शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

‘मामी, आण ना अलकेशला !’

By admin | Updated: October 7, 2015 01:23 IST

‘अलकेश..असे का केलेस रे..’, ‘परत ये रे माझ्या भावा..’ ‘मामी तू म्हणाली होतीस ना, अलकेशला आणेल म्हणून, आण ना आता त्याला..’ ..

बहिणीचा हृदयद्रावक आक्रोश : गहिवरले गुलाबबाबानगर, अनेक प्रश्न अनुत्तरितचअमरावती : ‘अलकेश..असे का केलेस रे..’, ‘परत ये रे माझ्या भावा..’ ‘मामी तू म्हणाली होतीस ना, अलकेशला आणेल म्हणून, आण ना आता त्याला..’ अलकेशच्या थोरल्या बहिणीचा हा विदारक आक्रोश बघ्यांच्या अंगावर शहारे आणत होता. शेजाऱ्यांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबता थांबत नव्हते. नातलग त्यांच्या परीने या मायलेकींची समजूत घालीत असले तरी घराचे चैतन्य असलेला अलकेश आता कधीच परतणार नाही, ही जाणीव त्यांच्या आक्रोशात भर घालीत होती. अलकेश गेला. पण, अनेक प्रश्न मागे उरलेत. अभ्यासात तल्लख अलकेशने असा टोकाचा निर्णय का घेतला? समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेसाठी नेमके जबाबदार कोण? दारिद्र्य की कमकुवत मानसिकता. हा प्रश्नही उरला आहेच. शहरातील गरिबांची वस्ती म्हणजे गुलाबबाबा नगर. येथे रामेश्वर मोहोड यांचे झोपडीवजा घर आहे. आचाऱ्याचे काम करुन ते कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पदरी दोन मुले. दहावीत विकास विद्यालयात शिकणारी नंदिनी आणि १३ वर्षांचा अलकेश. रामेश्वर मोहोड यांचा संसार कसाबसा चाललेला. अलकेश अभ्यासात तल्लख. नियमित शाळेत जाणारा. शिक्षकांचा आणि सवंगड्यांचाही लाडका. परिस्थितीने आलेले शहाणपण त्याच्याही अंगी होते. पण, सोमवारी काय झाले कुणास ठाऊक? आईने दहा रूपये दिले नाहीत आणि एक धपाटा मारला म्हणून अलकेशने चक्क आत्महत्या केली. अलकेश गेला, हे सत्य अद्यापही कुटुंबीयांच्या पचनी पडत नाही. मुख्याध्यापक, त्याला शिकविणारे शिक्षक आणि मित्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. विविध चर्चांना ऊत अमरावती : सगळ्यांनाच अनेक प्रश्न पडलेत. पण, उत्तर मात्र कुणाकडेच नाही. पैसे देण्यास आईने नकार दिल्यानंतर रडत-रडत घराबाहेर गेलेला अलकेश शाळेच्या आवारात जाऊन आत्महत्या करेल, अशी पुसटशी कल्पनाही कोणालाच नव्हती. आईचा मार किंवा पैसे देण्यास मिळालेला नकार एवढा जिव्हारी लागेल, असेही कोणाला वाटले नव्हते. त्याची त्यावेळची नेमकी मनोवस्था काय होती?, आत्महत्येचे विचार आधीपासूनच त्याच्या मनात पिंगा घालत होते की काय?, त्याला नेमके शल्य कशाचे होते? अशा अनेक विषयांवर त्याचे नातलग आता चर्चा करीत आहेत. शाळेतही हाच विषय चर्चेला आहे. अलकेशसारखा अद्याप मिसरूडही न फुटलेला चिमुरडा आत्महत्येच्या निर्णयाप्रत जातो म्हणजे नेमके चुकले कुणाचे? हा प्रश्न जागरूक नागरिकांना नक्कीच बोचणारा असेल.