शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

एप्रिलमध्येच ‘मे हीट’चा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

अमरावती : दरवर्षी मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या उन्हाच्या जोरदार झळा यंदा एप्रिलच्या प्रारंभीच जाणवायला लागल्या आहेत. उन्हाच्या काहिलीनेमुळे नागरिकांचा जीव ...

अमरावती : दरवर्षी मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या उन्हाच्या जोरदार झळा यंदा एप्रिलच्या प्रारंभीच जाणवायला लागल्या आहेत. उन्हाच्या काहिलीनेमुळे नागरिकांचा जीव खाली-वर होऊ लागला असून, कूलर, पंखे काम करेनासे झाले आहेत. उन्हाच्या काहिलीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या काम करण्याच्या वेळांमध्ये मागील तीन ते चार दिवसांत बदल झाला आहे.

जिल्ह्यात तापमान ४२ अंशाच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिलमध्येच असे असेल, तर मेमध्ये कसे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.. सकाळी ९ पासूनच उन्हाच्या झळा बसणे सुरू झाले आहे. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला यांना त्रास होऊ लागला आहे. वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागातदेखील शेतीच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भल्या सकाळी शेतकरी व शेतमजूर कामासाठी शेताच्या वाटेवर दिसून येत आहेत. दुपारी विश्रांती घेत सकाळी व सायंकाळी शेतीची कामे उरकण्यावर शेतकरी व शेतमजुरांचा भर आहे. तापमानाचा पारा किती चढणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक धडपडत आहेत. वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

बॉक्स

कामाच्या वेळेत बदल

मार्चअखेर वाढलेल्या तापमानामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली. आगामी दिवसात सूर्य आणखी आग ओकणार असल्याच्या चिंतेने नागरिक हैराण झाले आहेत. शेतीची कामे सकाळी व सायंकाळच्या टप्प्यात करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे.

बॉक्स

कूलर, पंख्याची हवाही गरम

उन्हाचा तडाखा वाढतच असल्याने पंखे किंवा कूलर काम करेनासे झाले आहेत. गरमीपासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक तापमानाचा पारा खाली जाण्याची वाट पाहत आहेत.