शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

बाजार समितीच्या दोन संचालकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 00:24 IST

मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अंजनगाव बाजार समितीत नाफेड तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा बांध रविवारी फुटला.

संभाजी ब्रिगेड आक्रमक : सातबारा शेतकऱ्यांचा, तूर व्यापाऱ्यांचीअंजनगाव सुर्जी : मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अंजनगाव बाजार समितीत नाफेड तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा बांध रविवारी फुटला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने बाजार समितीच्या दोन संचालकांना चोप दिल्याने बाजार समितीतील तूर खरेदीचा प्रश्न पेटला. बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या तुरीचे भाव पडल्यानंतर अंजनगाव सुर्जी येथे नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येऊन पाच हजार ५० रुपये शेतकऱ्याच्या तुरीला भाव मिळू लागला. परंतु, काही अवघ्या दिवसात नाफेड खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल तूर येऊन पडल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे वजन व्हायला पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने अधिकारी व कर्मचारी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून आपल्या मालाचे वजन लवकर करून घेतात, अशी आरडाओरड होवू लागली. तसेच संचालक मंडळातील काही संचालकसुद्धा अंजनगाव बाजार समितीत तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून कमी दराने तर खरेदी करून नाफेडमध्ये तूर विकत असल्याची ओरड मागील एक महिन्यापासून होत असताना सचिव व प्रशासक, संचालक मंडळाच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप होत असताना चक्काजाम आंदोलन, निवेदने असे प्रकार चालू असताना तूर खरेदी केंद्रावर कोणत्याही सुधारणा न झाल्याने अखेर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सचिन नवघरे यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी बोलणी सुरू असताना बाजार समितीचे संचालक अरुण खारोडे, नंदकिशोर काळे हे आंदोलन शांत करण्यास गेले असता त्यांच्यात बाचाबाची होऊन संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संचालकांना चोप दिला. त्यानंतर पोलिसांना पाचरण करावे लागले. तसेच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी बाजार समितीत उपस्थित झाले. त्यानंतर संभाजी ब्रिगेड व सचिव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बाजार समितीच्या प्रत्येक गेटवर चोवीस तास शेतमाल पाहून शेतकऱ्यांना टोकण देण्यात येईल, तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तीन दिवसात सुरू करण्यात येईल, व्यापारी, अडते, संचालक यांनी प्रमाणाबाहेर नाफेड शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केल्या असल्यास त्यांच्यावर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, ही आश्वासने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये विनोद हागोणे, सोपान साबळे, पे्रमकुमार बोके, सागर बोबडे, उमेश काकड उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)