शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

महादेवखोरी मार्गाची दुरवस्था

By admin | Updated: August 1, 2015 01:38 IST

खड्ड्यांमध्ये साचते पाणी : डागडुजीचा अभाव, वाहनधारकांना होतोय त्रास, जबाबदार कोण?

खड्ड्यांमध्ये साचते पाणी : डागडुजीचा अभाव, वाहनधारकांना होतोय त्रास, जबाबदार कोण?अमरावती : स्थानिक अमरावती शहरातील भरगच्च लोकवस्तीचा भाग म्हणजे यशोदानगर, जुना बायपास हा अतिशय वाहता रस्ता असल्यामुळे यशोदानगरातून सर्व ठिकाणी मुख्य जोडरस्ते गेलेले आहेत. यातीलच एक पूर्वेकडील महादेवखोरी मार्ग हा फारच वाहता रस्ता व दाट लोकवस्तीचा भाग आहे.ऐन पावसाळ्याच्या मुहूर्तावर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या मुख्य रहदारी रस्त्याची साधी डागडुजीदेखील करण्यात आली नाही. त्यामुळे या रहदारी मार्गावरून वाहन चालविणे तर सोडाच, पण पायी चालणेसुध्दा कठीण झाले आहे. या प्रभागातील समस्त नागरिकांनी वेळोवेळी जनप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला. परंतु काही फलित झाले नाही. एके काळच्या मुख्य डांबरी रस्त्याचे रुपांतरण आता ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे, पाण्याच्या डबक्यामुळे, रस्त्यावरील माती, गिट्टी उखडल्यामुळे, आपण खेडेगावात राहतो आहो की काय, असे नागरिकांना वाटायला लागले आहे.सद्यस्थितीत पावसामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना, महाविद्यालयीन युवकांना, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तसेच सर्व व्यावसायिकांना याचा खूप मन:स्ताप सहन करावा लागत आहे. जनप्रतिनिधींनी व महानगरपालिका प्रशासनाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी व लवकरात लवकर रस्त्याची दुर्दशा थांबवून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. परिसरातील नागरिक यामुळे हैराण झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करून ते चकचकीत करण्यात आले असले तरी अंतर्गत रस्त्यांची अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. यशोदानगर ते महादेव खोरीपर्यंतचा मार्ग हे त्याचे जीवंत उदाहरण आहे. हा संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. थोडासा जरी पाऊस आला तरी पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचून राहते. परिणामी वाहनधारकांना अडचण निर्र्माण होते. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा नीट अंदाज येत नसल्याने अनेकदा वाहनधारक या खडड्यांमुळे उसळून पडतात. अनेकदा या मार्गावर किरकोळ अपघात झाले आहेत. या रस्त्याच्या डागडुजीची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अमरावती महापालिकेची आता ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरू असताना ही स्थिती अपेक्षित नाही. आयुक्तांनी या समस्येकडे तत्काळ लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.