शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के करा

By admin | Updated: August 4, 2015 00:15 IST

महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता ...

महाराजस्व अभियान : जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांचे आवाहनअमरावती : महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आवश्यक असलेल्या आधार कार्डची १०० टक्के नोंदणी करावी तसेच शैक्षणिक व अन्य कामांसाठी लागणाऱ्या विविध स्वरुपाच्या दाखल्यांकरीता आवश्यक ते सर्व अर्ज व कागदपत्राबाबत जनतेस माहिती द्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केल्या.महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात १ आॅगस्टपासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात १४ लोकाभिमुख घटक गावपातळीवर प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन येथील तहसिल कार्यालयाच्या वतीने ज्ञानमाता विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित आधार नोंदणी शिबिराचे उद्घाटन गित्ते यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर सामी, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसिलदार सुरेश बगळे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, संस्थेचे पर्यवेक्षक उल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थी तसेच सर्व सामान्य नागरिक, शेतकरी यांना अधिकाअधिक सोयी सुविधा उपलबध करुन देण्यासाठी महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. खऱ्या नागरिकांच्या ओळखीसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. शालेय जिवनापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना उपयोगी आहे. विद्यार्थ्यांचा वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी आधार नोंदणी शिबिरे जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. यासाठी इतरत्र फिरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच आधार कार्डची नोंदणी केली जाणार आहे. ज्ञानमाता विद्यालयात १६४१ विद्यार्थी असुन या सर्वांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. याशिवाय विद्यार्थ्यांना डोमेसिएल, जन्माचा दाखला आदी दाखले ही देण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे म्हणाले की, महाराजस्व अभियान शाळेत सुविधा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही त्यांच्या दारात जाऊन सुविधा पुरविण्यात येणार आहे.महसुल प्रशासन हा शासनाचा आरसा असुन अभियान काळात अधिकाअधिक सोयी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्ञानमाताचे मुख्याध्यापक सामी यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्या विद्यालयात हा उपक्रम घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानुन आगामी काळात विविध उपक्रम घेऊन अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे सांगितले. (प्रतिनिधी)