शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

सात वर्षांत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट'

By admin | Updated: March 28, 2017 00:08 IST

सात वर्षांतील तापमानाच्या तुलनेत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट' असल्याचे आढळून येत आहे.

२६ मार्चचा पारा ४३ पार : दरवर्षी तापमानाचा चढता आलेख राहणार वैभव बाबरेकर अमरावतीसात वर्षांतील तापमानाच्या तुलनेत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट' असल्याचे आढळून येत आहे. जल विज्ञान प्रकल्प विभागाने रविवारी दिवसाच्या तापमानाची ४३.२ डिग्री सेल्सिअस अशी नोंद घेतली. हवामान तज्ज्ञांच्या मते दरवर्षी सूर्याचा प्रकोप वाढणार असून तापमानाचा चढता आलेख मानव जीवनासाठी घातक ठरणार असल्याचे संकेत आहे. दरवर्षी ऋतुमानात मोठे बदल होत असताना नागरिकांनी पर्यावरणाविषयक आता जागृत राहणे निदांत गरजेचे आहे. वृक्षतोड व वाढते प्रदूषणाचा दुष्पपरिणाम पर्यावरणावर होत असल्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमान वाढत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता, हिवाळ्यातील थंडी, तर पावसाळ्यात अतिवृष्टी जीवनसृष्टीवर प्रभाव टाकत आहे. जिल्ह्यातील सात वर्षांच्या तापमानाच्या आकडेवाडीवर नजर टाकली असता यंदा मार्चचा शेवटचा आठवडा सर्वाधिक उष्ण राहिल्याचे निदर्शनास आले. या सात वर्षातील मार्च महिन्यात ३८ ते ४२ डिग्रीची नोंद केली आहे. मात्र, यंदा मार्च महिन्यातील २६ तारखेला ४३.२ अंशाची नोंद जल विज्ञान प्रकल्प विभागाने घेतली आहे. ही नोंद सात वर्षात सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढते, याच महिन्यात ४७ डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र झळांचा नागरिकांना सोसाव्या लागणार आहे. यंदा मार्चअखेर सूर्य आग ओकत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता नागरिक थंड हवेचे स्त्रोत शोध आहेत. मानवी जीवाप्रमाणेच वन्यजीवांवरही उन्हाचा मोठा परिणाम झाला असून जीव लाही लाही होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, दुप्पटे, टोप्या व छत्रीची मदत घेतल्या जात आहे. मात्र, तरीसुध्दा उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उकाड्याने अक्षरशा नागरिक हताश झाले आहेत. दुपारनंतर घराबाहेर जाणे टाळले जात असून अत्यंत आवश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर निघत असल्याचे आढळून येत आहे.कक्ष स्थापनतापमान दरवर्षी वाढत असल्याने मानवी जीवनावर परिणाम होत आहे. उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसत आहे.शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघाताची दाट शक्यता असते. त्यासाठी इर्विन रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. वृक्षतोड व वाढते प्रदूषण तापमान वाढविण्यास कारणीभूत आहेत. त्याचा मानवी जीवनावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अधिकाअधिक वृक्ष लावून पर्यावरण वाचवा. प्रदूषण थांबविणे गरजेचे आहे. - अनिल बंड, हवामानतज्ज्ञ