शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

महाबीजचे वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:08 IST

यंदाही महाबीजचे सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने असदपूर परिसरातील २०० हेक्टरवर क्षेत्रात मोड आलेली आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यांना प्रमाणित कसे दाखविले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.

ठळक मुद्देउगवणच नाही : पेरणीला मोड, दुबार पेरणीची धास्ती, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाही महाबीजचे सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने असदपूर परिसरातील २०० हेक्टरवर क्षेत्रात मोड आलेली आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यांना प्रमाणित कसे दाखविले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.गतवर्षीच्या खरिपात कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्याने यंदा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे जास्त आहे. तसेच पाऊसदेखील उशिरा झाल्याने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतली मूग, उडदाचे पीक बाद होऊन सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे अचानकपणे सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले आहे. शेतकऱ्यांना परमीटवरील एक बॅग सोयाबीन बियाणे देखील मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल आहेत. अचलपूर तालुक्यात असदपूर, कोल्हा, काकडा, ईसापूर, रासेगाव आदी परिसरात महाबीजच्या ९३०५ व ३३५ या सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक असतांना तुरीची उगवण चांगली झाली. त्यामुळे पावसाचा खंड आदी कुठलेही कारण या ठिकाणी नाही. शासन अंगीकृत कंपनी असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)च्या बियाण्यांवर विश्वास ठेवून खरेदी केली, तर ‘भरवश्याच्या म्हशीने रेडा दिला’ त्यामुळे दुबार पेरणीसाठी महाबीजने चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.