शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

‘मामी, आण ना अलकेशला !’

By admin | Updated: October 7, 2015 01:23 IST

‘अलकेश..असे का केलेस रे..’, ‘परत ये रे माझ्या भावा..’ ‘मामी तू म्हणाली होतीस ना, अलकेशला आणेल म्हणून, आण ना आता त्याला..’ ..

बहिणीचा हृदयद्रावक आक्रोश : गहिवरले गुलाबबाबानगर, अनेक प्रश्न अनुत्तरितचअमरावती : ‘अलकेश..असे का केलेस रे..’, ‘परत ये रे माझ्या भावा..’ ‘मामी तू म्हणाली होतीस ना, अलकेशला आणेल म्हणून, आण ना आता त्याला..’ अलकेशच्या थोरल्या बहिणीचा हा विदारक आक्रोश बघ्यांच्या अंगावर शहारे आणत होता. शेजाऱ्यांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबता थांबत नव्हते. नातलग त्यांच्या परीने या मायलेकींची समजूत घालीत असले तरी घराचे चैतन्य असलेला अलकेश आता कधीच परतणार नाही, ही जाणीव त्यांच्या आक्रोशात भर घालीत होती. अलकेश गेला. पण, अनेक प्रश्न मागे उरलेत. अभ्यासात तल्लख अलकेशने असा टोकाचा निर्णय का घेतला? समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेसाठी नेमके जबाबदार कोण? दारिद्र्य की कमकुवत मानसिकता. हा प्रश्नही उरला आहेच. शहरातील गरिबांची वस्ती म्हणजे गुलाबबाबा नगर. येथे रामेश्वर मोहोड यांचे झोपडीवजा घर आहे. आचाऱ्याचे काम करुन ते कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पदरी दोन मुले. दहावीत विकास विद्यालयात शिकणारी नंदिनी आणि १३ वर्षांचा अलकेश. रामेश्वर मोहोड यांचा संसार कसाबसा चाललेला. अलकेश अभ्यासात तल्लख. नियमित शाळेत जाणारा. शिक्षकांचा आणि सवंगड्यांचाही लाडका. परिस्थितीने आलेले शहाणपण त्याच्याही अंगी होते. पण, सोमवारी काय झाले कुणास ठाऊक? आईने दहा रूपये दिले नाहीत आणि एक धपाटा मारला म्हणून अलकेशने चक्क आत्महत्या केली. अलकेश गेला, हे सत्य अद्यापही कुटुंबीयांच्या पचनी पडत नाही. मुख्याध्यापक, त्याला शिकविणारे शिक्षक आणि मित्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. विविध चर्चांना ऊत अमरावती : सगळ्यांनाच अनेक प्रश्न पडलेत. पण, उत्तर मात्र कुणाकडेच नाही. पैसे देण्यास आईने नकार दिल्यानंतर रडत-रडत घराबाहेर गेलेला अलकेश शाळेच्या आवारात जाऊन आत्महत्या करेल, अशी पुसटशी कल्पनाही कोणालाच नव्हती. आईचा मार किंवा पैसे देण्यास मिळालेला नकार एवढा जिव्हारी लागेल, असेही कोणाला वाटले नव्हते. त्याची त्यावेळची नेमकी मनोवस्था काय होती?, आत्महत्येचे विचार आधीपासूनच त्याच्या मनात पिंगा घालत होते की काय?, त्याला नेमके शल्य कशाचे होते? अशा अनेक विषयांवर त्याचे नातलग आता चर्चा करीत आहेत. शाळेतही हाच विषय चर्चेला आहे. अलकेशसारखा अद्याप मिसरूडही न फुटलेला चिमुरडा आत्महत्येच्या निर्णयाप्रत जातो म्हणजे नेमके चुकले कुणाचे? हा प्रश्न जागरूक नागरिकांना नक्कीच बोचणारा असेल.