शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र

By admin | Updated: September 29, 2014 22:51 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती

भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ : नितीन गडकरी यांचा आरोपतिवसा : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र या आघाडी सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला.सोमवारी सायंकाळी तिवसा येथे आयोजित भाजपच्या जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अरूण अडसड, प्रवीण पोटे, मतदारसंघाचे निरीक्षक व लखनौ येथील महापौर दिनेश शर्मा, पद्माकर पाकोडे, जिल्हा सरचिटणीस दिनेश सूर्यवंशी, विजय पुनसे, इंद्रायणी थेटे, रिपाइं आठवले गटाचे अनिल गोंडाणे, भाजपचे तिवसा तालुकाध्यक्ष नंदलाल गंधे, रूपेश ढेपे, अमरावती तालुकाध्यक्ष मोहन तळकीत, भातकुली तालुकाध्यक्ष मनोज लोखंडे, सुरेश मुंधडा, संघटन मंत्री शिवराय कुळकर्णी, तालुका सरचिटणीस शेखर नंदनवार आदी उपस्थित होते. यावेळी राजीव जामठे यांनी गडकरींच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. सभेत पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात सिंचन केवळ ०.०१ टक्क्यांनी वाढले, याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राज्यात ८० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यांना जर वीज जोडणी मिळाली असती तर ८ ते १० लाख हेक्टर सिंचनाचे क्षेत्र वाढले असते. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला असता. विजेचे भारनियमनही सुरू आहे. वीज नाही म्हणून या भागात उद्योग यायला तयार नाही. एमआयडीसी ओस पडली. भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार नाही, दररोज कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गावात रोजगार नाही म्हणून लोक शहराकडे धाव घेत आहेत. गाव ओस पडेल की काय, अशी परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने आणली असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यात किमान १० हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळेल असा उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा झाला, असा आरोप गडकरींनी केला. प्रास्ताविक निवेदिता चौधरी, संचालन व आभार प्रदर्शन जयंत डेहणकर यांनी केले.