शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याची आमटी, चटणीची चवच न्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST

बाजारपेठेत कैऱ्या विक्रीला : लग्नप्रसंगातील लुंजी हरविली सुमीत हरकुट चांदूर बाजार : आठवड्यापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात कहर ...

बाजारपेठेत कैऱ्या विक्रीला : लग्नप्रसंगातील लुंजी हरविली

सुमीत हरकुट

चांदूर बाजार : आठवड्यापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात कहर केला. काही आम्रवृक्षांना चांगले आंबे लागले होते, पाऊस व गारपिटीचा तडाक्यात आंबे गळून पडले. हे आंबे काही शेतकऱ्यांनी बाजारपेठेत विक्रीला आणले. मिळेल ते भाव घेऊन आंब्याच्या कैऱ्या विक्री केल्या. आंबा म्हटला की, अनेकांच्या जिभेला पाणी सुटत असते. त्यामुळे आंब्याच्या आमटीची व चटणीची चवच न्यारी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्यामध्ये हापूस, नीलम या प्रजातीचा आंबा प्रसिद्धीच्या झोतात आहे. तरीही गावरान आंब्याची चवच काही न्यारी आहे. आंब्यापासून अनेक खाद्यपदार्थ घरोघरी बनविले जातात, शिवाय आता लग्नसराईत आंब्याचा रस, आमरस, पन्हे हे शेवया सोबत नवरदेव नवरीला भरवण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत रूढ असल्यामुळे आंब्याचे महत्त्व वाढले आहे.

विवाह झाल्यानंतर ग्रामीण भागात आताही आंबेखानी पद्धत रूढ आहे तसेच गुढीपाडवा व कळस पूजन करतेवेळी आंब्याच्या पदार्थांना मोठे महत्त्व आहे. आम्रवृक्षाचे आयुष्य ३०० ते ४०० वर्षे असते. यामुळे आजोबा, पणजोबाने लावलेल्या झाडाचे आंबे नातू, पणतू खातात, असा समज रूढ आहे. यामुळेच पूर्वीच्या काळात आंब्याचे झाड लावणे म्हणजे पुण्यकर्म समजले जाई. आता जिकडे-तिकडे विदेशी आंब्याचे प्रचलन झाले आहे. गावरान आमराई दिसेनाशी झाली आहे. तरीही आजही तीनशे वर्षांपूर्वीची काही आंब्याची झाडे फळे देत आहेत. पशू,पक्षी, वानर, मानव आंब्याचे फळ खाऊन तृप्त होत असतात.

कच्चा आंब्यापासून आमरस, पिकलेल्या आंब्यापासून रस व विविध प्रकारचे व्यंजन तयार करण्यात येतात. आता बाजारपेठेत कैऱ्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. मात्र, या कैऱ्यांच्या गुणांमुळे उन्हाळ्यात सरबत, पन्हे बनवण्यासाठी व रोजच्या जेवणात खाण्यासाठी उपयोग होत असतो. यामुळे कैऱ्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

---------------