शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

आंबियाची ५४ हजार हेक्टरमध्ये गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:52 IST

यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत.

ठळक मुद्दे६० हजार संत्रा उत्पादकांचे नुकसान : ३८ हजार हेक्टर मदतीस पात्र, शासनाला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ५३ हजार ३९२ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ३३ टक्क्यांवर नुकसान असलेल्या ३८ हजार १४१.७७ हेक्टरमध्ये नैसर्गिक आपत्तीची मदत मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात साधारणत: संत्र्याचा आंबिया बहर घेतला जातो. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिन्यात वातावरण बदलासह किडीमुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. याविषयी शेतकऱ्यांच्या सातत्याने तक्रारी झाल्यात, शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकºयांना मदत व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ७ डिसेंबरला संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ११३६ गावांमधील ५९ हजार ९५६ शेतकºयांच्या ५३ हजार ६१२ हेक्टरमधील आंबिया बहराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल शासनाला सादर झाला. या बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीची प्रतीक्षा आहे.यंदा आॅगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वातावरणात दिवसा उष्णतामान अधिक होते. वातावरणातील बदलासह अन्नधान्याची कमतरता व बुरसीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानेही आंबियाची प्रचंड फळगळ झाली. बोटिओडीप्लोडीया, किलीटोट्रिकम व काही प्रमाणात आॅल्टर नेरिया या बुरसीमुळेही संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. या बुरशी देठाद्वारे फळात प्रवेश करून नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो. काळी माशी, मावा तुडतुडे, यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशीची वाढ होते व पेशीक्षय होऊन फळगळ झाली. संत्र्यांमध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत असलेल्या बुरसीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. मात्र, याची लक्षणे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दिसून आलीत. या बुरशीचा प्रादुर्भाव संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर होऊन तेथे काळपट व तपकिरी रंगाचे डाग पडलेत व तो भाग कुजून फळांची गळती झाली.रसशोषक किडीमुळेही फळगळसंत्र्याची फळे पक्वहोण्याच्या काळात रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. हे पंतग संध्याकाळच्या वेळी अर्धकच्ची फळात छिद्र करून रस शोषण करतात. या छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन फळे पिवळी पडतात व छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन याच छिद्रापासून फळे सडण्यास सुरूवात होते. परिणामी कीडग्रस्त फळे गळून पडतात. मृगबहराच्या तुलनेत आंबिया बहाराच्या फळांवर म्हणजेच सप्टेंबर व आॅक्टोबर या कालावधीत या किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून आला.