शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के करा

By admin | Updated: August 4, 2015 00:15 IST

महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता ...

महाराजस्व अभियान : जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांचे आवाहनअमरावती : महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आवश्यक असलेल्या आधार कार्डची १०० टक्के नोंदणी करावी तसेच शैक्षणिक व अन्य कामांसाठी लागणाऱ्या विविध स्वरुपाच्या दाखल्यांकरीता आवश्यक ते सर्व अर्ज व कागदपत्राबाबत जनतेस माहिती द्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केल्या.महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात १ आॅगस्टपासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात १४ लोकाभिमुख घटक गावपातळीवर प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन येथील तहसिल कार्यालयाच्या वतीने ज्ञानमाता विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित आधार नोंदणी शिबिराचे उद्घाटन गित्ते यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर सामी, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसिलदार सुरेश बगळे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, संस्थेचे पर्यवेक्षक उल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थी तसेच सर्व सामान्य नागरिक, शेतकरी यांना अधिकाअधिक सोयी सुविधा उपलबध करुन देण्यासाठी महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. खऱ्या नागरिकांच्या ओळखीसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. शालेय जिवनापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना उपयोगी आहे. विद्यार्थ्यांचा वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी आधार नोंदणी शिबिरे जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. यासाठी इतरत्र फिरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच आधार कार्डची नोंदणी केली जाणार आहे. ज्ञानमाता विद्यालयात १६४१ विद्यार्थी असुन या सर्वांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. याशिवाय विद्यार्थ्यांना डोमेसिएल, जन्माचा दाखला आदी दाखले ही देण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे म्हणाले की, महाराजस्व अभियान शाळेत सुविधा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही त्यांच्या दारात जाऊन सुविधा पुरविण्यात येणार आहे.महसुल प्रशासन हा शासनाचा आरसा असुन अभियान काळात अधिकाअधिक सोयी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्ञानमाताचे मुख्याध्यापक सामी यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्या विद्यालयात हा उपक्रम घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानुन आगामी काळात विविध उपक्रम घेऊन अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे सांगितले. (प्रतिनिधी)