शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

धारणीत नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:57 IST

जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला खरा; मात्र आठ-दहा दिवसांपासून तोही गायब झाल्याने सरासरी शंभराहून ९१ टक्क्यांवर स्थिरावली आहे. लाखमोलाचे बियाणे जमिनीत पेरल्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

ठळक मुद्देमेळघाटातील शेतकरी चिंतातूर : बियाणे जमिनीत, ८० टक्के पेरण्या उलटण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला खरा; मात्र आठ-दहा दिवसांपासून तोही गायब झाल्याने सरासरी शंभराहून ९१ टक्क्यांवर स्थिरावली आहे. लाखमोलाचे बियाणे जमिनीत पेरल्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.तालुक्यात जून महिन्याच्या अखेरीस जवळपास ३० टक्के पेरणी झाली होती. त्यानंतर पावसाने संततधार सुरू केल्यामुळे पेरण्या खोळंबल्या. जुलैमध्ये पुन्हा पेरणी सुरू झाल्यावर ८ जुलैपर्यंत ५६ टक्के आणि सोमवारअखेर ८० टक्के पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरुण बेठेकर यांनी दिली. मात्र त्या पेरण्या उलटण्याची भीती आहे. पावसाने उघाड दिल्यावर पेरणी करण्यात आली. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे त्या पेरण्या अयशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. जमिनीखालील बियाण्याऐवजी शेतकऱ्यांनी नजरा आभाळावर रोखल्या आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास तालुक्यातील शेतकºयांवर मोठे संकट कोसळण्याची भीती वर्तविली जात आहे.तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ८२ हजार २७० हेक्टर असून, त्यातील ४६ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली जाते.तालुक्यात २०० मिमी पाऊसतालुक्यात १ जून ते १५ जुलै या कालावधीत अपेक्षित ३४७.५ मिमी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत ३१६.६ मिमी ( ९१.१ टक्के) पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित पावसाची सरासरी गाठून पाऊस पुढे गेला होता. मात्र आठ दिवसांच्या उघाडीनंतर ती सरासरी ९१ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.तालुक्यात ३२४२ हेक्टरवर सोयाबीन, ११ हजार ८० हेक्टरवर कापूस, ३९५० हेक्टरवर तूर, ३१०० हेक्टरवर ज्वारी, ४१२० हेक्टरवर मका, ७६६ हेक्टरवर धान व ३२ हेक्टरवर अन्य पिकांची पेरणी झाली आहे. शेतकºयांना आता पावसाची प्रतीक्षा लागून आहे.- अरुण बेठेकर, तालुका कृषी अधिकारी, धारणी