शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Maharashtra Election 2019 ; कमी टक्केवारीचे चिंतन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मतमोजणी केंद्रावर नाही लागणार जामर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार मतदानाचा टक्कावाढीसाठी शासन, प्रशासन स्तरावर जोरकस प्रयत्न झाले. वास्तविकत: अमरावती जिल्ह्यात ६०.५७ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचे प्रशासन स्तरावर चिंतन केले जाईल. काय उणिवा राहिल्यात, याबाबत योग्य ती दिशा ठरविली जाईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, आठही मतदारसंघांत केवळ जिल्ह्याची टक्केवारी ६०.५७ एवढ्यावर थांबली आहे. मतदानाची कमी टक्केवारी ही प्रगल्भ लोकशाहीसाठी मारक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त के ले. विशेषत: अमरावती मतदारसंघात ४९.४३ तर, बडनेरा मतदारसंघात ५२.०७ एवढी मतदानाची टक्केवारी ही चिंतनीय आहे.या दोन्ही मतदारसंघांत थोडेफार ग्रामीण भाग असून, बहुतांश शहरी भाग असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असे निवडणुकीअगोदरचे चित्र होते. मात्र, शहरी भागात मतदारांनी मतदानाकडे का पाठ दाखविली, याचे प्रशासन स्तरावर चिंतन केले जाणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी नवाल यांनी सांगितले. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पाल्यांकडून मतदान करण्याविषयी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. मतदार जनजागृतीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. असे असताना मतदानाची कमी टक्केवारी ही प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. परिणामी मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत प्रशासन स्तरावर मंथन केले जाईल. मतदानाच्या वाढीव टक्केवारीसाठी भविष्यात कोणत्या उपाययोजना करता येतील, या दिशेने प्रयत्न केले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला.मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मतमोजणी केंद्रावर जामर बसविण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे तसे कोणतेही आदेश नाहीत. अमरावती जिल्ह्यात आठही मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांवर जामर लागणार नाही, ही बाब जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केली आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने कडेकोट सुरक्षा असणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे नवाल यांनी सांगितले.

टॅग्स :amravati-acअमरावती