शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

Maharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

आयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे.

ठळक मुद्देचंद्रकुमार यांचे सर्व यंत्रणांना निर्देश : निवडणूक प्रक्रियेत जबाबदारी अचूकपणे पार पाडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ही स्थानिक संदर्भांमुळे अधिक संवेदनशील असते. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्षांसह प्रक्रियेतील सर्व अधिकऱ्यांंनी नियमांचे काटेकोर पालन करावे. किरकोळ चूकही घडता कामा नये, अन्यथा निवडणूक याचिका दाखल होण्याचे प्रसंग उद्भवतात. प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारीे दिले.निवडणूक आयोगाच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला. त्यावेळी चंद्रभूषण कुमार यांच्यासह अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, कायदा व सुव्यवस्था राज्य नोडल ऑफिसर मिलिंद भारंबे, विशेष खर्च निरीक्षक बी. मुरली कुमार तसेच विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरूपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत चूक आढळल्यास चौकशी प्रक्रिया, दंडाची तरतूद आहे, याची जाणीव सर्व कर्मचाऱ्यांना हवी. त्यामुळे अधिक सुस्पष्ट, अचूक व पारदर्शक काम करावे. मतदान, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, केलेल्या व करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून कुमार यांनी आढावा घेतला.अतिरिक्त कुमक तयार असावीआयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे. मतदारांना मतदान पावती घरपोच मिळेल या दृष्टीने अगोदरच नियोजन करून त्या पोहोचत्या कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.मतदारांना सुविधा उपलब्ध करासेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्रांवरील इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक स्तरावर भरावयाची विवरणपत्रे, मॉक पोल, मतदानाची वेळ संपल्यावर करावयाची कार्यवाही आदीसंदर्भात पूर्णपणे माहिती द्यावी. सर्व शासकीय यंत्रणांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. अधिकाधिक मतदानासाठी प्रत्येक यंत्रणेने जनजागृतीवर भर द्यावा. मतदानाच्या काळात अधिक सजग असावे, असेही कुमार यांनी सांगितले.चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवामतदान केंद्रावर कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज राहावे. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलीस प्रशासनाने स्थापन केलेल्या पथकांकडून तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. मतदारांना प्रलोभन किंवा रोख रकमेचे वितरण आदी प्रकारांना आळा घालावा. प्रत्येक चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवून तपासणी करावी. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची दक्षता घेऊन कठोर कारवाई करावी, असे कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी भारंबे म्हणाले.

टॅग्स :amravati-acअमरावती