शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

मजीप्राने पाणीपुरवठ्यात सावधगिरी बाळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST

अमरावती : सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाने नदी, नाल्यांना पूर येत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण व शहरी भागाला ...

अमरावती : सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाने नदी, नाल्यांना पूर येत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण व शहरी भागाला पाणीपुरवठा करताना मजीप्राने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. शहरातील अनेक भागात नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची तत्काळ दखल घेत आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी जीवन प्राधिकरणच्या मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

अमृत योजनेतून शहरात ५ लाख ते २५ लाख लिटर क्षमतेच्या १९ नवीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे आणि डेंग्यू, मलेरिया, अतिसार आदी आजारांपासून संरक्षणमिळावे, असे आ. राणा म्हणाले. सध्या शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. राजुरा येथील जलशुद्धीकरण केंद्राचीही स्वच्छता राखावी. नागरिकांना गढूळ किंवा अशुद्ध पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश आमदार रवि राणा यांनी सांगितले.

चमननगर, रजानगर, अकोली, म्हाडा कॉलनी, नवसारी, रहाटगाव, महेंद्र कॉलनी, वलगाव रोड आदी ठिकाणी पाईपलाईन टाकून आवश्यक त्यांना तातडीने नळ कनेक्शनद्वारा घरपोच पाणी मिळण्यासाठी मजीप्राने तत्काळ कार्यवाही करावी, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.

या बैठकीला अजय जयस्वाल, सय्यद मोमीन, मंगेश सोळके, अमोल काळे, नितीन सोळके, पंकज अडसपुरे, मनीष गायकवाड, आफताब खान, जैनुद्दीन, धिरू अन्सार, ईकबाल मदारी, अनिल कुरेशी, सुधाकर खापर्डे, सुरेश कुकडे, विजय धोटे, संजय सोनवणे, विजय भाकरे, सतीश नेवारे, वासुदेव गावंडे, सचिन कडूकार, विशाल घोगडे, अशोक मोहरे, अशोक काऊलकर, बाबूलाल लेखरा, चंद्रकांत वाडेकर, संजय खनपट, लक्ष्मण नेवारे आदी उपस्थित होते.