शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

लोकसभा नील, विधानसभेची उधारी बाकी

By admin | Updated: November 23, 2014 23:11 IST

राज्यभरात मागील एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निवडणूक खर्च प्रशासनाने नील केला. मात्र, त्यानंतर आॅक्टोबरमध्ये झालेली विधानसभा निवडणूक निर्विघ्र पार पडली.

अमरावती : राज्यभरात मागील एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निवडणूक खर्च प्रशासनाने नील केला. मात्र, त्यानंतर आॅक्टोबरमध्ये झालेली विधानसभा निवडणूक निर्विघ्र पार पडली. या निवडणुकीत झालेल्या खर्चापोटी निवडणूक आयोगाने ७ कोटी २२ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ज्यांना पैसे देणे आहे त्याबाबत संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव न आल्यामुळे हा निधी पडून आहे. आक्टोबर महिन्यात जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांत निवडणुका घेण्यात आल्यात. यासाठी निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाकडून प्रशासनाला निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्यानुसार निवडणूक आयोगाने सुमारे ७ कोटी २२ लाख रुपये मतदान खर्च म्हणून उपलब्ध करुन दिले होते. त्यापैकी २ कोटी ४३ लाख ८७ हजार रुपयांचा निधी विविध मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला. यामध्ये मतदान केंद्रावरील तयारी, साहित्यावरील खर्च, मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन, वाहन, वाहनांचे डिझेल, कार्यालयीन खर्च, टेशनरी, मंडप भाडे, खुर्च्या टेबल, इलेक्ट्रॉनिक साहित्य सामग्री, प्रिंटिंग, झेरॉक्स, व्हिडीओ शुटींग, जेवण, नाश्ता अशा विविध प्रकारच्या कामांसाठी हा निधी यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान आयोगाकडून वेळेवर उपलब्ध होत नव्हता. मात्र लोकसभेच्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने ज्यांची यामध्ये मदत घेतली त्या कंत्राटदार व विविध कामांचा सुमारे ९ कोटी ३६ लाख रुपयांचा सर्व खर्च नील केला आहे. मात्र विधानसभेसाठी वरील साहित्य व यंत्रणांची घेण्यात आलेली मदत, ठेकेदारांची देणी, व्हिडीओ शुटींग व प्रशासकीय झालेल्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने ७ कोटी २२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतु हा निधी उपलब्ध झाल्यानंतरही संबंधित आठही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून खर्चाबाबतच्या मागणीचे प्रस्तावच आले नसल्याने हा निधी तसाच पडून आहे. मात्र ज्यांना प्रशासनाकडून पैसे घेणे आहेत त्यांना आपल्या पैशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. (प्रतिनिधी)