शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्येच ‘मे हीट’चा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

अमरावती : दरवर्षी मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या उन्हाच्या जोरदार झळा यंदा एप्रिलच्या प्रारंभीच जाणवायला लागल्या आहेत. उन्हाच्या काहिलीनेमुळे नागरिकांचा जीव ...

अमरावती : दरवर्षी मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या उन्हाच्या जोरदार झळा यंदा एप्रिलच्या प्रारंभीच जाणवायला लागल्या आहेत. उन्हाच्या काहिलीनेमुळे नागरिकांचा जीव खाली-वर होऊ लागला असून, कूलर, पंखे काम करेनासे झाले आहेत. उन्हाच्या काहिलीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या काम करण्याच्या वेळांमध्ये मागील तीन ते चार दिवसांत बदल झाला आहे.

जिल्ह्यात तापमान ४२ अंशाच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिलमध्येच असे असेल, तर मेमध्ये कसे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.. सकाळी ९ पासूनच उन्हाच्या झळा बसणे सुरू झाले आहे. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला यांना त्रास होऊ लागला आहे. वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागातदेखील शेतीच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भल्या सकाळी शेतकरी व शेतमजूर कामासाठी शेताच्या वाटेवर दिसून येत आहेत. दुपारी विश्रांती घेत सकाळी व सायंकाळी शेतीची कामे उरकण्यावर शेतकरी व शेतमजुरांचा भर आहे. तापमानाचा पारा किती चढणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक धडपडत आहेत. वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

बॉक्स

कामाच्या वेळेत बदल

मार्चअखेर वाढलेल्या तापमानामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली. आगामी दिवसात सूर्य आणखी आग ओकणार असल्याच्या चिंतेने नागरिक हैराण झाले आहेत. शेतीची कामे सकाळी व सायंकाळच्या टप्प्यात करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे.

बॉक्स

कूलर, पंख्याची हवाही गरम

उन्हाचा तडाखा वाढतच असल्याने पंखे किंवा कूलर काम करेनासे झाले आहेत. गरमीपासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक तापमानाचा पारा खाली जाण्याची वाट पाहत आहेत.