शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रग्रहण’२७ जुलै रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:07 IST

शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे.

ठळक मुद्दे‘ब्लड मून’ संबोधन : स्पर्शकाळ ते मोक्ष दरम्यान तीन तासांचा कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे. या ग्रहणाचा स्पर्शकाळ ते मोक्ष या दरम्यानचा कालावधी सुमारे तीन तासांचा असेल. त्यापैकी ग्रहणाची खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटांची राहणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.भारतात २७ जुलै रोजी रात्री ११.५४ वाजता चंद्रग्रहण लागेल. २८ जुलैच्या पहाटे ३.४९ वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. चंद्र्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो व सूर्य - पृथ्वी-चंद्र या तीनही गोलांचे मध्य एका सरळ रेषेत आणि पातळीत असावे लागतात. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकुच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो. त्यावेळी तो पूर्णपणे दिसेनासा होतो. याला ‘खग्रास चंद्रग्रहण’ असे म्हणतात. एका वर्षात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहण होतात. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे असतो. दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. यावेळी चंद्राची भ्रमणपातळी आयनिक पातळीशी ५ अंशांचा कोन करतो. पौर्णिमेला किंवा अमावस्येला चंद्र आयनिक पातळीच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला असू शकतो. त्यामुळे सूर्य-पृथ्वी-चंद्र एका रेषेत येऊ शकत नाही, असे खगोल अभ्यासकांनी सांगितले.२७ जुलैला मंगळ पृथ्वीच्या जवळमंगळ ग्रह हा २७ जुलै रोजी अगदी सूर्यासमोर राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर हे सरासरी कमी असते. पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर सरासरी १३ कोटी ६८ लक्ष ६७ हजार ६५७ कि.मी. आहे. परंतु प्रतियुती काळात हे अंतर ५ कोटी ७५ लक्ष कि.मी. राहील. सरासरी २६ महिन्यांनी सूर्य-मंगळ प्रतियुती असते. याआधी २२ मे २०१६ रोजी सूर्य - मंगळ प्रतियुती झाली होती. यानंतर ६ आॅक्टोबर २०२० रोजी मंगळ पृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी पृथ्वी मंगळ हे अंतर ६ कोटी २० लक्ष कि.मी. राहील.आयर्न आॅक्साईडमुळे मंगळ ग्रह लालमंगळ ग्रहावर आयर्न आॅक्साईडचे प्रमाण अधिक असल्याने हे ग्रह नेहमी लाल दिसते. या ग्रहाला एकूण दोन चंद्र आहेत. मंगळाचा व्यास ६,७९५ कि.मी. आहे. याला सूर्यभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास ६८७ दिवस लागतात. २० जुलै १९७६ आणि ६ आॅक्टोेबर १९७६ रोजी व्हायकिंग-१ आणि व्हायकिंग-२ या जुळ्या मानवरहित यानांनी मंगळाच्या मातीला प्रथम स्पर्श केला. या यानांनी जवळजवळ ११ महिन्यांचा प्रवास केला होता. २७ जुलै रोजी सूर्य मावळल्यावर लगेच पूर्व क्षितिजावर मंगळ ग्रह दिसेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. हा ग्रह साध्या डोळ्यांनी रात्रभर पाहता येईल व हा लाल रंगाचा असल्याने सहज ओळखतादेखील येईल.मानवी जीवनावर ग्रहणाचा परिणाम नाहीया विज्ञानयुगातसुद्धा ग्रहणासंदर्भात समाजात अनेक अंधश्रद्धा रुढ आहेत. अशा ग्रहणात जेवण करू नये, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, ग्रहण झाल्यावर आंघोळ करावी, ग्रहण झाल्यावर दान करावे, अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेही आधार नाही. ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. सर्व खगोलप्रेमिंनी व जिज्ञासूंनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर, प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.