शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटचा देशपातळीवर गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST

अनिल कडू परतवाडा : मेळघाटातील ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त डॉक्टर कोल्हे दाम्पत्यामुळे मेळघाट पुन्हा देशपातळीवर झळकला, तो ‘कौन बनेगा करोडपती?’च्या निमित्ताने. ...

अनिल कडू

परतवाडा : मेळघाटातील ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त डॉक्टर कोल्हे दाम्पत्यामुळे मेळघाट पुन्हा देशपातळीवर झळकला, तो ‘कौन बनेगा करोडपती?’च्या निमित्ताने. शुक्रवारी आणि शनिवारी या कार्यक्रमाच्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात हॉट सीटवर विराजमान कोल्हे दाम्पत्याशी महानायक अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला.

डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे या दाम्पत्याचे मेळघाटातील सामजकार्य, आदिवासींची सेवा, वैद्यकीय सेवा, लोकोपयोगी कार्यासह त्यांच्या साध्या जीवनपद्धतीवर अमिताभ बच्चन यांनी प्रकाश टाकला. त्यांची विशेष मुलाखत घेतली. यापूर्वी ‘लोकमत’ने ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इअर’ अंतर्गत कोल्हे दाम्पत्याचा गौरव केला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेत मदतीचा हातही दिला.

मेळघाटातील अतिदुर्गम बैरागड गावासह परिसरातील आदिवासींकरिता कोल्हे दाम्पत्याचे कार्य उल्लेखनीय आहे. मेळघाटातीेल समाजकार्य, वैद्यकीय सेवेतील योगदान, आदिवासींची विचारधारा आणि श्रद्धा व प्रश्नांसह आलेले अनुभव डॉ. रवींद्र कोल्हे यांनी हॉट सीटवरून महानायक अमिताभ बच्चन यांसोबत पर्यायाने देशवासीयांसोबत शेअर केले. या संवादात सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर येथे कार्यरत तत्कालीन अभियंता छोटू वरणगावकर (रा. अमरावती) या आपल्या मित्राचा बैरागडच्या अनुषंगाने हॉट सीटवरून खास उल्लेखही केला. या दोघांनीही एकमेकांच्या स्वभावाचा, आवडीनिवडीचा उलगडा याप्रसंगी केला.

कोल्हे दाम्पत्याकडून फिफ्टी-फिफ्टी

अमिताभ बच्चन यांनी कोल्हे दाम्पत्याला एकूण १३ प्रश्न विचारलेत. त्यांनी दोन लाईफ लाईनचा वापर केला. ११ व्या प्रश्नावर फिप्टी-फिप्टीचा वापर केला. बारावा प्रश्न त्यांनी माय नेम माय सिटी अंतर्गत बदलवून घेतला. यात त्यांना चिखलदऱ्यावर प्रश्न विचारला गेला. महाराष्ट्रातील ती जागा, जिथे महाभारतातील पात्र किचकाचा भीमाने वध केल्याची मान्यता आहे, असा तो प्रश्न होता. यावर कोल्हे दाम्पत्याने ‘चिखलदरा’ असे अचूक उत्तर दिले. नेमक्या या प्रश्नाच्या उत्तरातून चिखलदऱ्याची ओळख देशवासीयांपुढे आली.

बैरागड झळकले

कार्यक्रमादरम्यान मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रातील ‘बैरागड’ हे गाव महाराष्ट्रासह देशाच्या नकाशावर ठळक अक्षरात दाखवले गेले. बैरागड देशपातळीवर पोहोचले. याप्रसंगी त्यांचा मुलगा राम कोल्हेही उपस्थित होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या अनुषंगाने विचारलेल्या १३ व्या प्रश्नावर बाबा आमटेंच्या उत्तराने २५ लाखांवर या कार्यक्रमाची सांगता झाली.

स्वप्ने बघा

डॉक्टरांनी पेशंटला पाठ दाखवू नये, गरजू रुग्णाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, असा सल्ला डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिला. स्वप्ने बघावीत, असा सल्ला डॉ. स्मिता कोल्हे यांनी या हॉट सीटवरून महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमक्ष देशवासीयांना दिला.