शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

उपजिल्हाधिकाऱ्यांना संत्री, सोयाबीन कुटार भेट

By admin | Updated: November 1, 2014 22:45 IST

चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यात संत्रा, सोयाबीन, कपाशी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार

अमरावती : चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यात संत्रा, सोयाबीन, कपाशी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, याकरिता शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांना सोयाबीन कुटार व संत्री भेट देऊन तीव्र भावना शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.अचलपूर मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांमध्ये सोयाबीन, कपाशी, संत्रा पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु यंदा अपुरा पाऊस तसेच गारपीट व अवकाळी पाऊसामुळे वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर मोठा आघात झाल्यामुळे या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावण्यासाठी राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, अशी मागणी प्रहार पक्षातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे नापिकीमुळे झालेले नुकसान दाखविण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना सोयाबीनचे कुटार व संत्र्याचे झालेले नुकसान दाखवून आपला संताप शासनापर्यंत पोहविण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रहारचे मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, सुरेश गणेशकर, बाळासाहेब वाकोडे, राजेश सोलव, भाष्कर सांयदे शिवा भुयार, अजय तायडे, गजानन ठाकरे, एकनाथ अवसरमोल, संतोष किटुकले, भगवंत दामेधर, संजय झिंगरे, अजय राऊत, सुरेश भेंडे, सतीश राऊत, अरूण गणथडे, याशिम कुरेशी, नामदेव सावरकर व अन्य आर्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)