शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: March 10, 2016 00:28 IST

शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

यशोमती ठाकूर : मतदारसंघात विकासकामे सुरुतिवसा : शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे. परंतु अद्याप जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाने केलेल्या घोषणा व त्यांची अंमलबजावणी यामध्ये कोणताही ताळमेळ नाही. घोषणांच्या अतिवृष्टीत सरकारही वाहून गेल्याची टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली. त्या कठोरा गांधी येथील जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी मार्गाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर विनोद डांगे, जि.प. सदस्य, बाळासाहेब देशमुख, हरीश मोरे, वीरेंद्र जाधव, गजानन जवंजाळ उपस्थित होते. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत कठोरा गांधी या गावाची निवड केल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत येथे शैक्षणिक व इतर सुविधा निर्माण करण्यात येतील, असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, सध्या जे सत्तेत आहेत त्यांनी केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू केले आहे. धर्माबाबत ‘हम करे सो कायदा’ अशी नीती त्यांनी अवलंबली आहे. मात्र, घटनेने सर्वांना समसमान अधिकार बहाल केले असून कोणी कोणत्या धर्माची आराधना करावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. याबाबत कोणीही बळजबरी करू शकत नाही. शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जैसे थे असताना सत्तेत असलेल्या पक्षाचे नेते मात्र जात, धर्माला महत्त्व देत आहेत. त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ, मान्यवरांची उपस्थिती होती. आपणच आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे, असा सल्ला यावेळी आ. यशोमतींनी दिला. (प्रतिनिधी)