शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात १८ वर्षांत ९ हजार ६०० बालमृत्यू

By admin | Updated: December 11, 2015 00:46 IST

शासनाची आरोग्य सेवा पाहिजे तशी अद्यापही मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात न पोहचल्यामुळे बालमृत्यू होतच आहेत.

तुलनात्मकरीत्या बालमृत्यूत घट : प्रभावी उपाययोजनेची आवश्यकता

संदीप मानकर अमरावती

शासनाची आरोग्य सेवा पाहिजे तशी अद्यापही मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात न पोहचल्यामुळे बालमृत्यू होतच आहेत. इतर वर्षांच्या तुलनेत बालमृत्यू दरात जरी घट झाली असली तरी मेळघाटात १८ वर्षांत ९ हजार ६३० बालमृत्यू झाल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. मेळघाटात अनेक वर्षे समाजसेवा करीत असलेले खोज या संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांनी गाभा समितीच्या अहवालावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागात अद्यापही आरोग्य सेवा पोहोचलीच नाही. शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यू रोखण्यासाठी युद्धस्तरावर नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. ० ते ६ वर्षे वयोगटातील हे मृत्यू आहेत. मातेला व बाळाला सकस आहार न मिळणे, कमी वजनांचे बाळ जन्माला येणे, अल्पवयीन माता, तसेच त्याला वेळेवर योग्य उपचार न मिळणे किंवा अज्ञानतेमुळे लहान मुलांना अतिरिक्त क्षमतेचा डोस दिल्याने बालमृत्यू झाल्याची अनेक कारणे समोर आली आहेत. बालमृत्यू थांबविण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला व बालविकास यंत्रणा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे नियंत्रण असते. सन १९९६-९७ मध्ये सर्वाधिक १,०५० बालमृत्यू झाले होते. २०१२-१३ मध्ये ४०९ बालमृत्यू होते. यामध्ये घट झाली. पण २०१३-१४ मध्ये वाढ होऊन हा आकडा ४२६ वर पोहोचला, तर २०१५ या वर्षातील आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही.