शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

मेट्रोचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे

By admin | Updated: February 1, 2017 00:05 IST

मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली असता...

मध्य रेल्वेचे रवि राणांना पत्र : महानगरात थांबे देण्याबाबत होणार सर्वेक्षणअमरावती: मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली असता मध्य रेल्वे मुंबई विभागाने हा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. प्रस्तावित मेट्रोला महानगरात थांबे देण्यासंदर्भात आ. राणांसोबत रेल्वेचा पत्रव्यवहार सुरू आहे. त्यानुसार लवकरच बडनेरा ते नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीदरम्यान मेट्रो सुरू होईल, असे संकेत आहेत.पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना साकडेअमरावती : आ.रवि राणा यांनी निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमरावती महानगरात मेट्रो सुरू करण्याबाबत साकडे घातले आहे. त्यानुसार आ.राणांनी मध्य रेल्वे मुंबईच्या महाप्रबंधकांना बडनेरा ते एमआयडीसी दरम्यान मेट्रो सुरु करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई विभागाचे उपमहाव्यवस्थापक दिनेश वशिष्ठ यांनी मेट्रोच्या प्रस्तावाला पुढे मान्यतेसाठी रेल्वे मंत्रालयात पाठविले जाईल, असे आ. रवि राणांना १८ जानेवारी रोजी एका पत्राद्वारे कळविले आहे. मेट्रोच्या थांब्याबाबतही लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्याचा झपाट्याने विकास आणि विस्तार होत असल्याच्या पार्श्वभूमिवर मेट्रो सुरु करण्याच्या मागणीने यात विकासात्मक वाढ होईल, असे आ. राणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. मेट्रोच्या प्रस्तावात महानगराचा प्रमुख भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गलतच्या बडनेरा व नांदगाव पेठ या दोन शहरांना मेट्रोने जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात विविध उद्योग साकारले जाणार आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंद्याना कामगार, कुशल मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे बडनेरा शहरालगतच्या गाव-खेड्यातून मोठ्या संख्येने कामगार, मजूर दरदिवशी शहरात येतात. परंतु भविष्यात नांदगावपेठ एमआयडीसीतील कारखाने, उद्योगधंद्यांना लागणारे कामगार, मजुरांना ये-जा करता यावी, यासाठी मेट्रो हे सुलभ व स्वस्त साधन ठरेल, असे आ. रवि राणा यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)या स्थळांचे होणार सर्वेक्षणबडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसी दरम्यान मेट्रो सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. भविष्यात मेट्रोला कुठे थांबे द्यावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. यात बडनेरा, साईनगर, गोपालनगर, नवाथे, राजापेठ, राजकमल चौक, कॉटनमार्केट चौक, इर्विन चौक, पंचवटी, अर्जुननगर, रहाटगाव, नांदगाव पेठ या स्थळांचे सर्वेक्षण होणार आहे.अमरावती महानगरात मेट्रो सुरू व्हावी, ही माझी स्वप्नपूर्ती आहे. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधकांकडे प्रस्ताव सादर केला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले असून मेट्रोचा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयात पाठविण्यात आल्यामुळे मार्ग सुकर झाला आहे.- रवि राणा, आमदार, बडनेरा