शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आंब्याची आमटी, चटणीची चवच न्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST

बाजारपेठेत कैऱ्या विक्रीला : लग्नप्रसंगातील लुंजी हरविली सुमीत हरकुट चांदूर बाजार : आठवड्यापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात कहर ...

बाजारपेठेत कैऱ्या विक्रीला : लग्नप्रसंगातील लुंजी हरविली

सुमीत हरकुट

चांदूर बाजार : आठवड्यापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात कहर केला. काही आम्रवृक्षांना चांगले आंबे लागले होते, पाऊस व गारपिटीचा तडाक्यात आंबे गळून पडले. हे आंबे काही शेतकऱ्यांनी बाजारपेठेत विक्रीला आणले. मिळेल ते भाव घेऊन आंब्याच्या कैऱ्या विक्री केल्या. आंबा म्हटला की, अनेकांच्या जिभेला पाणी सुटत असते. त्यामुळे आंब्याच्या आमटीची व चटणीची चवच न्यारी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्यामध्ये हापूस, नीलम या प्रजातीचा आंबा प्रसिद्धीच्या झोतात आहे. तरीही गावरान आंब्याची चवच काही न्यारी आहे. आंब्यापासून अनेक खाद्यपदार्थ घरोघरी बनविले जातात, शिवाय आता लग्नसराईत आंब्याचा रस, आमरस, पन्हे हे शेवया सोबत नवरदेव नवरीला भरवण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत रूढ असल्यामुळे आंब्याचे महत्त्व वाढले आहे.

विवाह झाल्यानंतर ग्रामीण भागात आताही आंबेखानी पद्धत रूढ आहे तसेच गुढीपाडवा व कळस पूजन करतेवेळी आंब्याच्या पदार्थांना मोठे महत्त्व आहे. आम्रवृक्षाचे आयुष्य ३०० ते ४०० वर्षे असते. यामुळे आजोबा, पणजोबाने लावलेल्या झाडाचे आंबे नातू, पणतू खातात, असा समज रूढ आहे. यामुळेच पूर्वीच्या काळात आंब्याचे झाड लावणे म्हणजे पुण्यकर्म समजले जाई. आता जिकडे-तिकडे विदेशी आंब्याचे प्रचलन झाले आहे. गावरान आमराई दिसेनाशी झाली आहे. तरीही आजही तीनशे वर्षांपूर्वीची काही आंब्याची झाडे फळे देत आहेत. पशू,पक्षी, वानर, मानव आंब्याचे फळ खाऊन तृप्त होत असतात.

कच्चा आंब्यापासून आमरस, पिकलेल्या आंब्यापासून रस व विविध प्रकारचे व्यंजन तयार करण्यात येतात. आता बाजारपेठेत कैऱ्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. मात्र, या कैऱ्यांच्या गुणांमुळे उन्हाळ्यात सरबत, पन्हे बनवण्यासाठी व रोजच्या जेवणात खाण्यासाठी उपयोग होत असतो. यामुळे कैऱ्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

---------------