शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के करा

By admin | Updated: August 4, 2015 00:15 IST

महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता ...

महाराजस्व अभियान : जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांचे आवाहनअमरावती : महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आवश्यक असलेल्या आधार कार्डची १०० टक्के नोंदणी करावी तसेच शैक्षणिक व अन्य कामांसाठी लागणाऱ्या विविध स्वरुपाच्या दाखल्यांकरीता आवश्यक ते सर्व अर्ज व कागदपत्राबाबत जनतेस माहिती द्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केल्या.महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात १ आॅगस्टपासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात १४ लोकाभिमुख घटक गावपातळीवर प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन येथील तहसिल कार्यालयाच्या वतीने ज्ञानमाता विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित आधार नोंदणी शिबिराचे उद्घाटन गित्ते यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर सामी, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसिलदार सुरेश बगळे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, संस्थेचे पर्यवेक्षक उल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थी तसेच सर्व सामान्य नागरिक, शेतकरी यांना अधिकाअधिक सोयी सुविधा उपलबध करुन देण्यासाठी महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. खऱ्या नागरिकांच्या ओळखीसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. शालेय जिवनापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना उपयोगी आहे. विद्यार्थ्यांचा वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी आधार नोंदणी शिबिरे जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. यासाठी इतरत्र फिरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच आधार कार्डची नोंदणी केली जाणार आहे. ज्ञानमाता विद्यालयात १६४१ विद्यार्थी असुन या सर्वांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. याशिवाय विद्यार्थ्यांना डोमेसिएल, जन्माचा दाखला आदी दाखले ही देण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे म्हणाले की, महाराजस्व अभियान शाळेत सुविधा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही त्यांच्या दारात जाऊन सुविधा पुरविण्यात येणार आहे.महसुल प्रशासन हा शासनाचा आरसा असुन अभियान काळात अधिकाअधिक सोयी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्ञानमाताचे मुख्याध्यापक सामी यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्या विद्यालयात हा उपक्रम घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानुन आगामी काळात विविध उपक्रम घेऊन अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे सांगितले. (प्रतिनिधी)