शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

Lok Sabha Election 2019; लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:14 IST

लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देशैलेश नवाल : दोन हजार केंद्रात १८,३०,५६१ मतदार बजावणार हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर व मेळघाट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात ९,३३,४४४ पुरुष, ८,८७,०८० महिला स्त्री व ३७ तृतीयपंथीय मतदार आहेत. ५१८९ दिव्यांग, २५३० सैन्य दलातील मतदार आहेत. ते २४ उमेदवारांचे भाग्य ठरवतील. दोन हजार मतदान केंद्रांसाठी ८९१६ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ८९१ मनुष्यबळ राखीव आहेत. १८ सखी मतदार केंद्रे आहेत. या ठिकाणी निवडणूक अधिकारी व पोलीसदेखील महिलाच राहतील. ३७ संवेदनशील केंद्रांवर ३७ मायक्रो आॅब्झर्व्हर नेमले आहेत, तर एकूण ६१ मायक्रो आॅब्झर्व्हर नियुक्त आहेत. जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपल्यानंतर एसएसटी, फ्लार्इंग स्कॉड आदीद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत पाहणी करीत आहेत. या कालावधीत १८ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली तर आचारसंहिता उल्लंघनाबाबत आठ एफआयआर दाखल करण्यात आले आहे. कुठेही संशय वाटल्यास व्हीडीओ कॅमेरा पथकाची नजर राहणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदानाच्या महोत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन शैलेश नवाल यांनी केले आहे.ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून यावर मॉनिटरिंग होणार आहे. या निवडणुकीसाठी चार हजार बीयू, दोन हजार सीयू व दोन हजार व्हीव्हीपॅट लागणार आहेत. याव्यतिरिक्त ८३० बीयू, ४१५ सीयू व ४१५ व्हीव्हीपॅट राखीव आहे. कुठल्याही केंद्रावर यंत्र बंद झाले असल्यास, ते अवघ्या ३० मिनिटांत बदलणार असल्याचे शैलेश नवाल म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती