शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मराठी विद्यापीठ रिद्धपूरलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:01 IST

शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. तथापि, मराठीतील दोन्ही आद्यग्रंथांचे लेखन रिद्धपूरला झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावे,

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अखिल भारतीय महानुभाव परिषदेची मागणी

ऑनलाईन लोकमतअमरावती : शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. तथापि, मराठीतील दोन्ही आद्यग्रंथांचे लेखन रिद्धपूरला झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषदद्वारा गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.मराठीमधील आद्य गद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ तसेच आद्य पद्य ग्रंथ ‘महदंबेचे धवळे’ यांचे लेखन रिद्धपूर येथे झाले. आद्य संशोधक, चरित्रकार माहिमभट्ट यांनी येथेच ‘वाजेश्वरी’ या स्थानावर शके १२०० मध्ये लीळाचरित्राची निर्मिती केली. या गं्रथामुळेच मराठीची ओळख व नावलौकिक झाला. ही मराठी भाषिकांसाठी व भाषेसाठी गौरवाची बाब आहे. येथेच महानुभावीय संतांनी लिखाण केले आहे. येथेच हजारोंच्या संख्येत हस्तलिखिते पूर्वजांचा वारसा म्हणून जतन केलेली आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भेटीदरम्यान मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच होण्यास सहमती दर्शविली. मात्र, आता मराठी विद्यापीठ मुंबई येथे नेण्याचा घाट रचला जात आहे. हा मराठीवर, लीळाचरित्रावर, महानुभावीय वाङ्मयावर तसेच मराठी भाषिकांवर अन्याय करणारा निर्णय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष श्री गोपीराजबाबा ऋषीराजस्वामी, सुभाष पावडे, विलास इंगोले, अशोक राऊत, राजेंद्र भोळे, सुदाम बिडकर, रणजित पावडे, मनीष देशमुख, अभिजित काळबांडे, नितीन देशमुख, निशू शेवळीकर, विनोद कराळे, भगवान मुंदडा, सुरेश पावडे, अरुण ठाकरे, सुभाष चर्जन, राजेंद्र अडसडे, रवींद्र कोठीकर, दादाराव फाटे, संदीप जुनघरे, रणजित पावडे, राजू भेले उपस्थित होते.