शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला ‘खो’

By admin | Updated: September 3, 2015 00:11 IST

राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असले तरी रिध्दपूर परिसरातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याची ओरड वाढत आहे.

कर्मचाऱ्यांचे अपडाऊन : अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्षरिध्दपूर : राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असले तरी रिध्दपूर परिसरातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याची ओरड वाढत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. येथील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतु ग्रामीण भागातील शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, बँक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाचे तीनतेरा वाजविले आहे. आदेशाला न जुमानता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणावरून कर्मचारी ये-जा करतात. शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तसे भासवत आहेत. मुख्यालयी न राहता हे कर्मचारी घरभाड्याची उचल करतात. ही बनवाबनवी कर्मचारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांसमोर करीत आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, केंद्र प्रमुख, विद्युत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शिक्षकच मुख्यालयी राहात नसल्याने विद्यार्थ्यांवर वचक राहात नाही. पालक-शिक्षक संघ आणि इतर समित्या फक्त कागदावर असून याकडे कोणतेच प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत. लोकप्रतिनिधीचा वचक नसल्यामुळे हा प्रकार सुरू आहे. कर्मचारी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहून त्यांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिक्षण देतात. तेथून ते शासकीय कर्मचारी दुचाकीने ये-जा करतात. ग्रामीण भागात ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, विद्युत कर्मचारी मुक्कामी राहात नसल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)