शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण शाळा बोर्डाकडे पाठविणार ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोना संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र, राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित केली असून, ...

अमरावती : कोरोना संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र, राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित केली असून, प्रत्येक शाळांना विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन पाठवावे लागेल. याशिवाय गुणांची हार्डकॉपी विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविणे अनिवार्य राहील.

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी इयत्ता दहावीच्या परीक्षांचे मू्ल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. ११ ते ३० जून या कालावधीत शाळांची जबाबदारी, विषय निहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केले आहे. इयता नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यावे लागणार आहे. शाळांना एकत्रित गुण केल्यानंतर ते मुख्याध्यपकांना लिंकद्धारे ऑनलाईन पाठवावे लागेल. ही सर्व प्रक्रिया ३० जूनपर्यंत करावी लागणार आहे. याशिवाय एकत्रित शाळानिहाय दहावीच्या गुणांची यादी, विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांकांची हॉर्ड कॉपी मुख्याध्यापकांना बोर्डाकडे पाठवावी लागेल. राज्य शिक्षण मंडळाने विषयनिहाय गुण देणे आणि निकालाबाबतचे मार्गदर्शन शिक्षकांसाठी यू ट्युबवर उपलब्ध आहे.

--------------------

१५ जुलैनंतर दहावीचा निकाल जाहीर होणार

११ ते ३० जून या कालावधीत शाळांना दहावीच्या गुणांबाबत प्रक्रिया करावी लागणार आहे. ३० जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे गुणांसह आवश्यक माहिती आल्यानंतर ही माहिती राज्य शिक्षण मंडळाकडे ३ जुलैपर्यंत रवाना करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, छपाई करणे आदी प्रक्रिया आरंभली जाणार आहे. साधारणत: १५ जुलैनंतर दहावीचा निकाल जाहीर होण्याचे संकेत आहेत.

-------------------

विभागात दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या

अकोला: २६९७७

अमरावती: ४०६६३

बुलडाणा : ३९६५८

यवतमाळ : ३८०४५

वाशिम: १९७१५

---------

राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांची मूल्यमापनाची कार्यपद्धत निश्चित केली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार शाळांना कार्यवाही करून ३० जूनपर्यंत गुण ऑनलाईन पाठविण्यासह हॉर्ड कॉपी द्यावी लागेल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

- शरद गोसावी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ