शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वनक्षेत्र संरक्षणासाठी एसआरपीएफच्या तीन तुकड्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:14 IST

महसूल, वनविभागाचा निर्णय, ३८ अस्थायी पदांना मुदतवाढ अमरावती : राज्याच्या संवेदनशील वनक्षेत्रात वनसंरक्षणाकरिता राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या ...

महसूल, वनविभागाचा निर्णय, ३८ अस्थायी पदांना मुदतवाढ

अमरावती : राज्याच्या संवेदनशील वनक्षेत्रात वनसंरक्षणाकरिता राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या पुन्हा कायम ठेवण्यात आल्या आहेत. या तीन तुकड्यांमधील एकूण ३८ अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. महसूल व वनविभागाच्या निर्णयानुसार १ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत या तिन्ही तुकड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

वनांचे संरक्षण, वन्यजीव तस्करी रोखणे, वनांचे अतिक्रमण काढणे, सीमेवर गस्त आदी वनक्षेत्रांचे संरक्षणकामी वनाधिकारी यांच्याकडून आलेल्या मागणीनुसार ही एसआरपीएफची तुकडी पाठविली जाते. गत काही वर्षांपासून संवेदनशील वनक्षेत्रात वनसंरक्षणाकरिता राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या कायम स्वरूपी वनविभागाकडे ठेवणे या योजनेत्तर योजनेखालील अस्थायी पदे सन २०२१-२२ या वर्षात पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या एसआरपीएफच्या तिन्ही तुकड्या संवेदनशील वनक्षेत्र संरक्षणासाठी चांद्यापासून तर बांद्यापर्यंत कुठेही पाठविल्या जातील, असे शासनादेशात महसूल व वन विभागाचे उप सचिव गजेंद्र नरवणे यांनी स्पष्ट केले. एसआरपीएफ तुकड्यात सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक १, सशस्त्र पोलीस हवालदार ६, सशस्त्र पोलीस शिपाई २४, पोलीस शिपाई चालक ३, सहायक स्वयंपाकी २, भोजन सेवक २ अशा अस्थायी ३८ पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.