शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

धावत्या रेल्वेगाडीत लूटमार, प्रवासी असुरक्षित

By admin | Updated: January 30, 2017 01:12 IST

दोन दिवसांपूर्वी बडनेरापासून काही अंतरावर धावत्या पॅसेंजर गाडीतील प्रवाशांना ब्लेडच्या धाकावर लुटण्यात

बडनेरा : दोन दिवसांपूर्वी बडनेरापासून काही अंतरावर धावत्या पॅसेंजर गाडीतील प्रवाशांना ब्लेडच्या धाकावर लुटण्यात आले. या घटनेने प्रवासी प्रचंड धास्तावले आहेत. पॅसेंजर गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवाशांना पोलिसांचे संरक्षण मिळावे, अशी संतप्त मागणी केली जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या रात्री बडनेरा ते टिमटाळादरम्यान धावत्या पॅसेंजर गाडीच्या डब्यातील प्रवाशांना ब्लेडच्या धाकावर मारहाण करून त्यांच्या जवळील पैसे व मोबाईल हिसकाविण्याच्या घटनेमुळे पॅसेंजर गाडीतील प्रवासी प्रचंड धास्तावले होते. भुसावळ ते वर्धा पॅसेंजर गाडी उशिरा रात्री साडेबारा वाजता बडनेरा स्थानकावर पोहोचते. शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलेले भक्त मोठ्या संख्येने या गाडीतून परतीचा प्रवास करतात. यागाडीतील कमी प्रवासी असलेल्या डब्यातील प्रवाशांना पाच जणांच्या टोळीने ब्लेडच्या धाकावर लुटले. पुढे प्रवासी व बडनेरा रेल्वे पोलिसांनी पाचही आरोपींना पकडले. ज्या डब्यात लुटमारी झाली त्यातून पुरूषांसह महिला व लहान मुले देखील प्रवास करीत होते. सुदैवाने याप्रवाशांकडे मोठी रक्कम नव्हती. एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच उशिरा रात्री धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याची मागणी आहे. याघटनेतील सर्व आरोपी अकोल्याचे असून ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. यातील बहुतांश आरोपींवर अकोला शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकीकडे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालय नवनवीन उपाययोजना करीत आहेत. प्रत्यक्षात त्याचा प्रवाशांना कुठलाच फायदा होत नसल्याच्या संतप्त भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत. एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच पॅसेंजर गाड्यांमध्ये देखील रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांची नियमित गस्त सुरू करावी, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांची आहे. (शहर प्रतिनिधी) अवैध खाद्यपदार्थ विक्री देखील कारणीभूत ४धावत्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्यांमध्ये अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हैदोस घातला आहे. हासर्व प्रकार रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु आहे. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांची पार्श्वभूमी सुद्धा गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यामुळे लूटमारी, खिसेकापू, चोरी आदी प्रकारासाठी अवैध खाद्यपदार्थ विक्रेते जबाबदार आहेत.