शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रग्रहण’२७ जुलै रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:07 IST

शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे.

ठळक मुद्दे‘ब्लड मून’ संबोधन : स्पर्शकाळ ते मोक्ष दरम्यान तीन तासांचा कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे. या ग्रहणाचा स्पर्शकाळ ते मोक्ष या दरम्यानचा कालावधी सुमारे तीन तासांचा असेल. त्यापैकी ग्रहणाची खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटांची राहणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.भारतात २७ जुलै रोजी रात्री ११.५४ वाजता चंद्रग्रहण लागेल. २८ जुलैच्या पहाटे ३.४९ वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. चंद्र्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो व सूर्य - पृथ्वी-चंद्र या तीनही गोलांचे मध्य एका सरळ रेषेत आणि पातळीत असावे लागतात. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकुच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो. त्यावेळी तो पूर्णपणे दिसेनासा होतो. याला ‘खग्रास चंद्रग्रहण’ असे म्हणतात. एका वर्षात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहण होतात. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे असतो. दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. यावेळी चंद्राची भ्रमणपातळी आयनिक पातळीशी ५ अंशांचा कोन करतो. पौर्णिमेला किंवा अमावस्येला चंद्र आयनिक पातळीच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला असू शकतो. त्यामुळे सूर्य-पृथ्वी-चंद्र एका रेषेत येऊ शकत नाही, असे खगोल अभ्यासकांनी सांगितले.२७ जुलैला मंगळ पृथ्वीच्या जवळमंगळ ग्रह हा २७ जुलै रोजी अगदी सूर्यासमोर राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर हे सरासरी कमी असते. पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर सरासरी १३ कोटी ६८ लक्ष ६७ हजार ६५७ कि.मी. आहे. परंतु प्रतियुती काळात हे अंतर ५ कोटी ७५ लक्ष कि.मी. राहील. सरासरी २६ महिन्यांनी सूर्य-मंगळ प्रतियुती असते. याआधी २२ मे २०१६ रोजी सूर्य - मंगळ प्रतियुती झाली होती. यानंतर ६ आॅक्टोबर २०२० रोजी मंगळ पृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी पृथ्वी मंगळ हे अंतर ६ कोटी २० लक्ष कि.मी. राहील.आयर्न आॅक्साईडमुळे मंगळ ग्रह लालमंगळ ग्रहावर आयर्न आॅक्साईडचे प्रमाण अधिक असल्याने हे ग्रह नेहमी लाल दिसते. या ग्रहाला एकूण दोन चंद्र आहेत. मंगळाचा व्यास ६,७९५ कि.मी. आहे. याला सूर्यभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास ६८७ दिवस लागतात. २० जुलै १९७६ आणि ६ आॅक्टोेबर १९७६ रोजी व्हायकिंग-१ आणि व्हायकिंग-२ या जुळ्या मानवरहित यानांनी मंगळाच्या मातीला प्रथम स्पर्श केला. या यानांनी जवळजवळ ११ महिन्यांचा प्रवास केला होता. २७ जुलै रोजी सूर्य मावळल्यावर लगेच पूर्व क्षितिजावर मंगळ ग्रह दिसेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. हा ग्रह साध्या डोळ्यांनी रात्रभर पाहता येईल व हा लाल रंगाचा असल्याने सहज ओळखतादेखील येईल.मानवी जीवनावर ग्रहणाचा परिणाम नाहीया विज्ञानयुगातसुद्धा ग्रहणासंदर्भात समाजात अनेक अंधश्रद्धा रुढ आहेत. अशा ग्रहणात जेवण करू नये, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, ग्रहण झाल्यावर आंघोळ करावी, ग्रहण झाल्यावर दान करावे, अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेही आधार नाही. ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. सर्व खगोलप्रेमिंनी व जिज्ञासूंनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर, प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.