शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाला भगदाड

By admin | Updated: July 22, 2015 00:45 IST

तिवसानजीक असणाऱ्या उर्ध्व वर्धा कालवे विभागाच्या अस्तरीकरणाला गावरस्ता पूल असणाऱ्या (व्हीआरबी) ४५/९२३ या...

शेतकऱ्यांच्या वर्दळीचा पूल : तिवसा कालवे विभाग क्र. १ कडे देखभाल, दुरूस्तीगजानन मोहोड अमरावतीतिवसानजीक असणाऱ्या उर्ध्व वर्धा कालवे विभागाच्या अस्तरीकरणाला गावरस्ता पूल असणाऱ्या (व्हीआरबी) ४५/९२३ या पुलाखालीच मोठे भगदाड पडल्याने पूल खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा पूल खचण्यासोबतच ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणामुळे कालवे पाझरून शेती खराब होण्याची स्थिती आहे. पॅकेजच्या कामातील अभियंत्यांसह कंत्राटदारांच्या संगनमतातून झालेल्या कोट्यवधींच्या बोगस कामामुळे उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात सिंचनासाठी मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. मात्र या कालव्याच्या पाझरामुळे शेती खराब होत असल्याने त्यावर अस्तरीकरण करण्यात आले. मुळात भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या कालवे विभागाद्वारा या अस्तरीकरणावर कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे.या विभागांची होती कामेमुख्य कालव्याला तिवसा तालुका परिसरात करावयाची अस्तरीकरणाची कामे ही अमरावतीच्या कालवे विभाग क्र. १ या कार्यालयाद्वारा करण्यात आली. तसेच कुऱ्हा येथेही उपविभागीय कार्यालय आहे. अस्तरीकरणाच्या बोगस कामातील भ्रष्टाचार हा मुरुमांनी बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न या विभागाद्वारा करण्यात येतो. मात्र ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणावरून यापूर्वी झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येत आहे.