शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

आत सदस्यांचा गदारोळ ; बाहेर शिक्षकांचे आंदोलन

By admin | Updated: July 19, 2014 23:41 IST

शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या आत सदस्य विविध मुद्यावरुन गदारोळ करीत असताना सभागृहाबाहेर शिक्षकवृंद हे थकीत वेतनाची मागणी रेटून होते. शिक्षकांच्या वेतनाचा वाद चिघळू नये,

वेतनाचा प्रश्न : सर्वसाधारण सभेत पोहोचले अमरावती : शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या आत सदस्य विविध मुद्यावरुन गदारोळ करीत असताना सभागृहाबाहेर शिक्षकवृंद हे थकीत वेतनाची मागणी रेटून होते. शिक्षकांच्या वेतनाचा वाद चिघळू नये, यासाठी विलास इंगोले, बबलू शेखावत, चेतन पवार, हमीदाबी अफजल चौधरी या पदाधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी आदींनी शिक्षकांची समजुत काढली. मात्र शिक्षक वृंद हे सर्वसाधारण सभा संपेपर्यत बाहेरच होते.एप्रिल, मे व जून महिन्याचे थकीत वेतन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरु आहे. आयुक्त, महापौर, पदाधिकाऱ्यांना साकडे घातल्यानंतरही वेतन मिळत नसल्याने शिक्षकांनी थेट शनिवारी सर्वसाधारण सभेच्या बाहेर आंदोलन करुन वेतनाची जोरदार मागणी केली. नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक संकटाच्या सामोरे शिक्षकांना जावे लागत असल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडल्या गेली. येत्या काही दिवसात रमजान ईद असल्याने मुस्लिम समाजाच्या शिक्षकांपुढे बऱ्याच समस्या असल्याची बाब मांडण्यात आली. ईद पूर्वी दोन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही तर २३ जुलै पासून बेमुदत शाळा बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सभागृहाच्या आत सदस्य वेगवेगळया विषयावर चर्चा करीत असताना शिक्षक बाहेर वेतनासाठी बसले होते. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखिची असल्याची बाबही यावेळी चर्चिल्या गेली. पाच शाळांमध्ये ‘ ई-लर्निंग’ ला मंजुरीखासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकांच्या शाळांचा टिकाव लागावा यासाठी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कल्पकतेतून पाच शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ‘ई-लर्निंग’ प्रणाली सुरु करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली. वडाळी, नूरनगर, गोपालनगर, भाजीबाजार व बडनेरा येथील शाळांमध्ये ही प्रणाली सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यावेळी प्रदीप दंदे यांनी विलासनगर येथील शाळेत ही प्रणाली का सुरु करण्यात आली नाही, या विषयावरुन शिक्षण विभागाला धारेवर धरले. निधीची गरज असेल तर वॉर्ड विकासातून घ्या, मात्र विलासनगरातील शाळेत हा उपक्रम राबवा, ही मागणी लावून धरली. उपायुक्त रमेश मवासी यांनी मागणी नुसार या शाळेत ही प्रणाली सुरु करण्याचा शब्द दिला. हा नवीन उपक्रम सुरु केल्याबद्दल मिलिंद बांबल, रिना नंदा, जयश्री मोरे, बबलू शेखावत, निलिमा काळे आदींनी प्रशासनाचे कौतूक केले.