्रभावित होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्याकरिता सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात पपई, आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, केळी या फळबागांची लागवड करण्यात येते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र संत्रापिकाचे असून, येथील संत्री चवीने गोड असल्याने विविध राज्यांत मोठी मागणी आहे. वरूड, मोर्शी, अंजनगाव, अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात ६ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या आंबिया बहराची संत्राफळे बाल्यावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, परिसरातील पाण्याची पातळी १२ फूट खाली गेल्याने या फळबागांना दुष्काळाचा फटका बसत आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. अल्प पावसामुळे फळबागांवर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बोअरवेल, विहिरींना कोरड पडल्याने जिल्ह्यातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील फळबागांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत फळबागा वाचविणे कठीण झाले आहे. अशा संकटकाळातही काही शेतकरी विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. चांदूर बाजार, वरूड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकरी फळबागांमधून लागलेला खर्चही निघाला नसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.मृगाच्या संत्रा उत्पादनात कोट्यवधीची तूटमृग बहर आला तेव्हा जेमतेम स्थितीत शेतकऱ्हानी पाण्याची सोय केली होती. त्यामुळे मृग बहराची संत्राफळे आली; मात्र कोळशी, फायटोप्थोरा व डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळे काही प्रमाणात सडलीत. काहींची वाढ खुंटली, तर काही फळे मलूल पडली. त्यामुळे बाजारपेठेत भाव मिळू शकला नाही. त्यातही व्यापाºयांनी एकी करून तोकड्या भावात बगीचा मागितला. त्यामुळे ट्रक भरून संत्री बंगळुरु, हैद्राबादला पाठवावे लागले. मात्र, तेथेही किमान भाव मिळाला.उन्हामुळे संत्रा झाडे वाळलीवाढत्या उन्हामुळे संत्राझाडे वाळत आहे. झाडावर आंबिया बहर फुटला आहे. पाण्याअभावी उष्णतेचे प्रमाण वाढल्याने तसेच विहिरी व बोअर आटल्याने पाण्याची मात्रा वेळेत बसत नाही. त्यामुळे मूग, हरभराच्या आकाराची झालेली संत्राफळे मोठ्या प्रमाणात गळत आहेत. परिणामी संत्रा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. पूर्वीचेच कर्ज फेडणे शक्य नसताना, आणखी कर्जाचा डोंगर हा शेतकरी कसा सहन करणार, असा प्रश्न मोर्शी तालुक्यातील काटपूर धामणगाव येथील शेतकरी विश्वासराव देशमुख यांनी केला. संत्र्याची अनेक झाडे उन्हामुळे वाळली असून, ती कुऱ्हाडीने तोडण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही.येथे जातात संत्राफळेजिल्ह्यातील संत्राफळ चवीने गोड असल्याने नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, केरळ, हैद्राबाद, बैंग्लोर आदी ठिकाणी विशेष मागणी आहे. हंगामात २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने ट्रकद्वारे परराज्यात पोहचविले जातात. एका ट्रकमध्ये ४२० कॅरेट संत्राफळे बसतात. एका कॅरेटचे वजन २३ किलो असतो. एक ट्रक संत्राफळे ६० हजारांत विक्री होते.यावर्षी पोषक वातावरणामुळे फलधारणा चांगली झाली. पण, पाण्याचा अभाव व वाढते तापमान पाहता पिकेल किती, हा यक्षप्रश्न आहे. जमिनीत सध्या आर्द्रता अत्यल्प व तापमान ४० अंशाच्या वर असल्याने छोटी फळे टिकाव धरू शकणार नाही.- रमेश जिचकार, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी लि. वरूड