शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाबीजचे वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:08 IST

यंदाही महाबीजचे सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने असदपूर परिसरातील २०० हेक्टरवर क्षेत्रात मोड आलेली आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यांना प्रमाणित कसे दाखविले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.

ठळक मुद्देउगवणच नाही : पेरणीला मोड, दुबार पेरणीची धास्ती, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाही महाबीजचे सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने असदपूर परिसरातील २०० हेक्टरवर क्षेत्रात मोड आलेली आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यांना प्रमाणित कसे दाखविले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.गतवर्षीच्या खरिपात कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्याने यंदा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे जास्त आहे. तसेच पाऊसदेखील उशिरा झाल्याने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतली मूग, उडदाचे पीक बाद होऊन सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे अचानकपणे सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले आहे. शेतकऱ्यांना परमीटवरील एक बॅग सोयाबीन बियाणे देखील मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल आहेत. अचलपूर तालुक्यात असदपूर, कोल्हा, काकडा, ईसापूर, रासेगाव आदी परिसरात महाबीजच्या ९३०५ व ३३५ या सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक असतांना तुरीची उगवण चांगली झाली. त्यामुळे पावसाचा खंड आदी कुठलेही कारण या ठिकाणी नाही. शासन अंगीकृत कंपनी असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)च्या बियाण्यांवर विश्वास ठेवून खरेदी केली, तर ‘भरवश्याच्या म्हशीने रेडा दिला’ त्यामुळे दुबार पेरणीसाठी महाबीजने चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.