शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्री वनक्षेत्र होणार अभयारण्य, शासनाने केली समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

फोटो - वरूड १८ पी जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर संजय खासबागे वरूड : नैसर्गिक ...

फोटो - वरूड १८ पी

जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर

संजय खासबागे

वरूड : नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या वरूड तालुक्याच्या वनवैभवात भर टाकणाऱ्या महेंद्री जंगलाला अभयारण्य घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ५ ऑगस्टच्या शासननिर्णयानुसार यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. या जंगलाला सातपुड्याच्या किनार लाभली आहे. वर्धा डायव्हर्शन, सुपर एक्सप्रेस कॅनाल, शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नदी याच पर्वतातून येतात. वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरीण, रानडुक्कर यांसारखे प्राणी या जंगलात आहे. अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आहेत. वनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. १०८ वर्षांचे ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृहसुद्धा आहेत. वाघांची संख्या वाढली असून, मेळघाट ते ताडोबा आणि पेंचकरिता वाघांच्या आणि हिंस्त्र प्राण्यांच्या आवगमनासाठी महेंद्री जंगल परिसर हा मुख्य कॉरिडॉर आहे. अभयारण्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संध्या मिळेल, तर पर्यटकांची गर्दी वाढून जंगल सफारीचे माध्यमातून शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल. विदेशी पर्यटक, अभ्यासगट तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा विविध संशोधनाची सुविधा मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने २६ सप्टेंबर २०२० च्या बैठकीनंतर राजकीय आणि आणि वनक्षेत्रातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्याने प्रक्रिया काही काळ थंडबस्त्यात पडले होते. परंतु, ५ ऑगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महेंद्रीला अभयारण्याच्या कार्यवाहीला गती देऊन समिती नेण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ११ पैकी मोगरकसा वगळून १० संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावास मंडळाने मान्यता

प्रदान केली.

पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासणार

सुरुवातीला महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करून नंतर स्थानिक हितसंबंधित यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासून नजीकच्या काळात अभयारण्य घोषित करण्याची शक्यता पडताळून पाहण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

----------------------

महेंद्री अभयारण्य घोषित होणे गरजेचे आहे. यामुळे आदिवासींचा विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. अभयारण्य होण्यामागे प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.

- विजय श्रीराव, पुसला

----------------महेंद्री जंगल ही तालुक्याची शान आहे. अभयारण्य घोषित होणे म्हणजे विकासाची नांदी असून पर्यटनामुळे रोजगार व विकास होईल. इतर पर्यटनस्थळाचासुद्धा विकास होईल.

- सचिन आंजीकर, वरूड