शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

ग्रामविकासासाठी स्थलांतर रोखणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:13 IST

अमरावती : गत काही वर्षांपासून शासनाने ग्रामीण पातळीवर विकासकामासाठी ग्रामपंचायतींना थेट निधी देण्यास सुरुवात केली आहे. याकरिता लोकसंख्येचे ...

अमरावती : गत काही वर्षांपासून शासनाने ग्रामीण पातळीवर विकासकामासाठी ग्रामपंचायतींना थेट निधी देण्यास सुरुवात केली आहे. याकरिता लोकसंख्येचे निकष अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. परिणामी ग्रामीण भागातून होणारे नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

नागरी स्थलांतर आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता येणाऱ्या काळात विकासात्मक कामात अडचणी येण्याची भीती वर्तविली जात आहे. दीड दशकापासून ग्रामीण भागातील युवक, युवतींनी आपल्या शैक्षणिक नोकरी-व्यवसायानिमित्त ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर करण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. मात्र, याचदरम्यान गावातील विकासात्मक कामाकरिता शासनाचे बदललेले धोरण लक्षात घेता नागरिकांनी रोजगार मिळण्याकरिता ग्रामीण भागात राहूनच नवीन संधी निर्माण करणे आवश्यक आहे. गत १० वर्षांत शासन धोरणाचा अभ्यास केला असता १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शासनाने ग्रामविकास आराखड्याला मंजुरी देतानाच ग्रामस्थांनी लोकसंख्येचे निकष महत्त्वपूर्ण म्हणून त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही वर्षांत ग्रामपंचायतीला थेट प्राप्त होणाऱ्या निधीमुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीतील लोकप्रतिनिधींमधून नाराजी व्यक्त होत होती. आजपर्यंत ग्रामीण भागातील विकासात्मक कामाचे श्रेय येथून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना शासकीय निधीच्या माध्यमातून कामे करून सहजपणे प्राप्त होते. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे ग्रामपंचायत स्तरावर नागरिक एकत्र बसून आपल्या गावाचा विकास आराखडा तयार करू लागल्याने राजकीय महत्त्व कमी होण्याची शंका उपस्थित केली जात आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर ग्रामीण भागातील विकास साधला गेला, हे सर्वश्रुत आहे. गेली अनेक वर्षे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरीकरण वाढले. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

बॉक्स

वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येनुसार

शासनाकडून ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी थेट देताना हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दिला जातो. परिणामी ज्या गावांची लोकसंख्या जास्त तिथे निधीही अधिक आणि जेथे लोकसंख्या कमी तेथे निधी कमी दिला जातो. यात लोकसंख्येचे निकष हे महत्त्वाचा ठरत आहे.