शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा;  नैतिक, अनैतिकतेचे प्रतीक ‘वारूळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:09 IST

अकोला: प्रत्येक माणसाच्या मनात विचारांचे वारू ळ निर्माण होत असते. नैतिक आणि अनैतिक दोन्ही विचारांचे चक्र मनात घोंघावत असतात. नैतिकतेवर अनैतिकता कशी हावी होते, याचा झगडा म्हणजे ‘वारू ळ’.

अकोला: प्रत्येक माणसाच्या मनात विचारांचे वारू ळ निर्माण होत असते. नैतिक आणि अनैतिक दोन्ही विचारांचे चक्र मनात घोंघावत असतात. नैतिकतेवर अनैतिकता कशी हावी होते, याचा झगडा म्हणजे ‘वारू ळ’. नैतिकता आणि अनैतिकतेचे प्रतीक म्हणून मुंग्यांचे वारू ळ असते. मुंग्यांनी तयार केलेल्या वारुळात नाग जेव्हा कब्जा करतो, तेव्हा त्या मुंग्यांना आपले वारू ळ सोडावे लागते, तसेच माणसाच्या मनातील चांगल्या विचारांवर जेव्हा वाईट विचारांचे साम्राज्य पसरते, तेव्हा चांगला माणूस वाईट मार्गावर लागतो. वारू ळ या नाटकांमध्ये दोन चांगल्या विचारांची माणसे वाईट विचाराच्या माणसावर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करीत असतात, हेच वारू ळ या नाटकातून कलाकारांनी उत्तमपणे मांडले.५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत शनिवारी कलारसिक शिक्षण व सांस्कृतिक बहूद्देशीय संस्था बुलडाणाच्यावतीने वारू ळ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास वीस वर्षांनंतर डॉ. सुनील गजरे आणि गीता जोशी यांनी ‘कमबॅक’ केले. एवढे वर्ष डॉ. गजरे यांच्या अभिनयाला नाट्य रसिक मुकलेली होती. या नाटकातून डॉ. गजरे यांनी रंगभूमीवर कमबॅक केल्याने रसिकांना सर्वोत्तम अभिनय पाहण्याची संधी मिळाली. या नाटकात मुंग्यांची भूमिका उमेश जाधव यांनी केली. राणीचे पात्र गीता जोशी यांनी उत्तम वठविले. डॉ. सुनील गजरे यांनी यामध्ये डॉ. काल्याची भूमिका रंगविली. राजेंद्र पोळ यांचे दर्जेदार लिखाण आणि उमेश जाधव यांचे दमदार दिग्दर्शन नाटकाला लाभले. यातील तिन्ही कलाकार दिग्गज असल्याने नाटक अतिशय सुंदर झाले. विशालचे संगीतही चांगले होते. प्रकाश योजना अनिल कुळकर्णी यांची होती. भूषण झडपे आणि सचिन दलाल यांनी नाटकाला साजेशे नेपथ्य दिले.यामधील पात्र मुंग्या आणि राणी परिस्थितीने गांजलेली असूनही नैतिकतेची साथ दोघेही कधीच सोडत नाही. त्याउलट काल्या हा परिस्थितीने चांगला असूनही अनैतिक त्याच्यावर हावी झालेली असते. पहिले वारू ळ अस्तित्वात असताना जेव्हा दुसरे वारू ळ तयार होत असते, तेव्हा पहिल्या वारुळाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असतो. शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवण्यात वारू ळ नाटकातील कलाकारांनी यश मिळविले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक