शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

शहीद- वनशहिदांना अधिकृत दर्जाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

अनिल कडू परतवाडा : वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या शहीद वनअधिकारी व ...

अनिल कडू

परतवाडा : वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या शहीद वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांना शहिदांचा अधिकृत दर्जाच देण्यात आलेला नाही. सेवापुस्तिकेत वनशहीद म्हणून साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. वनक्षेत्रातील स्थळांना त्यांची नावेही देण्यात आलेली नाहीत. दर्जा प्राप्त नसल्यामुळे अन्य विभागातील शहिदांच्या कुटुंबीयांना ज्या सवलती दिल्या जातात, जो मान-सन्मान आर्थिक लाभासह दिला जातो, तो वनशहिदांना मिळत नाही.

केंद्र शासनाच्या ७ मे २०१३ च्या अधिसूचनेनुसार ११ सप्टेंबर हा राष्ट्रीय वनहुतात्मा दिन म्हणून घोषित केला गेला. केवळ या दिवशी या वनशहिदांची आठवण काढली जाते. वन व वन्यजीव विभागांतर्गत काही ठिकाणी शहीद स्तंभ उभारण्याची औपचारिकता पूर्ण केली गेली. त्यावर त्या-त्या क्षेत्रातील वनशहिदांची नावे अंकित केली गेली आहेत. या दिवसाला वनशहिदांची आठवण काढून शहीद स्तंभाजवळ पुष्पचक्र वनअधिकारी अर्पण करतात. पण, सर्व शस्त्र वनविभागाकडे उपलब्ध असूनही हवेत फायर करून सलामी दिली जात नाही.

-----

वनशहीद वनविभागाकडून दुर्लक्षित

मेळघाट वन व वन्यजीव विभागांतर्गत वनक्षेत्रातील स्थळांना जिवंत अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. यातील काही अधिकाऱ्यांची नावे वनविश्रामगृहाला वनकुटी म्हणून, तर काही पाणवठ्यांना देण्यात आली आहेत. कार्यरत वरिष्ठ वनअधिकारी या नावांचे कौतुकही करतात. पण, वनशहिदांची आठवण या अधिकाऱ्यांना येत नाही.

----------------

वनशहिदांची नावे द्या

वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचे कर्तव्य बजावत असतांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या, शहीद, वनअधिकारी व वन कर्मचाऱ्यांची नावे, वनक्षेत्रातील संरक्षण कुटीसह विश्रामगृह कक्ष, वन उद्यान व प्रेक्षणीय स्थळांना देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना, नागपूरच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष पी.व्ही. बाळापुरे यांनी केली आहे. तसे पत्र बाळापुरे यांनी अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षकांना दिले आहे.

--------------

४० लाखांचा प्रस्ताव दुर्लक्षित

वन व वन्यजिवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावताना वनअधिकारी, वनकर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून ४० लाखाची विमा रक्कम मिळावी, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी ९ सप्टेंबर २०२० रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास २० लाख, तर गंभीर दुखापत झाल्यास पाच लाख विमा रक्कम मिळावी, असेही या प्रस्तावात नमूद आहे. महाराष्ट्र शासनाने यात धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव सादर करताना कर्नाटक सरकारने दिलेल्या विमा संरक्षणाचा उल्लेखही त्यांनी केला. पण, आजही हा प्रस्ताव दुर्लक्षित आहे.