शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट'

By admin | Updated: March 28, 2017 00:08 IST

सात वर्षांतील तापमानाच्या तुलनेत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट' असल्याचे आढळून येत आहे.

२६ मार्चचा पारा ४३ पार : दरवर्षी तापमानाचा चढता आलेख राहणार वैभव बाबरेकर अमरावतीसात वर्षांतील तापमानाच्या तुलनेत यंदाचा मार्च सर्वाधिक 'हॉट' असल्याचे आढळून येत आहे. जल विज्ञान प्रकल्प विभागाने रविवारी दिवसाच्या तापमानाची ४३.२ डिग्री सेल्सिअस अशी नोंद घेतली. हवामान तज्ज्ञांच्या मते दरवर्षी सूर्याचा प्रकोप वाढणार असून तापमानाचा चढता आलेख मानव जीवनासाठी घातक ठरणार असल्याचे संकेत आहे. दरवर्षी ऋतुमानात मोठे बदल होत असताना नागरिकांनी पर्यावरणाविषयक आता जागृत राहणे निदांत गरजेचे आहे. वृक्षतोड व वाढते प्रदूषणाचा दुष्पपरिणाम पर्यावरणावर होत असल्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमान वाढत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता, हिवाळ्यातील थंडी, तर पावसाळ्यात अतिवृष्टी जीवनसृष्टीवर प्रभाव टाकत आहे. जिल्ह्यातील सात वर्षांच्या तापमानाच्या आकडेवाडीवर नजर टाकली असता यंदा मार्चचा शेवटचा आठवडा सर्वाधिक उष्ण राहिल्याचे निदर्शनास आले. या सात वर्षातील मार्च महिन्यात ३८ ते ४२ डिग्रीची नोंद केली आहे. मात्र, यंदा मार्च महिन्यातील २६ तारखेला ४३.२ अंशाची नोंद जल विज्ञान प्रकल्प विभागाने घेतली आहे. ही नोंद सात वर्षात सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढते, याच महिन्यात ४७ डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र झळांचा नागरिकांना सोसाव्या लागणार आहे. यंदा मार्चअखेर सूर्य आग ओकत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता नागरिक थंड हवेचे स्त्रोत शोध आहेत. मानवी जीवाप्रमाणेच वन्यजीवांवरही उन्हाचा मोठा परिणाम झाला असून जीव लाही लाही होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, दुप्पटे, टोप्या व छत्रीची मदत घेतल्या जात आहे. मात्र, तरीसुध्दा उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उकाड्याने अक्षरशा नागरिक हताश झाले आहेत. दुपारनंतर घराबाहेर जाणे टाळले जात असून अत्यंत आवश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर निघत असल्याचे आढळून येत आहे.कक्ष स्थापनतापमान दरवर्षी वाढत असल्याने मानवी जीवनावर परिणाम होत आहे. उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसत आहे.शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघाताची दाट शक्यता असते. त्यासाठी इर्विन रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. वृक्षतोड व वाढते प्रदूषण तापमान वाढविण्यास कारणीभूत आहेत. त्याचा मानवी जीवनावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अधिकाअधिक वृक्ष लावून पर्यावरण वाचवा. प्रदूषण थांबविणे गरजेचे आहे. - अनिल बंड, हवामानतज्ज्ञ