शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राणीगाव ते सुसर्दा घाटात मुख्य रस्त्यावर दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

१५ गावांचा संपर्क तुटला : धारणी : शहरापासून ५० किलोमीटर अंतरावरील राणीगाव घाटातील दरड कोसळून राणीगाव ते सुसर्दा ...

१५ गावांचा संपर्क तुटला :

धारणी : शहरापासून ५० किलोमीटर अंतरावरील राणीगाव घाटातील दरड कोसळून राणीगाव ते सुसर्दा धारणी, असा हा लांबपल्ल्याचा मार्ग बंद झाल्याने १५ गावातील नागरिकांचा संपर्क मुख्यालयापासून तुटलेला आहे.

दोन दिवसापासून मेळघाटात संततधार पाऊस सुरू असल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगर-दऱ्यातून निर्माण झालेले छोटे-मोठे नाले तुडुंब वाहत आहेत. अशातच डोंगराच्या कपारी खचल्याने धारणीपासून लांबपल्ल्याच्या उंच ठिकाणावरील राणीगाव-सुसर्दा धारणी या मुख्य मार्गावर दरड व मोठमोठे दगड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णता बंद झाला आहे. त्यामुळे राणीगाव, सिंधबंद, गोलाई, कंजोली, धूळघाट रेल्वे, चेंडौ, पळसकुंडीसह १५ गावांचा संपर्क मुख्यालयापासून तुटला आहे.

बॉक्स

दिया - बैरागड मार्ग दुपारी ३ नंतर सुरळीत

धारणी मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावरील दिया गावाजवळ बैरागड मार्गाला जोडणारा सिपना नदीवरील मोठा पूल आहे. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे गुरुवारी पहाटे सिपना नदीला महापूर आला. त्यामुळे दियाजवळील पुलावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे परिसरातील ३५ गावांचा संपर्क तुटला. परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. धारणीकडे निघालेल्या नागरिकांना पुरामुळे नदीच्या काठावरच थांबावे लागले. त्यांनतर दुपारी ३ वाजानंतर पुराचे पाणी कमी झाल्याने डिया बैरागड मार्ग सुरू झाला तर हरीसाल वरून चिखली जाणारा मार्ग सुद्धा बंद होता तो पण पुराचे पाणी ओसरल्यावर रस्ता मोकळा झाला.

मेळघाटातील बीएसएनल सेवा बंद

परतवाडा वरून फायबर केबलने धारणीला बीएसएनलची थ्री जी सेवा घटांग सेमाडोह हरिसालमार्गे धारणीला पोहचली आहे. नदीला पूर आल्याने या मार्गावरील नदीच्या पुलावरून येणाऱ्या फायबर केबल पुराच्या पाण्यामुळे तुटले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा खंडित झाली आहे. तरठ दिवसाआधी धारणीतील बीएसएनलच्या टाॅवरवर वीज कोसळल्याने तेथील कंट्रोल रूममधील वायर जळाले होते. त्यामुळे तालुक्यातील इंटरनेट सेवा अवलंबून असून शहरातील शासकीय कार्यालयातील ऑनलाइनची कामे ठप्प पडली. तालुक्यातील बँकेची सुविधा सहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण हेलपाटे सहन करावे लागत आहे.