शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मेळघाटात १८ वर्षांत ९ हजार ६०० बालमृत्यू

By admin | Updated: December 11, 2015 00:46 IST

शासनाची आरोग्य सेवा पाहिजे तशी अद्यापही मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात न पोहचल्यामुळे बालमृत्यू होतच आहेत.

तुलनात्मकरीत्या बालमृत्यूत घट : प्रभावी उपाययोजनेची आवश्यकता

संदीप मानकर अमरावती

शासनाची आरोग्य सेवा पाहिजे तशी अद्यापही मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात न पोहचल्यामुळे बालमृत्यू होतच आहेत. इतर वर्षांच्या तुलनेत बालमृत्यू दरात जरी घट झाली असली तरी मेळघाटात १८ वर्षांत ९ हजार ६३० बालमृत्यू झाल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. मेळघाटात अनेक वर्षे समाजसेवा करीत असलेले खोज या संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांनी गाभा समितीच्या अहवालावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागात अद्यापही आरोग्य सेवा पोहोचलीच नाही. शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यू रोखण्यासाठी युद्धस्तरावर नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. ० ते ६ वर्षे वयोगटातील हे मृत्यू आहेत. मातेला व बाळाला सकस आहार न मिळणे, कमी वजनांचे बाळ जन्माला येणे, अल्पवयीन माता, तसेच त्याला वेळेवर योग्य उपचार न मिळणे किंवा अज्ञानतेमुळे लहान मुलांना अतिरिक्त क्षमतेचा डोस दिल्याने बालमृत्यू झाल्याची अनेक कारणे समोर आली आहेत. बालमृत्यू थांबविण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला व बालविकास यंत्रणा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे नियंत्रण असते. सन १९९६-९७ मध्ये सर्वाधिक १,०५० बालमृत्यू झाले होते. २०१२-१३ मध्ये ४०९ बालमृत्यू होते. यामध्ये घट झाली. पण २०१३-१४ मध्ये वाढ होऊन हा आकडा ४२६ वर पोहोचला, तर २०१५ या वर्षातील आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही.