शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

मनपा प्रशासन 'बांधकाम'वर मेहेरबान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:07 IST

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या शासननिर्णयाचा आधार घेत आतापर्यंत ...

कंत्राटींची सेवा सुरुच : पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय अमरावती: सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या शासननिर्णयाचा आधार घेत आतापर्यंत महापालिकेतील १८ अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले.मात्र बांधकामसह अन्य विभागातील बडे कंत्राटी अधिकारी जैसे थे असल्याने त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कंत्राटी अतिरिक्त शहर अभियंत्यासह, उपअभियंता आणि शिक्षणाधिकाऱ्यानांही ८ जानेवारीचा तोच शासननिर्णय लागू असल्याचे मत आयुक्त हेमंत पवार यांनी व्यक्त केले होते.मात्र १० दिवस उलटल्यानंतरही उर्वरित कंत्राटी अधिकाऱ्यांबाबत आयुक्त अद्यापपर्यंत निर्णय घेऊ शकले नाहीत. त्या अनुषंगाने आता महापालिकेत मेहरबानीची कुजबूज सुरू झाली आहे.तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मागील वर्षी २७ सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा कंत्राटी तत्वावर घेतली होती. यात अतिरिक्त शहर अभियंत्यासह ,उपअभियंता, शिक्षणाधिकारी आणि अन्य काहींचा समावेश होता. आस्थापना खर्च अधिक असल्याने आणि नोकरभरतीवर बंदी असल्याने महापालिकेतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.यापैकी बांधकाम विभागातील अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार आणि अतिरिक्त उपअभियंते एस.पी. देशमुख आणि नंदकिशोर राऊत यांना मुदतवाढही देण्यात आली.दरम्यान सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय धडकला. यात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा केवळ विवक्षित कामांसाठीच घेण्यात याव्यात ,यासह अन्य अटी -शर्तीचा समावेश होता. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पध्दतीने घेताना पारिश्रमकांची मर्यादा ४० हजार ठरविण्यात आली. या शासननिर्णयानुसार प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनाही तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिल्या. मात्र ती फाईल धूळखात पडली राहिली. दरम्यान गुडेवारांची बदली होऊन हेमंतकुमार पवार रुजू झाले. महापालिकेचे कामकाज हाताळताना कंत्राटी सेवानिवृत्तांची फाईल त्यांच्या हाती आली.व त्यांनी धडक निर्णय घेउन पहिल्या झटक्यात तब्बल १५ सेवानिवृत्तांना कार्यमुक्त केले. त्यामुळे साहजिकच उर्वरित कंत्राटी सेवानिवृत्तांबाबतही त्याच शासननिर्णयाच्या अधीन राहून आदेश पारित होतील, अशी धास्ती अनेकांना लागून राहिली होती. मात्र अनामिक वरदहस्ताने संबंधितांची ती धास्ती दूर झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. (प्रतिनिधी)