शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मनपा प्रशासन 'बांधकाम'वर मेहेरबान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:07 IST

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या शासननिर्णयाचा आधार घेत आतापर्यंत ...

कंत्राटींची सेवा सुरुच : पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय अमरावती: सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या शासननिर्णयाचा आधार घेत आतापर्यंत महापालिकेतील १८ अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले.मात्र बांधकामसह अन्य विभागातील बडे कंत्राटी अधिकारी जैसे थे असल्याने त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कंत्राटी अतिरिक्त शहर अभियंत्यासह, उपअभियंता आणि शिक्षणाधिकाऱ्यानांही ८ जानेवारीचा तोच शासननिर्णय लागू असल्याचे मत आयुक्त हेमंत पवार यांनी व्यक्त केले होते.मात्र १० दिवस उलटल्यानंतरही उर्वरित कंत्राटी अधिकाऱ्यांबाबत आयुक्त अद्यापपर्यंत निर्णय घेऊ शकले नाहीत. त्या अनुषंगाने आता महापालिकेत मेहरबानीची कुजबूज सुरू झाली आहे.तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मागील वर्षी २७ सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा कंत्राटी तत्वावर घेतली होती. यात अतिरिक्त शहर अभियंत्यासह ,उपअभियंता, शिक्षणाधिकारी आणि अन्य काहींचा समावेश होता. आस्थापना खर्च अधिक असल्याने आणि नोकरभरतीवर बंदी असल्याने महापालिकेतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.यापैकी बांधकाम विभागातील अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार आणि अतिरिक्त उपअभियंते एस.पी. देशमुख आणि नंदकिशोर राऊत यांना मुदतवाढही देण्यात आली.दरम्यान सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय धडकला. यात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा केवळ विवक्षित कामांसाठीच घेण्यात याव्यात ,यासह अन्य अटी -शर्तीचा समावेश होता. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पध्दतीने घेताना पारिश्रमकांची मर्यादा ४० हजार ठरविण्यात आली. या शासननिर्णयानुसार प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनाही तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिल्या. मात्र ती फाईल धूळखात पडली राहिली. दरम्यान गुडेवारांची बदली होऊन हेमंतकुमार पवार रुजू झाले. महापालिकेचे कामकाज हाताळताना कंत्राटी सेवानिवृत्तांची फाईल त्यांच्या हाती आली.व त्यांनी धडक निर्णय घेउन पहिल्या झटक्यात तब्बल १५ सेवानिवृत्तांना कार्यमुक्त केले. त्यामुळे साहजिकच उर्वरित कंत्राटी सेवानिवृत्तांबाबतही त्याच शासननिर्णयाच्या अधीन राहून आदेश पारित होतील, अशी धास्ती अनेकांना लागून राहिली होती. मात्र अनामिक वरदहस्ताने संबंधितांची ती धास्ती दूर झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. (प्रतिनिधी)