शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

आठ दिवसांत मिळणार नुकसान भरपाई

By admin | Updated: February 29, 2016 23:59 IST

जिल्ह्यात २७ व २८ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ६१ गावांमधील २ हजार ५७३ शेतकऱ्यांच्या..

पालकमंत्री : ६१ गावांत ९ हजार २८ हेक्टरमध्ये १५ कोटींच्या हानीचा प्राथमिक अंदाज, शासनाला अहवाल सादरअमरावती : जिल्ह्यात २७ व २८ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ६१ गावांमधील २ हजार ५७३ शेतकऱ्यांच्या ९ हजार २८ हेक्टर क्षेत्रामधील शेतीपिके व फळपिकांचे १५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना या बाधित पिकांची नुकसान भरपाई आठ दिवसांत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी ७ बाधित गावांना भेटी दिल्यात. जिल्ह्यात गारपिटीने झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्र्यांशी चर्चा झाली. दोन-तीन दिवसांत जिल्ह्याला नुकसानीचे अनुदान प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाधित जिल्ह्यांसाठी १०० कोटी उपलब्धअमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील २८ गावांत १८५४ हेक्टरमधील गहू, ७२२ हेक्टरमधील हरभरा, ११०५ हेक्टरमध्ये असलेला भाजीपाला व ४१२२ हेक्टरमधील फळपिकांसह एकूण ७ हजार ७८ हेक्टरमधील पिकांची प्रचंड हानी झाली आहे. धामणगाव तालुक्यात २६० हेक्टर व अमरावती तालुक्यात ८६० हेक्टरमधील गहू व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. चांदूरबाजार तालुक्यात २८ घरांचे व २७ झोपड्यांचे नुकसान झाले. चिखलदरा तालुक्यात वीज पडल्याने १ बैल व १ म्हैस दगावली. त्यांना जिल्हास्तरावर मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यात अमरावती जिल्ह्यासह यवतमाळ, सातारा, परभणी व जालना जिल्ह्यातील शेतीपिकांचे वादळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने १०० कोटींची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे मागणी नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.गुरुवारपर्यंत पावसाची शक्यतापूर्वेकडून वाहणारे उष्णवारे, दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत हवेच्या कमी दाबामुळे तयार झालेली द्रोणीय स्थिती यामुळे विदर्भ मराठवड्यात गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याचा अंदाज आहे. ओंबीवर आलेला गहू जमीनदोस्तसध्या गव्हाचे पीक ओंबी धरण्याच्या स्थितीत आहे. गारपिटीमुळे हा गहू जमिनीवर लोळला. त्यामुळे दाणा बारकावणार आहे. तसेच हरभरा संवगणीच्या अवस्थेत आहे. गारपिटीमुळे घाट्याला मार बसला आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.संत्र्याच्या मृगबहराचे नुकसानसंत्र्याच्या मृगबहराची फळे झाडावर आहेत. या फळांना गारांचा मार बसला. फळे व पानांची गळ सुरू झाली आहे. मार लागलेल्या फळांची गळ होणार आहे. आंबिया बहरदेखील गळून पडला आहे. (प्रतिनिधी)३३ टक्क्यांवर बाधित पिकांना मदतजिल्ह्यात झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे ३३ टक्क्यांवर बाधित पिकांना केंद्राच्या नवीन निकषांप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे सरसकट सर्वच शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचणार असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले. -तर ‘त्या’ व्यापाऱ्याचा परवाना रद्द करूचांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी शनिवारी माल विक्रीसाठी आणला होता. मात्र, पावसामुळे तो भिजला. लिलाव झालेल्या धान्याची उचल न केल्यास त्या व्यापाऱ्याचा परवाना तत्काळ रद्द करण्याचे निर्देश बाजार समिती सचिवाला दिल्याचे देखील ना. पोटे यांनी सांगितले. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी २३ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत मिळणार आहे. प्राथमिक सर्वेक्षण करून शासनाला अहवाल पाठविला आहे. घरांची पडझड व प्राणहानीसाठी जिल्हास्तर नैसर्गिक आपत्ती निधीमधून मदत देण्यात येणार आहे. - किरण गित्ते, जिल्हाधिकारी २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मदतजिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीमुळे ९ हजार हेक्टर शेती व फळपिकांचे नुकसान झाले. २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत दिली जाईल. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. शेतकऱ्यांना जिल्हा काँग्रेसतर्फे मदत अमरावती : रविवारच्या वादळाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्याच दिवशीच जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मदतीचा हात दिला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सोमवारी चांदूरबाजार, अचलपूर, परतवाड्यासह अन्य गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व शक्य तेवढ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली. अखेरीस त्यांनी चांदूरच्या बाजार समितीमध्ये झालेल्या धान्याच्या नासाडीची पाहणी केली.  

 

शासनाने भरीव मदत द्यावीअमरावती : वादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.रविवारी वादळी पाऊस, गारपिटीने अचलपूर, चांदूरबाजार, परतवाड्यासह जिल्हाभरात शेतीपिकांची प्रचंड हानी झाली. गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा, संत्रा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम हातचा गेला असताना शेतकऱ्यांची रबीच्या पिकांवरच संपूर्ण मदार होती. मात्र, पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नुकसानीच्या खाईत लोटले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांना जिल्हा काँग्रेसने आर्थिक मदत दिल्याने संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, किशोर किटुकले, समीर देशमुख, शिवाजी बंड, नंदू वासनकर, मंगेश अटाळकर, मंगेश देशमुख, शिवानंद मदने, नारायण वाडेकर आदींचा सहभाग होता.अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय अनेक घरेदेखील क्षतिग्रस्त झाली आहेत. या सर्व नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. - बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी.