शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

अण्णाभाऊंच्या स्मृतींचा अनुयायांना विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:17 IST

येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या बाजूस महापालिका संकुलासमोर उभारण्यात आलेला अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा प्लास्टिकने कापडाने झाकून कायम दुर्लक्षित केले आहे.

अनास्था : पुतळ्याला हारही नाहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या बाजूस महापालिका संकुलासमोर उभारण्यात आलेला अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा प्लास्टिकने कापडाने झाकून कायम दुर्लक्षित केले आहे. मात्र, मंगळवारी १८ जुलै रोजी अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनी मातंग समाजातील एकही अनुयायी अभिवादन करावयास फिरकले नाही, हे वास्तव आहे.लोकशाहीर, क्रांतिकारी साहित्यिक असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मातंग समाजाच्या भल्यासाठी अख्खे आयुष्य वेचले. गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज पुढारावा, शिक्षित व्हावा, यासाठी अण्णाभाऊंनी साहित्य, लेखणीतून समाजप्रबोधनाचे कार्य केले. आजही शासन, प्रशासन स्तरावर मातंग समाजाच्या मागण्या, प्रश्न सोडवायच्या झाल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा, नावांचा वापर करण्यास पुढारी मागे राहत नाही. शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षिततेने काही वर्षांपासून खितपत पडलेला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याबाबत कार्यकर्त्यांनी जाब विचारू नये, ही शोकांतिका आहे. अण्णाभाऊंचा पुतळा दर्शनी भागात उभारण्याची मागणी पुढाऱ्यांच्या दुफळीमुळे मागे पडली आहे. हा पुतळा नेमका कोठे उभारावा? याविषयी पुढाऱ्यांमध्येच एकमत झाले नाही. त्यामुळे तीन ते चार वर्षांपासून अण्णाभाऊंचा पुतळा अस्वच्छता, घाणीच्या विळख्यात उभा आहे. अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनी पुढारलेल्या म्हणणाऱ्या एकाही कार्यकर्त्यांने प्लास्टिकने झाकून ठेवलेला पुतळ्याची स्वच्छता करू नये, स्मृतिदिनी पुतळ्याला अभिवादन करण्याचे साधे सौजन्यसुद्धा दाखवू नये, यातच समाजाची चळवळ कोणत्या दिशेने चालली, हे स्पष्ट होत आहे.अण्णाभाऊंच्या पुतळा स्थानांतरणसंदर्भात यापूर्वी महापालिका आयुक्तांना भेटले आहे. मातंग समाजावरच अन्याय का केला जातो, याबाबत विचारणा केली. अन्य शहरात एकाच चौकात दोन पुतळे बसविले असताना अमरावतीत राणी दुर्गावती व अण्णाभाऊंचा पुतळा का बसविला जात नाही. १ आॅगस्टपर्यंत तरी अण्णाभाऊंचा पुतळा दर्शनी भागात साकारावा, अशी अपेक्षा.- गंगा अंभारे, नगरसेविका, बडनेरा प्रभाग.