शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

महेंद्री वनक्षेत्र होणार अभयारण्य, शासनाने केली समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

फोटो - वरूड १८ पी जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर संजय खासबागे वरूड : नैसर्गिक ...

फोटो - वरूड १८ पी

जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर

संजय खासबागे

वरूड : नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या वरूड तालुक्याच्या वनवैभवात भर टाकणाऱ्या महेंद्री जंगलाला अभयारण्य घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ५ ऑगस्टच्या शासननिर्णयानुसार यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. या जंगलाला सातपुड्याच्या किनार लाभली आहे. वर्धा डायव्हर्शन, सुपर एक्सप्रेस कॅनाल, शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नदी याच पर्वतातून येतात. वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरीण, रानडुक्कर यांसारखे प्राणी या जंगलात आहे. अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आहेत. वनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. १०८ वर्षांचे ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृहसुद्धा आहेत. वाघांची संख्या वाढली असून, मेळघाट ते ताडोबा आणि पेंचकरिता वाघांच्या आणि हिंस्त्र प्राण्यांच्या आवगमनासाठी महेंद्री जंगल परिसर हा मुख्य कॉरिडॉर आहे. अभयारण्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संध्या मिळेल, तर पर्यटकांची गर्दी वाढून जंगल सफारीचे माध्यमातून शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल. विदेशी पर्यटक, अभ्यासगट तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा विविध संशोधनाची सुविधा मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने २६ सप्टेंबर २०२० च्या बैठकीनंतर राजकीय आणि आणि वनक्षेत्रातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्याने प्रक्रिया काही काळ थंडबस्त्यात पडले होते. परंतु, ५ ऑगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महेंद्रीला अभयारण्याच्या कार्यवाहीला गती देऊन समिती नेण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ११ पैकी मोगरकसा वगळून १० संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावास मंडळाने मान्यता

प्रदान केली.

पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासणार

सुरुवातीला महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करून नंतर स्थानिक हितसंबंधित यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासून नजीकच्या काळात अभयारण्य घोषित करण्याची शक्यता पडताळून पाहण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

----------------------

महेंद्री अभयारण्य घोषित होणे गरजेचे आहे. यामुळे आदिवासींचा विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. अभयारण्य होण्यामागे प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.

- विजय श्रीराव, पुसला

----------------महेंद्री जंगल ही तालुक्याची शान आहे. अभयारण्य घोषित होणे म्हणजे विकासाची नांदी असून पर्यटनामुळे रोजगार व विकास होईल. इतर पर्यटनस्थळाचासुद्धा विकास होईल.

- सचिन आंजीकर, वरूड