शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या कृषी विधेयकाविरुद्ध मराठा सेवा संघाचे अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:13 IST

अमरावती : केंद्र शासनाच्या शेतकरीविराेधी कायद्याविरुद्ध लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी मराठा ...

अमरावती : केंद्र शासनाच्या शेतकरीविराेधी कायद्याविरुद्ध लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी मराठा सेवा संघ व इतर पक्षांतर्फे जिल्हाकचेरी समोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

अन्नधान्य, फळ, दूध हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. परंतु याचा उत्पादनकर्ता शेतकरी आज संकटात आहे. सरकारकडून तो दुर्लक्षित झाला आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. म्हणून या आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढविणे व सरकारवर दबाब आणून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी शेतकऱ्यांनी व सर्व जनतेच्या सहभागातून हा सत्याग्रह करण्यात आला. शेती हा राज्यांचा विषय आहे. शिवाय पर्यायी बाजार आताही महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांत सुरू आहेत. त्यामुळे शेतमालाची विक्री पणन व्यवस्थेतील सुधारणांसाठी नवे, तसेच किचकट आणि जागोजागी आक्षेप घेण्यालायक कायदे इतक्या घाईघाईने आणण्याची गरज नव्हती. केंद्राने केलेले कायदे पूर्णत: शेतकरीविरोधी असून ते मागे घेण्यात यावे, अशी मागणी मराठा सेवा संघ व अन्य इतर समकक्षांनी केली आहे. आंदोलनात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चाैधरी, सचिव संजय ठाकरे, चंद्रकात मोहिते, प्रभाकर वानखडे, अरविंद अढाऊ, प्रफुल्ल गुडधे, श्रीकृष्ण बोचे, अरविंद गावंडे, गणेश वसुृ, पंडित काळे, मनाली तायडे, प्रतिभा रोडे, अश्विनी देवके, शीला पाटील, हर्षा ढोके, सुभाष देशमुख, मयुरा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.