शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बहिरम संस्थांनच्या महापूजेने यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:06 IST

हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेले बहिरमबाबा येथे नवस फेडण्याकरिता लाखो भक्तांची मांदियाळी बहिरम येथे जमणार आहे. आज सकाळी बहीरम बाबा संस्थांनचे विश्वस्तांनी होमहवन, अभिषेक व पूजा करून यात्रेचा शुभारंभ केला.

ठळक मुद्देविश्वस्तांतर्फे अभिषेक : होम हवन, पूजा, यात्रेत सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेले बहिरमबाबा येथे नवस फेडण्याकरिता लाखो भक्तांची मांदियाळी बहिरम येथे जमणार आहे. आज सकाळी बहीरम बाबा संस्थांनचे विश्वस्तांनी होमहवन, अभिषेक व पूजा करून यात्रेचा शुभारंभ केला.नवसाला पावणारा बहिरम बाबाची यात्रा दीड महिन्यापर्यंत भरते. यामध्ये परिसरातील आदिवासी कुटुंब तसेच कुलदैवत माननारे हजारो कुटुंब नवस फेडण्याकरिता बहिरम यात्रेत येतात. दरवर्षी २० डिसेंबरला मंदिर संस्थानच्या विश्वस्तांतर्फे विधीवत पूजन करून यात्रेची सुरुवात होते. मंदिराचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील चौधरी सपत्नीक सकाळी साडे आठ वाजता बहीरम बाबा मूर्तीचे, अष्टभूजा गणेश मूर्तीचे तसेच भवानी माता व शंकराच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर परिसरात विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे सचिव प्रकाश ठाकरे, कोषाध्यक्ष सुरेश ठाकरे, विश्वस्त प्रेम चौधरी, सुनील ठाकरे, विठोजी चिलाटे, किशोर ठाकरेसह सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी विधिवत पूजा करून नवसाला पावणाऱ्या देवाला सर्वत्र सुख-समृद्धी व शांतता पसरू दे, असे साकडे घातले.आजपासून सुरू झालेल्या या यात्रेत यात्रेकरूंची संख्या नगण्य असली तरीही शनिवार व रविवार या दिवशी ही यात्रा गजबजून जाते. मंदिर प्रशासन रात्रंदिवस नियोजन बद्ध कार्य करून भविकाना दर्शनाकरिता अडचण येणार नाही, अशी चोख व्यवस्था करतात. बहिरम परिसर हा शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत येत असून, येथील ठाणेदार मुकुंद कवाडे यांनीसुद्धा मंदिर परिसराची तसेच बहिरम बाबांची पाहणी केली असल्याची माहिती दिली. बहिरम यात्रेत पंचायत समिती व जिल्हा परिषदतर्फे सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून न दिल्याने तसेच यात्रेत अनेक सुविधांचा अभाव असून, यात्रेतील दुकानदारांना व यात्रेकरूंना उघड्यावरच शौचालयला जावे लागणार आहे. तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.