शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राचे ‘जीवन’ धोक्यात

By admin | Updated: June 1, 2016 00:50 IST

येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहकांकडे ८५ कोटी रुपये पाणी पुरवठा देयकांचे थकबाकी असल्याने या यंत्रणेचे ‘जीवन’ धोक्यात आले आहे.

८५ कोेटी थकबाकी : महापालिकेवर चढविला बोझाअमरावती : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहकांकडे ८५ कोटी रुपये पाणी पुरवठा देयकांचे थकबाकी असल्याने या यंत्रणेचे ‘जीवन’ धोक्यात आले आहे. परिणामी नागरिकांंना पाणी पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास मजीप्राला गासे गुंडाळावे लागेल, असे संकेत आहे.राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने मराठवाड्यात आठवड्यातून एकदा तर अकोला, वाशिम, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये तीन ते चार दिवसांतून एकदा नळाद्वारे पाणी पुरवठा आजही सुरु आहे. मात्र यावर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती शहरवासियांना पाणी टंचाईची जाणीव होऊ दिली नाही. नियमित पाणी पुरवठा करुन नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला. परंतु मजीप्राचे पाणी पुरवठ्याचे सुमारे ८५ कोटी रुपये देयकांचे थकबाकी असल्याने ते वसूल करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये थकबाकी असल्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत पायाभूत सुविधा पुरविणे मजीप्राला अशक्य होत असल्याचे वास्तव आहे. बडनेरा शहरात कालबाह्य झालेले जलकुंभ जमिनदोस्त करण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. मजीप्राकडे निधी उपलब्ध असता तर पायाभूत सुविधांना प्राधान्य देता आले असते असे कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी सांगितले. पाणी पुरवठा देयकांच्या थकबाकीसाठी आता कृ ति आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाकडे स्टॅन्ड पोस्ट आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित देयकांचे ३५ कोटी रुपये थकबाकी असल्यामुळे महसूल विभागाने बोझा चढविला आहे. अद्यापही महापालिकेने देयकांची रक्कम अदा केली नाही. मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधला जात आहे. तसेच २५ हजार ग्राहकांकडे सुमारे ५० कोटी रुपये देयकांचे थकीत आहे. ५० कोटी रुपये ही रक्कम वसूल करण्यासाठी जप्तीपूर्वीची नोटीस बजावण्याचे ठरविले आहे. १० दिवसात ही रक्कम ग्राहकाने भरली नाही तर पाणी पुरवठा बंद करुन महसूल विभागाकडे कायदेशीर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्याकरिता स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.