शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्री वनक्षेत्र होणार अभयारण्य, शासनाने केली समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

फोटो - वरूड १८ पी जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर संजय खासबागे वरूड : नैसर्गिक ...

फोटो - वरूड १८ पी

जगाच्या नकाशावर येणार वरूड तालुका, अनेकांच्या रोजगारात पडणार भर

संजय खासबागे

वरूड : नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या वरूड तालुक्याच्या वनवैभवात भर टाकणाऱ्या महेंद्री जंगलाला अभयारण्य घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ५ ऑगस्टच्या शासननिर्णयानुसार यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. या जंगलाला सातपुड्याच्या किनार लाभली आहे. वर्धा डायव्हर्शन, सुपर एक्सप्रेस कॅनाल, शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नदी याच पर्वतातून येतात. वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरीण, रानडुक्कर यांसारखे प्राणी या जंगलात आहे. अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आहेत. वनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. १०८ वर्षांचे ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृहसुद्धा आहेत. वाघांची संख्या वाढली असून, मेळघाट ते ताडोबा आणि पेंचकरिता वाघांच्या आणि हिंस्त्र प्राण्यांच्या आवगमनासाठी महेंद्री जंगल परिसर हा मुख्य कॉरिडॉर आहे. अभयारण्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संध्या मिळेल, तर पर्यटकांची गर्दी वाढून जंगल सफारीचे माध्यमातून शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल. विदेशी पर्यटक, अभ्यासगट तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा विविध संशोधनाची सुविधा मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने २६ सप्टेंबर २०२० च्या बैठकीनंतर राजकीय आणि आणि वनक्षेत्रातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्याने प्रक्रिया काही काळ थंडबस्त्यात पडले होते. परंतु, ५ ऑगस्टच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महेंद्रीला अभयारण्याच्या कार्यवाहीला गती देऊन समिती नेण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ११ पैकी मोगरकसा वगळून १० संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावास मंडळाने मान्यता

प्रदान केली.

पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासणार

सुरुवातीला महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करून नंतर स्थानिक हितसंबंधित यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची व्यवहार्यता तपासून नजीकच्या काळात अभयारण्य घोषित करण्याची शक्यता पडताळून पाहण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

----------------------

महेंद्री अभयारण्य घोषित होणे गरजेचे आहे. यामुळे आदिवासींचा विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. अभयारण्य होण्यामागे प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.

- विजय श्रीराव, पुसला

----------------महेंद्री जंगल ही तालुक्याची शान आहे. अभयारण्य घोषित होणे म्हणजे विकासाची नांदी असून पर्यटनामुळे रोजगार व विकास होईल. इतर पर्यटनस्थळाचासुद्धा विकास होईल.

- सचिन आंजीकर, वरूड