शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

सात कोटींचे वाटप तात्काळ करा

By admin | Updated: May 7, 2017 00:10 IST

खरीप २०१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना जाहीर पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात जाहीर झालेली ....

यशोमती ठाकूर आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप २०१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना जाहीर पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात जाहीर झालेली मदत चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत आ. यशोमती ठाकूर संतप्त झाल्यात. तत्काळ निधी जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. तिवसा तालुक्यातील १७ हजार शेतकऱ्यांचे सात कोटींचे अर्थसहाय्य हे गेल्या दोन महिन्यांपासून अमरावतीच्या अ‍ॅक्सीस बँक येथे पडून आहे. प्रशासनाच्या व बँकाच्या दिरंगाईमुळे हा निधी वाटपापासून पडून आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दोन महिन्यापासून त्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळे हा निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा अन्यथा आंदोलन करू असे आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क करून तत्काळ सात कोटी उपलब्ध करण्याचे आदेश दिले. तिवसा नगरपंचायतचे उपाध्यक्ष वैभव वानखडे, संदीप आमले, सागर राऊत, आशीष ताथोडे, मंगेश भगोले आदी उपस्थित होते.