शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाला भगदाड

By admin | Updated: July 22, 2015 00:45 IST

तिवसानजीक असणाऱ्या उर्ध्व वर्धा कालवे विभागाच्या अस्तरीकरणाला गावरस्ता पूल असणाऱ्या (व्हीआरबी) ४५/९२३ या...

शेतकऱ्यांच्या वर्दळीचा पूल : तिवसा कालवे विभाग क्र. १ कडे देखभाल, दुरूस्तीगजानन मोहोड अमरावतीतिवसानजीक असणाऱ्या उर्ध्व वर्धा कालवे विभागाच्या अस्तरीकरणाला गावरस्ता पूल असणाऱ्या (व्हीआरबी) ४५/९२३ या पुलाखालीच मोठे भगदाड पडल्याने पूल खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा पूल खचण्यासोबतच ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणामुळे कालवे पाझरून शेती खराब होण्याची स्थिती आहे. पॅकेजच्या कामातील अभियंत्यांसह कंत्राटदारांच्या संगनमतातून झालेल्या कोट्यवधींच्या बोगस कामामुळे उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात सिंचनासाठी मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. मात्र या कालव्याच्या पाझरामुळे शेती खराब होत असल्याने त्यावर अस्तरीकरण करण्यात आले. मुळात भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या कालवे विभागाद्वारा या अस्तरीकरणावर कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे.या विभागांची होती कामेमुख्य कालव्याला तिवसा तालुका परिसरात करावयाची अस्तरीकरणाची कामे ही अमरावतीच्या कालवे विभाग क्र. १ या कार्यालयाद्वारा करण्यात आली. तसेच कुऱ्हा येथेही उपविभागीय कार्यालय आहे. अस्तरीकरणाच्या बोगस कामातील भ्रष्टाचार हा मुरुमांनी बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न या विभागाद्वारा करण्यात येतो. मात्र ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणावरून यापूर्वी झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येत आहे.