शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अचलपुरात व्यापाऱ्यांचा माल रस्त्यावर

By admin | Updated: February 4, 2015 23:07 IST

येथील काही व्यापारी आपल्या प्रतिष्ठानचा माल अर्ध्या रस्त्यापर्यंत आणून ठेवतात. काही जण दुकानाचा फलक रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.

वाहतूक विस्कळीत : नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त अचलपूर : येथील काही व्यापारी आपल्या प्रतिष्ठानचा माल अर्ध्या रस्त्यापर्यंत आणून ठेवतात. काही जण दुकानाचा फलक रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. पायी चालणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन यावर काहीच कारवाई करायला तयार नाही.जुळ्या शहरात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांना तोंड देताना नागरिक अगदी मेटाकुटीला आले आहेत. अतिक्रमण मग ते छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे असेल किंवा आमचे कोण काय बिघडवते, असे मनात ठामपणे मांडून काही मोठे व्यापारी राजरोसपणे आपापल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानातील माल अगदी रहदारीला अडथळा निर्माण होईल इतपत रस्त्यावर आणून लावण्यात स्वत:ला धन्य समजत आहे. एवढेच नव्हे, तर फलक दुकानावर लावलेले असतानाही दुसरे फलक रस्त्याच्या मधोमध आणून रहदारीला अडथळा निर्माण करण्याचे कार्य अगदी न चुकता करीत आहेत. असे चित्र परतवाड्यातील बस स्थानक मार्ग, मेन रोड, सदर बाजार, गुजरी बाजार, दुराणी चौक, मिश्रा चौक यासह आदी ठिकाणी हमखास बघायला मिळते. अचलपूर येथे चावलमंडी, देवडी, पोलीस स्टेशन रोड, उपजिल्हा रुग्णालयाचा रस्ता, गांधी पूल, सराफा लाईन, बुद्धेखा चौक आदी ठिकाणी यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.यात आणखी भर म्हणजे अस्तव्यस्त उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांची गर्दी आदी प्रकारामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. बाजारहाट करायला निघालेल्या महिलांना याचा विशेष करून अधिक त्रास सहन करावा लागत आहे. बेशिस्तपणे वाहने उभे करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची व्यवस्था नगरपरिषदेकडे आहे. पण त्यांचा वापर न करता नगरपरिषद संपूर्णपणे पोलीस प्रशासनावर अवलंबून राहत आली आहे. पोलीस आपल्या कामात किती तत्पर आहे याचे भान नगरपरिषदेला नाही, असेच म्हणावे लागेल.नगरपरिषदेद्वारा काही दिवसांपूर्वी अनेक भागात डांबरी रस्ते तर कुठे काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले. मात्र यारस्त्यांचे काम कसे होत आहे त्याचा दर्जा काय आहे, डांबराचे प्रमाण बरोबर आहे की नाही, सिमेंटच्या रस्त्यात सिमेंट किती टाकले याची दखल कोणीही घेताना दिसले नव्हते. या कामांवर कधी नगरपरिषदेचा अधिकारी आढळून आला नव्हता. शहरात झालेल्या डांबरी व काँक्रीट रस्त्याचे बांधकाम नित्कृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. याला जबाबदार कोण? सगळा कमिशनचा धंदा सुरू असल्याचे बोलले जाते.जनतेचा पैसा असा उधळण्यासाठी कोणी परवानगी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीच याबाबत कानउघाडणी करण्याची गरज आहे. शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकामे सुरू असल्याचा आणि बांधकाम साहित्य टाकण्याचे प्रकार तर चिंतेचा विषय बनला आहे. सुस्त प्रशासनास कोणीतरी जागे करण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)