शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Maharashtra Election 2019 ; कमी टक्केवारीचे चिंतन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मतमोजणी केंद्रावर नाही लागणार जामर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार मतदानाचा टक्कावाढीसाठी शासन, प्रशासन स्तरावर जोरकस प्रयत्न झाले. वास्तविकत: अमरावती जिल्ह्यात ६०.५७ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचे प्रशासन स्तरावर चिंतन केले जाईल. काय उणिवा राहिल्यात, याबाबत योग्य ती दिशा ठरविली जाईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, आठही मतदारसंघांत केवळ जिल्ह्याची टक्केवारी ६०.५७ एवढ्यावर थांबली आहे. मतदानाची कमी टक्केवारी ही प्रगल्भ लोकशाहीसाठी मारक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त के ले. विशेषत: अमरावती मतदारसंघात ४९.४३ तर, बडनेरा मतदारसंघात ५२.०७ एवढी मतदानाची टक्केवारी ही चिंतनीय आहे.या दोन्ही मतदारसंघांत थोडेफार ग्रामीण भाग असून, बहुतांश शहरी भाग असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असे निवडणुकीअगोदरचे चित्र होते. मात्र, शहरी भागात मतदारांनी मतदानाकडे का पाठ दाखविली, याचे प्रशासन स्तरावर चिंतन केले जाणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी नवाल यांनी सांगितले. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पाल्यांकडून मतदान करण्याविषयी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. मतदार जनजागृतीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. असे असताना मतदानाची कमी टक्केवारी ही प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. परिणामी मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत प्रशासन स्तरावर मंथन केले जाईल. मतदानाच्या वाढीव टक्केवारीसाठी भविष्यात कोणत्या उपाययोजना करता येतील, या दिशेने प्रयत्न केले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला.मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मतमोजणी केंद्रावर जामर बसविण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे तसे कोणतेही आदेश नाहीत. अमरावती जिल्ह्यात आठही मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांवर जामर लागणार नाही, ही बाब जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केली आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने कडेकोट सुरक्षा असणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे नवाल यांनी सांगितले.

टॅग्स :amravati-acअमरावती