शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: March 10, 2016 00:28 IST

शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

यशोमती ठाकूर : मतदारसंघात विकासकामे सुरुतिवसा : शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे. परंतु अद्याप जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाने केलेल्या घोषणा व त्यांची अंमलबजावणी यामध्ये कोणताही ताळमेळ नाही. घोषणांच्या अतिवृष्टीत सरकारही वाहून गेल्याची टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली. त्या कठोरा गांधी येथील जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी मार्गाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर विनोद डांगे, जि.प. सदस्य, बाळासाहेब देशमुख, हरीश मोरे, वीरेंद्र जाधव, गजानन जवंजाळ उपस्थित होते. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत कठोरा गांधी या गावाची निवड केल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत येथे शैक्षणिक व इतर सुविधा निर्माण करण्यात येतील, असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, सध्या जे सत्तेत आहेत त्यांनी केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू केले आहे. धर्माबाबत ‘हम करे सो कायदा’ अशी नीती त्यांनी अवलंबली आहे. मात्र, घटनेने सर्वांना समसमान अधिकार बहाल केले असून कोणी कोणत्या धर्माची आराधना करावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. याबाबत कोणीही बळजबरी करू शकत नाही. शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जैसे थे असताना सत्तेत असलेल्या पक्षाचे नेते मात्र जात, धर्माला महत्त्व देत आहेत. त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ, मान्यवरांची उपस्थिती होती. आपणच आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे, असा सल्ला यावेळी आ. यशोमतींनी दिला. (प्रतिनिधी)