शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

महेंद्री वनक्षेत्र होणार अभयारण्य, शासनाने केली समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

फोटो - वरूड १८ पी जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर संजय खासबागे वरूड : नैसर्गिक ...

फोटो - वरूड १८ पी

जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर

संजय खासबागे

वरूड : नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या वरूड तालुक्याच्या वनवैभवात भर टाकणाऱ्या महेंद्री जंगलाला अभयारण्य घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ५ ऑगस्टच्या शासननिर्णयानुसार यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. या जंगलाला सातपुड्याच्या किनार लाभली आहे. वर्धा डायव्हर्शन, सुपर एक्सप्रेस कॅनाल, शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नदी याच पर्वतातून येतात. वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरीण, रानडुक्कर यांसारखे प्राणी या जंगलात आहे. अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आहेत. वनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. १०८ वर्षांचे ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृहसुद्धा आहेत. वाघांची संख्या वाढली असून, मेळघाट ते ताडोबा आणि पेंचकरिता वाघांच्या आणि हिंस्त्र प्राण्यांच्या आवगमनासाठी महेंद्री जंगल परिसर हा मुख्य कॉरिडॉर आहे. अभयारण्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संध्या मिळेल, तर पर्यटकांची गर्दी वाढून जंगल सफारीचे माध्यमातून शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल. विदेशी पर्यटक, अभ्यासगट तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा विविध संशोधनाची सुविधा मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने २६ सप्टेंबर २०२० च्या बैठकीनंतर राजकीय आणि आणि वनक्षेत्रातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्याने प्रक्रिया काही काळ थंडबस्त्यात पडले होते. परंतु, ५ ऑगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महेंद्रीला अभयारण्याच्या कार्यवाहीला गती देऊन समिती नेण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ११ पैकी मोगरकसा वगळून १० संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावास मंडळाने मान्यता

प्रदान केली.

पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासणार

सुरुवातीला महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करून नंतर स्थानिक हितसंबंधित यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासून नजीकच्या काळात अभयारण्य घोषित करण्याची शक्यता पडताळून पाहण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

----------------------

महेंद्री अभयारण्य घोषित होणे गरजेचे आहे. यामुळे आदिवासींचा विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. अभयारण्य होण्यामागे प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.

- विजय श्रीराव, पुसला

----------------महेंद्री जंगल ही तालुक्याची शान आहे. अभयारण्य घोषित होणे म्हणजे विकासाची नांदी असून पर्यटनामुळे रोजगार व विकास होईल. इतर पर्यटनस्थळाचासुद्धा विकास होईल.

- सचिन आंजीकर, वरूड