शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

केंद्राच्या कृषी विधेयकाविरुद्ध मराठा सेवा संघाचे अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:13 IST

अमरावती : केंद्र शासनाच्या शेतकरीविराेधी कायद्याविरुद्ध लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी मराठा ...

अमरावती : केंद्र शासनाच्या शेतकरीविराेधी कायद्याविरुद्ध लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी मराठा सेवा संघ व इतर पक्षांतर्फे जिल्हाकचेरी समोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

अन्नधान्य, फळ, दूध हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. परंतु याचा उत्पादनकर्ता शेतकरी आज संकटात आहे. सरकारकडून तो दुर्लक्षित झाला आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. म्हणून या आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढविणे व सरकारवर दबाब आणून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी शेतकऱ्यांनी व सर्व जनतेच्या सहभागातून हा सत्याग्रह करण्यात आला. शेती हा राज्यांचा विषय आहे. शिवाय पर्यायी बाजार आताही महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांत सुरू आहेत. त्यामुळे शेतमालाची विक्री पणन व्यवस्थेतील सुधारणांसाठी नवे, तसेच किचकट आणि जागोजागी आक्षेप घेण्यालायक कायदे इतक्या घाईघाईने आणण्याची गरज नव्हती. केंद्राने केलेले कायदे पूर्णत: शेतकरीविरोधी असून ते मागे घेण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघ व अन्य इतर समकक्षांनी केली आहे. आंदोलनात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चाैधरी, सचिव संजय ठाकरे, चंद्रकात मोहिते, प्रभाकर वानखडे, अरविंद अढाऊ, प्रफुल्ल गुडधे, श्रीकृष्ण बोचे, अरविंद गावंडे, गणेश वसुृ, पंडित काळे, मनाली तायडे, प्रतिभा रोडे, अश्विनी देवके, शीला पाटील, हर्षा ढोके, सुभाष देशमुख, मयुरा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.