शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

मेळघाटात १८ वर्षांत ९ हजार ६०० बालमृत्यू

By admin | Updated: December 11, 2015 00:46 IST

शासनाची आरोग्य सेवा पाहिजे तशी अद्यापही मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात न पोहचल्यामुळे बालमृत्यू होतच आहेत.

तुलनात्मकरीत्या बालमृत्यूत घट : प्रभावी उपाययोजनेची आवश्यकता

संदीप मानकर अमरावती

शासनाची आरोग्य सेवा पाहिजे तशी अद्यापही मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात न पोहचल्यामुळे बालमृत्यू होतच आहेत. इतर वर्षांच्या तुलनेत बालमृत्यू दरात जरी घट झाली असली तरी मेळघाटात १८ वर्षांत ९ हजार ६३० बालमृत्यू झाल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. मेळघाटात अनेक वर्षे समाजसेवा करीत असलेले खोज या संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांनी गाभा समितीच्या अहवालावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागात अद्यापही आरोग्य सेवा पोहोचलीच नाही. शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यू रोखण्यासाठी युद्धस्तरावर नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. ० ते ६ वर्षे वयोगटातील हे मृत्यू आहेत. मातेला व बाळाला सकस आहार न मिळणे, कमी वजनांचे बाळ जन्माला येणे, अल्पवयीन माता, तसेच त्याला वेळेवर योग्य उपचार न मिळणे किंवा अज्ञानतेमुळे लहान मुलांना अतिरिक्त क्षमतेचा डोस दिल्याने बालमृत्यू झाल्याची अनेक कारणे समोर आली आहेत. बालमृत्यू थांबविण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला व बालविकास यंत्रणा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे नियंत्रण असते. सन १९९६-९७ मध्ये सर्वाधिक १,०५० बालमृत्यू झाले होते. २०१२-१३ मध्ये ४०९ बालमृत्यू होते. यामध्ये घट झाली. पण २०१३-१४ मध्ये वाढ होऊन हा आकडा ४२६ वर पोहोचला, तर २०१५ या वर्षातील आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही.