शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

आंबियाची ५४ हजार हेक्टरमध्ये गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:52 IST

यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत.

ठळक मुद्दे६० हजार संत्रा उत्पादकांचे नुकसान : ३८ हजार हेक्टर मदतीस पात्र, शासनाला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ५३ हजार ३९२ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ३३ टक्क्यांवर नुकसान असलेल्या ३८ हजार १४१.७७ हेक्टरमध्ये नैसर्गिक आपत्तीची मदत मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात साधारणत: संत्र्याचा आंबिया बहर घेतला जातो. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिन्यात वातावरण बदलासह किडीमुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. याविषयी शेतकऱ्यांच्या सातत्याने तक्रारी झाल्यात, शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकºयांना मदत व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ७ डिसेंबरला संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ११३६ गावांमधील ५९ हजार ९५६ शेतकºयांच्या ५३ हजार ६१२ हेक्टरमधील आंबिया बहराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल शासनाला सादर झाला. या बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीची प्रतीक्षा आहे.यंदा आॅगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वातावरणात दिवसा उष्णतामान अधिक होते. वातावरणातील बदलासह अन्नधान्याची कमतरता व बुरसीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानेही आंबियाची प्रचंड फळगळ झाली. बोटिओडीप्लोडीया, किलीटोट्रिकम व काही प्रमाणात आॅल्टर नेरिया या बुरसीमुळेही संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. या बुरशी देठाद्वारे फळात प्रवेश करून नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो. काळी माशी, मावा तुडतुडे, यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशीची वाढ होते व पेशीक्षय होऊन फळगळ झाली. संत्र्यांमध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत असलेल्या बुरसीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. मात्र, याची लक्षणे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दिसून आलीत. या बुरशीचा प्रादुर्भाव संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर होऊन तेथे काळपट व तपकिरी रंगाचे डाग पडलेत व तो भाग कुजून फळांची गळती झाली.रसशोषक किडीमुळेही फळगळसंत्र्याची फळे पक्वहोण्याच्या काळात रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. हे पंतग संध्याकाळच्या वेळी अर्धकच्ची फळात छिद्र करून रस शोषण करतात. या छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन फळे पिवळी पडतात व छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन याच छिद्रापासून फळे सडण्यास सुरूवात होते. परिणामी कीडग्रस्त फळे गळून पडतात. मृगबहराच्या तुलनेत आंबिया बहाराच्या फळांवर म्हणजेच सप्टेंबर व आॅक्टोबर या कालावधीत या किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून आला.