शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट, पोहरा म्हणजे ‘आॅक्सिजन बँक’

By admin | Updated: June 5, 2015 00:28 IST

मानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे, तर निसर्ग हा वृक्ष व वन्यजीवांवर अवलंबून आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीमानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे, तर निसर्ग हा वृक्ष व वन्यजीवांवर अवलंबून आहे. असेच निसर्गरम्य वातावरणासह जैवविविधतेने संपन्न असलेले जिल्ह्यातील मेळघाट व पोहऱ्याचे जंगल हे अमरावतीकरांसाठी आॅक्सिजन बँकेचे कार्य करीत आहे. मात्र, मानवाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे या निसर्गाच्या ठेव्याला प्रदूषणाचे गालबोट लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. निसर्गरम्य वातावरणाला लागतेय प्रदूषणाचे गालबोटअमरावती : आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अमरावती जिल्ह्यातील ३ हजार चौरस मीटरचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. त्यामध्ये मेळघाट अभयारण्य, गुगामल उद्यान, ढाकणा, कोलखास, पोहरा व मालखेडचे राखीव जंगल आहे. निसर्गाने या जिल्ह्याला भरभरून जैववैविध्य दिले आहे. ही जंगले पर्यावरण संतुलनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुस समजले जाते. हवेतील कार्बनडाय आॅक्साईड शोषून मानवी जीवनासाठी महत्वाचा असणारा आॅक्सीजन जंगलामधून मिळतो. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवाचा जंगलक्षेत्रातील हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरण दूषित होत आहे. एकीकडे जागतिक तापमान वाढत चालले आहे. तर दुसरीकडे नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या जंगलतोडीमुळे व प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.३१८ प्रजातींचे पक्षीजिल्ह्यातील जंगलात ३१८ प्रजातींच्या पक्ष्यांची आजपर्यंत नोंद झाली आहेत. त्यात १२ ते १३ दुर्मीळ पक्ष्यांचा समावेश आहे. ११३ वर्षांपासून न आढळलेला रानपिंगळा सन २००३ मध्ये आढळून आला. रानपिंगळा हा दिनचर असून तो जागतिक कीर्तीचा पक्षी आहे. त्याचप्रमाणे अंडी खाणारा दुर्र्मिळ साप नामशेष झाल्याचे बोलले जात होते. मात्र, हा सापही जंगलात आढळून आला. २४ मोठे तलाव जंगलातील नद्या या मानवी जीवनासाठी मोठा आधार आहेत. नदी-नाल्यांच्या या प्रवाहामुळेच जिल्ह्यात २४ मोठे तलाव निर्माण झाले आहेत. जंगल टिकेल तर पाणी मिळेल आणि तरच मानवी जीवनही टिकेल, हा पर्यावरणाचा नियमच आहे.शिकार, वृक्षतोड, प्रदूषणाचे संकटजंगलातील वन्यप्राण्यांची शिकार, वृक्षतोड व वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणासाठी संकट निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या शिकारीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकचा वापर घातक ठरतोय.तापमान वाढ : गेल्या ५० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात ०.०५ ते ०.०९ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पृथ्वीचे तापमान जर असेच वाढले तर १०० ते १५० वर्षांनी तापमानामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल. या गोष्टीला जगप्रसिद्धी वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स यांनी दुजोरा दिला. तसेच ४ ते ५ वर्षात अंटाकर््िटकावरील संपूर्ण बर्फ वितळून समुद्राकाठची बंदरे पाण्यात बुडतील. असे झाल्यास मुंबई, कराची, टोकियो या बंदरांना धोका संंभवतो. पृथ्वीला धुमकेतूची टक्कर : २० आॅगस्ट २०२६ रोजी ‘स्वीफ्टल’ हा अवाढव्य धुमकेतू पृथ्वीला टक्कर देईल. यापूर्वी २१ जुलै १९९४ रोजी ‘शुमेकर लेव्ही’ या धुमकेतूने गुरू ग्रहाला टक्कर दिली होती. यामुळे गुरूचा पृष्ठभाग काळा झाला होता.