शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शहीद- वनशहिदांना अधिकृत दर्जाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

अनिल कडू परतवाडा : वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या शहीद वनअधिकारी व ...

अनिल कडू

परतवाडा : वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या शहीद वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांना शहिदांचा अधिकृत दर्जाच देण्यात आलेला नाही. सेवापुस्तिकेत वनशहीद म्हणून साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. वनक्षेत्रातील स्थळांना त्यांची नावेही देण्यात आलेली नाहीत. दर्जा प्राप्त नसल्यामुळे अन्य विभागातील शहिदांच्या कुटुंबीयांना ज्या सवलती दिल्या जातात, जो मान-सन्मान आर्थिक लाभासह दिला जातो, तो वनशहिदांना मिळत नाही.

केंद्र शासनाच्या ७ मे २०१३ च्या अधिसूचनेनुसार ११ सप्टेंबर हा राष्ट्रीय वनहुतात्मा दिन म्हणून घोषित केला गेला. केवळ या दिवशी या वनशहिदांची आठवण काढली जाते. वन व वन्यजीव विभागांतर्गत काही ठिकाणी शहीद स्तंभ उभारण्याची औपचारिकता पूर्ण केली गेली. त्यावर त्या-त्या क्षेत्रातील वनशहिदांची नावे अंकित केली गेली आहेत. या दिवसाला वनशहिदांची आठवण काढून शहीद स्तंभाजवळ पुष्पचक्र वनअधिकारी अर्पण करतात. पण, सर्व शस्त्र वनविभागाकडे उपलब्ध असूनही हवेत फायर करून सलामी दिली जात नाही.

-----

वनशहीद वनविभागाकडून दुर्लक्षित

मेळघाट वन व वन्यजीव विभागांतर्गत वनक्षेत्रातील स्थळांना जिवंत अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. यातील काही अधिकाऱ्यांची नावे वनविश्रामगृहाला वनकुटी म्हणून, तर काही पाणवठ्यांना देण्यात आली आहेत. कार्यरत वरिष्ठ वनअधिकारी या नावांचे कौतुकही करतात. पण, वनशहिदांची आठवण या अधिकाऱ्यांना येत नाही.

----------------

वनशहिदांची नावे द्या

वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कर्तव्य बजावत असतांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या, शहीद, वनअधिकारी व वन कर्मचाऱ्यांची नावे, वनक्षेत्रातील संरक्षण कुटीसह विश्रामगृह कक्ष, वन उद्यान व प्रेक्षणीय स्थळांना देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना, नागपूरच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष पी.व्ही. बाळापुरे यांनी केली आहे. तसे पत्र बाळापुरे यांनी अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षकांना दिले आहे.

--------------

४० लाखांचा प्रस्ताव दुर्लक्षित

वन व वन्यजिवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावताना वनअधिकारी, वनकर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून ४० लाखाची विमा रक्कम मिळावी, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी ९ सप्टेंबर २०२० रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास २० लाख, तर गंभीर दुखापत झाल्यास पाच लाख विमा रक्कम मिळावी, असेही या प्रस्तावात नमूद आहे. महाराष्ट्र शासनाने यात धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव सादर करताना कर्नाटक सरकारने दिलेल्या विमा संरक्षणाचा उल्लेखही त्यांनी केला. पण, आजही हा प्रस्ताव दुर्लक्षित आहे.