शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: March 10, 2016 00:28 IST

शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

यशोमती ठाकूर : मतदारसंघात विकासकामे सुरुतिवसा : शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे. परंतु अद्याप जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाने केलेल्या घोषणा व त्यांची अंमलबजावणी यामध्ये कोणताही ताळमेळ नाही. घोषणांच्या अतिवृष्टीत सरकारही वाहून गेल्याची टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली. त्या कठोरा गांधी येथील जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी मार्गाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर विनोद डांगे, जि.प. सदस्य, बाळासाहेब देशमुख, हरीश मोरे, वीरेंद्र जाधव, गजानन जवंजाळ उपस्थित होते. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत कठोरा गांधी या गावाची निवड केल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत येथे शैक्षणिक व इतर सुविधा निर्माण करण्यात येतील, असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, सध्या जे सत्तेत आहेत त्यांनी केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू केले आहे. धर्माबाबत ‘हम करे सो कायदा’ अशी नीती त्यांनी अवलंबली आहे. मात्र, घटनेने सर्वांना समसमान अधिकार बहाल केले असून कोणी कोणत्या धर्माची आराधना करावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. याबाबत कोणीही बळजबरी करू शकत नाही. शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जैसे थे असताना सत्तेत असलेल्या पक्षाचे नेते मात्र जात, धर्माला महत्त्व देत आहेत. त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ, मान्यवरांची उपस्थिती होती. आपणच आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे, असा सल्ला यावेळी आ. यशोमतींनी दिला. (प्रतिनिधी)