शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा;  नैतिक, अनैतिकतेचे प्रतीक ‘वारूळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:09 IST

अकोला: प्रत्येक माणसाच्या मनात विचारांचे वारू ळ निर्माण होत असते. नैतिक आणि अनैतिक दोन्ही विचारांचे चक्र मनात घोंघावत असतात. नैतिकतेवर अनैतिकता कशी हावी होते, याचा झगडा म्हणजे ‘वारू ळ’.

अकोला: प्रत्येक माणसाच्या मनात विचारांचे वारू ळ निर्माण होत असते. नैतिक आणि अनैतिक दोन्ही विचारांचे चक्र मनात घोंघावत असतात. नैतिकतेवर अनैतिकता कशी हावी होते, याचा झगडा म्हणजे ‘वारू ळ’. नैतिकता आणि अनैतिकतेचे प्रतीक म्हणून मुंग्यांचे वारू ळ असते. मुंग्यांनी तयार केलेल्या वारुळात नाग जेव्हा कब्जा करतो, तेव्हा त्या मुंग्यांना आपले वारू ळ सोडावे लागते, तसेच माणसाच्या मनातील चांगल्या विचारांवर जेव्हा वाईट विचारांचे साम्राज्य पसरते, तेव्हा चांगला माणूस वाईट मार्गावर लागतो. वारू ळ या नाटकांमध्ये दोन चांगल्या विचारांची माणसे वाईट विचाराच्या माणसावर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करीत असतात, हेच वारू ळ या नाटकातून कलाकारांनी उत्तमपणे मांडले.५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत शनिवारी कलारसिक शिक्षण व सांस्कृतिक बहूद्देशीय संस्था बुलडाणाच्यावतीने वारू ळ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास वीस वर्षांनंतर डॉ. सुनील गजरे आणि गीता जोशी यांनी ‘कमबॅक’ केले. एवढे वर्ष डॉ. गजरे यांच्या अभिनयाला नाट्य रसिक मुकलेली होती. या नाटकातून डॉ. गजरे यांनी रंगभूमीवर कमबॅक केल्याने रसिकांना सर्वोत्तम अभिनय पाहण्याची संधी मिळाली. या नाटकात मुंग्यांची भूमिका उमेश जाधव यांनी केली. राणीचे पात्र गीता जोशी यांनी उत्तम वठविले. डॉ. सुनील गजरे यांनी यामध्ये डॉ. काल्याची भूमिका रंगविली. राजेंद्र पोळ यांचे दर्जेदार लिखाण आणि उमेश जाधव यांचे दमदार दिग्दर्शन नाटकाला लाभले. यातील तिन्ही कलाकार दिग्गज असल्याने नाटक अतिशय सुंदर झाले. विशालचे संगीतही चांगले होते. प्रकाश योजना अनिल कुळकर्णी यांची होती. भूषण झडपे आणि सचिन दलाल यांनी नाटकाला साजेशे नेपथ्य दिले.यामधील पात्र मुंग्या आणि राणी परिस्थितीने गांजलेली असूनही नैतिकतेची साथ दोघेही कधीच सोडत नाही. त्याउलट काल्या हा परिस्थितीने चांगला असूनही अनैतिक त्याच्यावर हावी झालेली असते. पहिले वारू ळ अस्तित्वात असताना जेव्हा दुसरे वारू ळ तयार होत असते, तेव्हा पहिल्या वारुळाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असतो. शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवण्यात वारू ळ नाटकातील कलाकारांनी यश मिळविले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक