शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला ‘खो’

By admin | Updated: September 3, 2015 00:11 IST

राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असले तरी रिध्दपूर परिसरातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याची ओरड वाढत आहे.

कर्मचाऱ्यांचे अपडाऊन : अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्षरिध्दपूर : राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असले तरी रिध्दपूर परिसरातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याची ओरड वाढत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. येथील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतु ग्रामीण भागातील शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, बँक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाचे तीनतेरा वाजविले आहे. आदेशाला न जुमानता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणावरून कर्मचारी ये-जा करतात. शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तसे भासवत आहेत. मुख्यालयी न राहता हे कर्मचारी घरभाड्याची उचल करतात. ही बनवाबनवी कर्मचारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांसमोर करीत आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, केंद्र प्रमुख, विद्युत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शिक्षकच मुख्यालयी राहात नसल्याने विद्यार्थ्यांवर वचक राहात नाही. पालक-शिक्षक संघ आणि इतर समित्या फक्त कागदावर असून याकडे कोणतेच प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत. लोकप्रतिनिधीचा वचक नसल्यामुळे हा प्रकार सुरू आहे. कर्मचारी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहून त्यांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिक्षण देतात. तेथून ते शासकीय कर्मचारी दुचाकीने ये-जा करतात. ग्रामीण भागात ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी मुक्कामी राहात नसल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)