शेतकऱ्यांच्या वर्दळीचा पूल : तिवसा कालवे विभाग क्र. १ कडे देखभाल, दुरूस्तीगजानन मोहोड अमरावतीतिवसानजीक असणाऱ्या उर्ध्व वर्धा कालवे विभागाच्या अस्तरीकरणाला गावरस्ता पूल असणाऱ्या (व्हीआरबी) ४५/९२३ या पुलाखालीच मोठे भगदाड पडल्याने पूल खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या वाहतुकीचा पूल खचण्यासोबतच ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणामुळे कालवे पाझरून शेती खराब होण्याची स्थिती आहे. पॅकेजच्या कामातील अभियंत्यांसह कंत्राटदारांच्या संगनमतातून झालेल्या कोट्यवधींच्या बोगस कामामुळे उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात सिंचनासाठी मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. मात्र या कालव्याच्या पाझरामुळे शेती खराब होत असल्याने त्यावर अस्तरीकरण करण्यात आले. मुळात भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या कालवे विभागाद्वारा या अस्तरीकरणावर कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे.या विभागांची होती कामेमुख्य कालव्याला तिवसा तालुका परिसरात करावयाची अस्तरीकरणाची कामे ही अमरावतीच्या कालवे विभाग क्र. १ या कार्यालयाद्वारा करण्यात आली. तसेच कुऱ्हा येथेही उपविभागीय कार्यालय आहे. अस्तरीकरणाच्या बोगस कामातील भ्रष्टाचार हा मुरुमांनी बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न या विभागाद्वारा करण्यात येतो. मात्र ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणावरून यापूर्वी झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येत आहे.
मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाला भगदाड
By admin | Updated: July 22, 2015 00:45 IST