शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Election 2019 ; प्रचार थांबला, ‘पोलिंग पार्टी’ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दुर्गम भाग असलेल्या मेळघाट मतदारसंघात शनिवारी ३५३ मतदान पार्ट्या रवाना झाल्या. आता रविवारी उर्वरित ...

ठळक मुद्देआठ विधानसभा मतदारसंघ : १६ हजार मनुष्यबळावर निवडणुकीचा डोलारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुर्गम भाग असलेल्या मेळघाट मतदारसंघात शनिवारी ३५३ मतदान पार्ट्या रवाना झाल्या. आता रविवारी उर्वरित सात मतदारसंघांमध्ये २२७५ पार्ट्या रवाना होणार आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ६ नंतर जाहीर प्रचार बंद झाला. आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.मेळघाटात शॅडो एरियातील १३३ मतदान केंद्रे आहेत. यापैकी ४१ केंद्रांवर कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. या ठिकाणी वायरलेसच्या मदतीने संपर्क होणार आहे. यामध्ये २५ मतदान केंद्रांमध्ये बॅटरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये २६२८ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये २१ साहाय्यकारी केंद्रांचा समावेश आहे तसेच १७५० केंद्र शहरी भागात, तर ८७८ केंद्रे ही ग्रामीण भागात आहेत. या ठिकाणी मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२६५ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदानासाठी एक सेवक राहणार आहे. त्यांच्यासाठी रॅम्पची सुविधा तसेच १८०० व्हीलचेअर मतदान केंद्रांवर राहणार आहेत. ९६ टक्के मतदारांपर्यंत फोटो व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आलेले आहे. यावेळी ११ आदर्श केंदे्र, १० सखी व दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रे राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.निवडणुकीसाठी एकूण १६ हजार अधिकारी व कर्मचाºयांचे मनुष्यबळ राहणार आहे. यामध्ये २८८९ मतदान केंद्राध्यक्ष व त्यांच्या सहकार्याला प्रत्येकी तीन मतदान अधिकारी तसेच ५४४८ पोलीस पाटील व कोतवाल असे एकूण १५ हजार ९६० कर्मचाºयांचा ताफा राहणार आहे.ग्रामीणमध्ये ४८५८ पोलीसअधिकारी-कर्मचाºयांचा ‘वॉच’संपूर्ण अमरावती मतदारसंघ व बडनेरातील चार बूथ वगळता जिल्हा ग्रामीणमध्ये २८५३ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची करडी नजर राहणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक आयजी, एसपी व अ‍ॅडिशनल एसपी, ७ डीवायएसपी, १३ पीआय, १३० एपीआय/पीएसआय, २०३० पोलीस कर्मचारी, १२२७ होमगार्ड यामध्ये ४०० मध्य प्रदेशातील, सीआरपीएफ ५ कंपनी यामध्ये प्रतिकंपनी ५०० जवानांचा समावेश राहणार आहे. पोलिसांच्या दृष्टीने ग्रामीण कार्यक्षेत्रात १०२ संवेदनशील मतदार केंदे्र, पाच क्रिटिकल मिळून १८९४ बूथ राहणार आहेत. याबाबतचा अंतिम आराखडा आयोगाला पाठविण्यात आलेला आहे.‘अमरावतीकर,चल मतदान कर’मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे जागृती करण्यात येत आहे. ‘माझे मतदान, माझा अभिमान’ तसेच ‘अमरावतीकर, चल मतदान कर’ या घोषवाक्यांद्वारे शहरासह जिल्ह्यात जागृती होत आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत पर्यावरणस्रेही नियोजन आहे. यामध्ये प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.‘त्या’ कार्यकर्त्यांनामतदारसंघ सोडण्याचे आदेशउमेदवाराच्या प्रचारार्थ मतदारसंघाबाहेरील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी डेरेदाखल आहेत. ते सर्व या मतदारसंघाचे मतदार नाहीत. प्रचार कालावधी संपल्यानंतर या व्यक्तींच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त वातावरणातील मतदानाची प्रक्रिया धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे प्रचाराचा कालावधी संपताच संबंधित मतदारसंघ सोडण्याचे आदेश देण्यात आले. या व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणाची पाहणी करून याबाबतचा अहवाल पोलिसांना निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर करावा लागणार आहे.एका उमेदवारालातीन वाहनांची परवानगीमतदानाच्या दिवशी एका उमेदवाराला तीन वाहने वापरण्यास परवानगी राहणार आहे. यामध्ये उमेदवाराला स्वत:, दुसरे त्याच्या प्रतिनिधीला व तिसरे त्याच्या कार्यकर्त्यांसाठी राहणार आहे. उमेदवार जर अनुपस्थित असेल, तर त्याचे वाहन दुसºयाला वापरता येणार नाही. कोणत्याही नेत्यास अन्य वाहन वापरण्याची परवानगी राहणार नाही. वाहनाला असलेली परवानगी वाहनाच्या डाव्या बाजूच्या काचेला चिकटावी लागणार आहे. या वाहनातून मतदारांची वाहतूक केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ १३३ आणि १२३ (५) अन्वये भ्रष्ट कृती गृहीत धरली जाणार आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती