शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्सचेंज’ अर्जांची विक्री करून ग्राहकांची लूट

By admin | Updated: November 17, 2016 00:04 IST

पाचशे व हजारांच्या नोटा ‘एक्सचेंज’साठी आवश्यक अर्जांचीही दोेन रूपयांत विक्री केली जात असल्याचा प्रका....

आयडीबीआय शाखेतील प्रकार : एटीएममधून ५०० रूपयेच काढण्याची सक्तीअमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा ‘एक्सचेंज’साठी आवश्यक अर्जांचीही दोेन रूपयांत विक्री केली जात असल्याचा प्रकार बुधवारी शहरातील न्यू स्वस्तिकनगरातील आयडीबीआय बँकेच्या शाखेत उघडकीस आला. पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही अवधीपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची प्रक्रिया बँकांमध्ये सुरू आहे. नोटांच्या अदलाबदलीसाठी बँकांमार्फत एक अर्ज दिला जातोे. संबंधिताच्या कुठल्याही एका ओळखपत्राची झेरॉक्स प्रत देऊन संबधित बँक जुन्या नोटांच्या बदलात नव्या नोटा ग्राहकांना देते. मात्र, शहरातील न्यू स्वस्तिकनगरातील आयडीबीआय बँकेत नोटा बदलण्याकरिता गेलेल्या नागरिकांना मात्र, बँकेद्वारे अर्ज न देता नजीकच्याच एका व्यापारी प्रतिष्ठानात पाठवून तेथून अर्ज घ्यायला सांगितले जाते. ग्राहक त्याठिकाणी गेल्यानंतर तेथे त्यांना दोन रूपये देऊन अर्ज विकत घेण्यास सांगितले जाते. एटीएममधूनही केवळ पाचशे रुपयेच काढण्याची सक्ती बँकेने केली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गोची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्यापासून अमरावतीकरांची प्रचंड ताराबंळ उडाली आहे. मागील पाच दिवसांपासून शहरात केवळ नोटांचीच चर्चा सुरु आहे. नोटा बदलविण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे राहणे, एटीएममध्ये पैसे नसणे, आदी समस्यांमध्ये ग्राहक अडकले आहेत. दैनंदिन गरजांसाठी लागणारा पैसा मिळावा, या उद्देशाने बहुंताश नागरिक बँका व एटीएममध्ये जात आहेत. मात्र, बँकामधील रांगा व एटीएममध्ये निर्माण झालेल्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आवश्यक तेवढे पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांची बरीचशी कामे अडकून पडली आहेत. शिलांगण मार्गावरील आयडबीआय बँकेत हे चित्र दिसून आले. नागरिकांना पाचशे व हजारांच्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी ग्राहकांना इतर बँकांमध्ये मोफत मिळणारा अर्ज देखील या बँकेत उपलब्ध नव्हता. तो शेजारच्या एका व्यापारी प्रतिष्ठानामार्फत दोन रूपयांना विकत घ्यावा लागत होता. आधीच चिल्लरचा तुटवडा असताना अर्ज घ्यावा तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यातच आयडीबीआयच्या एटीएममधून केवळ पाचशे रुपये काढण्यास परवानगी दिली जात आहे. एटीएममधून एकावेळी दोन हजार रुपये काढण्यास शासनाने परवानगी दिली असताना आयडीबीआयच्या एटीएमवर केवळ पाचशे रुपये काढण्यास सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे शासनाने ठरवून दिलेली रोख सुध्दा नागरिकांना मिळत नाही. बँकांनी नोटा एक्सचेंज करण्यासाठी अर्जाची झेरॉक्स नागरिकांना दिली तर चालेल. मात्र, त्या अर्जाची विक्री होत असेल तर संबंधित शाखेला सूचना देण्यात येईल. - सुनील रामटेके, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक. संबंधित शाखेला अर्जपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित शाखेतून अर्ज घेण्यास नागरिकांना दुसरीकडे पाठविले जात असेल तर हा प्रकार थांबविण्याच्या सूचना देण्यात येतील. - प्रदीप गायकवाड, व्यवस्थापक, आयडीबीआय