शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

मेळघाट, पोहरा म्हणजे ‘आॅक्सिजन बँक’

By admin | Updated: June 5, 2015 00:28 IST

मानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे, तर निसर्ग हा वृक्ष व वन्यजीवांवर अवलंबून आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीमानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे, तर निसर्ग हा वृक्ष व वन्यजीवांवर अवलंबून आहे. असेच निसर्गरम्य वातावरणासह जैवविविधतेने संपन्न असलेले जिल्ह्यातील मेळघाट व पोहऱ्याचे जंगल हे अमरावतीकरांसाठी आॅक्सिजन बँकेचे कार्य करीत आहे. मात्र, मानवाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे या निसर्गाच्या ठेव्याला प्रदूषणाचे गालबोट लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. निसर्गरम्य वातावरणाला लागतेय प्रदूषणाचे गालबोटअमरावती : आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अमरावती जिल्ह्यातील ३ हजार चौरस मीटरचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. त्यामध्ये मेळघाट अभयारण्य, गुगामल उद्यान, ढाकणा, कोलखास, पोहरा व मालखेडचे राखीव जंगल आहे. निसर्गाने या जिल्ह्याला भरभरून जैववैविध्य दिले आहे. ही जंगले पर्यावरण संतुलनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुस समजले जाते. हवेतील कार्बनडाय आॅक्साईड शोषून मानवी जीवनासाठी महत्वाचा असणारा आॅक्सीजन जंगलामधून मिळतो. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवाचा जंगलक्षेत्रातील हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरण दूषित होत आहे. एकीकडे जागतिक तापमान वाढत चालले आहे. तर दुसरीकडे नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या जंगलतोडीमुळे व प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.३१८ प्रजातींचे पक्षीजिल्ह्यातील जंगलात ३१८ प्रजातींच्या पक्ष्यांची आजपर्यंत नोंद झाली आहेत. त्यात १२ ते १३ दुर्मीळ पक्ष्यांचा समावेश आहे. ११३ वर्षांपासून न आढळलेला रानपिंगळा सन २००३ मध्ये आढळून आला. रानपिंगळा हा दिनचर असून तो जागतिक कीर्तीचा पक्षी आहे. त्याचप्रमाणे अंडी खाणारा दुर्र्मिळ साप नामशेष झाल्याचे बोलले जात होते. मात्र, हा सापही जंगलात आढळून आला. २४ मोठे तलाव जंगलातील नद्या या मानवी जीवनासाठी मोठा आधार आहेत. नदी-नाल्यांच्या या प्रवाहामुळेच जिल्ह्यात २४ मोठे तलाव निर्माण झाले आहेत. जंगल टिकेल तर पाणी मिळेल आणि तरच मानवी जीवनही टिकेल, हा पर्यावरणाचा नियमच आहे.शिकार, वृक्षतोड, प्रदूषणाचे संकटजंगलातील वन्यप्राण्यांची शिकार, वृक्षतोड व वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणासाठी संकट निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या शिकारीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकचा वापर घातक ठरतोय.तापमान वाढ : गेल्या ५० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात ०.०५ ते ०.०९ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पृथ्वीचे तापमान जर असेच वाढले तर १०० ते १५० वर्षांनी तापमानामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल. या गोष्टीला जगप्रसिद्धी वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स यांनी दुजोरा दिला. तसेच ४ ते ५ वर्षात अंटाकर््िटकावरील संपूर्ण बर्फ वितळून समुद्राकाठची बंदरे पाण्यात बुडतील. असे झाल्यास मुंबई, कराची, टोकियो या बंदरांना धोका संंभवतो. पृथ्वीला धुमकेतूची टक्कर : २० आॅगस्ट २०२६ रोजी ‘स्वीफ्टल’ हा अवाढव्य धुमकेतू पृथ्वीला टक्कर देईल. यापूर्वी २१ जुलै १९९४ रोजी ‘शुमेकर लेव्ही’ या धुमकेतूने गुरू ग्रहाला टक्कर दिली होती. यामुळे गुरूचा पृष्ठभाग काळा झाला होता.