शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मेट्रोचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे

By admin | Updated: February 1, 2017 00:05 IST

मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली असता...

मध्य रेल्वेचे रवि राणांना पत्र : महानगरात थांबे देण्याबाबत होणार सर्वेक्षणअमरावती: मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली असता मध्य रेल्वे मुंबई विभागाने हा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. प्रस्तावित मेट्रोला महानगरात थांबे देण्यासंदर्भात आ. राणांसोबत रेल्वेचा पत्रव्यवहार सुरू आहे. त्यानुसार लवकरच बडनेरा ते नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीदरम्यान मेट्रो सुरू होईल, असे संकेत आहेत.पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना साकडेअमरावती : आ.रवि राणा यांनी निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमरावती महानगरात मेट्रो सुरू करण्याबाबत साकडे घातले आहे. त्यानुसार आ.राणांनी मध्य रेल्वे मुंबईच्या महाप्रबंधकांना बडनेरा ते एमआयडीसी दरम्यान मेट्रो सुरु करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई विभागाचे उपमहाव्यवस्थापक दिनेश वशिष्ठ यांनी मेट्रोच्या प्रस्तावाला पुढे मान्यतेसाठी रेल्वे मंत्रालयात पाठविले जाईल, असे आ. रवि राणांना १८ जानेवारी रोजी एका पत्राद्वारे कळविले आहे. मेट्रोच्या थांब्याबाबतही लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्याचा झपाट्याने विकास आणि विस्तार होत असल्याच्या पार्श्वभूमिवर मेट्रो सुरु करण्याच्या मागणीने यात विकासात्मक वाढ होईल, असे आ. राणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. मेट्रोच्या प्रस्तावात महानगराचा प्रमुख भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गलतच्या बडनेरा व नांदगाव पेठ या दोन शहरांना मेट्रोने जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात विविध उद्योग साकारले जाणार आहेत. औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंद्याना कामगार, कुशल मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे बडनेरा शहरालगतच्या गाव-खेड्यातून मोठ्या संख्येने कामगार, मजूर दरदिवशी शहरात येतात. परंतु भविष्यात नांदगावपेठ एमआयडीसीतील कारखाने, उद्योगधंद्यांना लागणारे कामगार, मजुरांना ये-जा करता यावी, यासाठी मेट्रो हे सुलभ व स्वस्त साधन ठरेल, असे आ. रवि राणा यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)या स्थळांचे होणार सर्वेक्षणबडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसी दरम्यान मेट्रो सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. भविष्यात मेट्रोला कुठे थांबे द्यावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. यात बडनेरा, साईनगर, गोपालनगर, नवाथे, राजापेठ, राजकमल चौक, कॉटनमार्केट चौक, इर्विन चौक, पंचवटी, अर्जुननगर, रहाटगाव, नांदगाव पेठ या स्थळांचे सर्वेक्षण होणार आहे.अमरावती महानगरात मेट्रो सुरू व्हावी, ही माझी स्वप्नपूर्ती आहे. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या महाप्रबंधकांकडे प्रस्ताव सादर केला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले असून मेट्रोचा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयात पाठविण्यात आल्यामुळे मार्ग सुकर झाला आहे.- रवि राणा, आमदार, बडनेरा