शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र

By admin | Updated: September 29, 2014 22:51 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती

भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ : नितीन गडकरी यांचा आरोपतिवसा : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र या आघाडी सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला.सोमवारी सायंकाळी तिवसा येथे आयोजित भाजपच्या जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अरूण अडसड, प्रवीण पोटे, मतदारसंघाचे निरीक्षक व लखनौ येथील महापौर दिनेश शर्मा, पद्माकर पाकोडे, जिल्हा सरचिटणीस दिनेश सूर्यवंशी, विजय पुनसे, इंद्रायणी थेटे, रिपाइं आठवले गटाचे अनिल गोंडाणे, भाजपचे तिवसा तालुकाध्यक्ष नंदलाल गंधे, रूपेश ढेपे, अमरावती तालुकाध्यक्ष मोहन तळकीत, भातकुली तालुकाध्यक्ष मनोज लोखंडे, सुरेश मुंधडा, संघटन मंत्री शिवराय कुळकर्णी, तालुका सरचिटणीस शेखर नंदनवार आदी उपस्थित होते. यावेळी राजीव जामठे यांनी गडकरींच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. सभेत पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात सिंचन केवळ ०.०१ टक्क्यांनी वाढले, याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राज्यात ८० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यांना जर वीज जोडणी मिळाली असती तर ८ ते १० लाख हेक्टर सिंचनाचे क्षेत्र वाढले असते. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला असता. विजेचे भारनियमनही सुरू आहे. वीज नाही म्हणून या भागात उद्योग यायला तयार नाही. एमआयडीसी ओस पडली. भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार नाही, दररोज कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गावात रोजगार नाही म्हणून लोक शहराकडे धाव घेत आहेत. गाव ओस पडेल की काय, अशी परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने आणली असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यात किमान १० हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळेल असा उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा झाला, असा आरोप गडकरींनी केला. प्रास्ताविक निवेदिता चौधरी, संचालन व आभार प्रदर्शन जयंत डेहणकर यांनी केले.