शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बहिरम संस्थांनच्या महापूजेने यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:06 IST

हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेले बहिरमबाबा येथे नवस फेडण्याकरिता लाखो भक्तांची मांदियाळी बहिरम येथे जमणार आहे. आज सकाळी बहीरम बाबा संस्थांनचे विश्वस्तांनी होमहवन, अभिषेक व पूजा करून यात्रेचा शुभारंभ केला.

ठळक मुद्देविश्वस्तांतर्फे अभिषेक : होम हवन, पूजा, यात्रेत सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेले बहिरमबाबा येथे नवस फेडण्याकरिता लाखो भक्तांची मांदियाळी बहिरम येथे जमणार आहे. आज सकाळी बहीरम बाबा संस्थांनचे विश्वस्तांनी होमहवन, अभिषेक व पूजा करून यात्रेचा शुभारंभ केला.नवसाला पावणारा बहिरम बाबाची यात्रा दीड महिन्यापर्यंत भरते. यामध्ये परिसरातील आदिवासी कुटुंब तसेच कुलदैवत माननारे हजारो कुटुंब नवस फेडण्याकरिता बहिरम यात्रेत येतात. दरवर्षी २० डिसेंबरला मंदिर संस्थानच्या विश्वस्तांतर्फे विधीवत पूजन करून यात्रेची सुरुवात होते. मंदिराचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील चौधरी सपत्नीक सकाळी साडे आठ वाजता बहीरम बाबा मूर्तीचे, अष्टभूजा गणेश मूर्तीचे तसेच भवानी माता व शंकराच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर परिसरात विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे सचिव प्रकाश ठाकरे, कोषाध्यक्ष सुरेश ठाकरे, विश्वस्त प्रेम चौधरी, सुनील ठाकरे, विठोजी चिलाटे, किशोर ठाकरेसह सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी विधिवत पूजा करून नवसाला पावणाऱ्या देवाला सर्वत्र सुख-समृद्धी व शांतता पसरू दे, असे साकडे घातले.आजपासून सुरू झालेल्या या यात्रेत यात्रेकरूंची संख्या नगण्य असली तरीही शनिवार व रविवार या दिवशी ही यात्रा गजबजून जाते. मंदिर प्रशासन रात्रंदिवस नियोजन बद्ध कार्य करून भविकाना दर्शनाकरिता अडचण येणार नाही, अशी चोख व्यवस्था करतात. बहिरम परिसर हा शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत येत असून, येथील ठाणेदार मुकुंद कवाडे यांनीसुद्धा मंदिर परिसराची तसेच बहिरम बाबांची पाहणी केली असल्याची माहिती दिली. बहिरम यात्रेत पंचायत समिती व जिल्हा परिषदतर्फे सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून न दिल्याने तसेच यात्रेत अनेक सुविधांचा अभाव असून, यात्रेतील दुकानदारांना व यात्रेकरूंना उघड्यावरच शौचालयला जावे लागणार आहे. तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.